शुक्रवार, २० मार्च, २०२०

जिल्ह्यातील सर्व अस्थापना व दुकाने 21व 22 मार्च रोजी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश.                                          जालना प्रतिनिधी   :- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा
 प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. 21 व 22 मार्च, 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जालना रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.  यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना सुट देण्यात आली असुन शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतुक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना *वगळता* एमआयडीसीमधील कारखाने व ईतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुहावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...