कोरोनामुळे उस्मानपूरच्या शेतकऱ्यांनी उपटली ''फुलांची बाग
परतुर,प्रतिनिधी :- दुष्काळाने संकटात असलेला परतूर तालुक्यातील शेतकरी आता कोरोनाच्या या संकटामुळे पुरता उध्वस्त होत असताना पाहायला मिळत आहे .लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे परतूर तालुक्यातील उस्मानपूर या गावचे सतिश दत्ता राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतातील एक एकरची गुलाब,झेंडू दीड एकर फुलांची बाग उपटून टाकली आहे.दीड ते दोन लाख रुपये खर्च करून सतिश राऊत यांनी आपल्या दीड एकर शेतात झेंडूची बाग लावली होती.तर एक एकर क्षेत्रात गुलाबाची बाग लावली होती सध्या या गुलाब व झेंडूला फुले आली आहेत. दोन ते तीन दिवसांत ही फुले तोडून बाजारात विकली नाहीत तर ती खराब होणार होती. मात्र, बाजार पेठच उपलब्ध नसल्याने त्यांनी आपली जवळपास एक हेक्टरची बाग उपटून टाकली आहे. या बागेतून त्यांना तीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित होत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा