गुरुवार, ४ जून, २०२०

*आ.सोळंके यांना चपराक; माजलगाव नगर परिषदेची अविश्वासाची विशेष सभा रद्द*

माजलगाव : येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार  4 जून रोजी विशेष सभाही जिल्हाधिकार्‍यांनी बोलावली होती. मात्र त्यापुर्वीच नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी बाजी मारली असून आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनीच या अविश्वासाची विशेष बैठक रद्द केली आहे. त्यामुळे हा विषय प्रतिष्ठेचा केलेल्या आ.प्रकाश सोळंके यांना सणसणीत चपराक मिळाली आहे.
कालच नगराध्यक्ष चाऊस यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून अविश्वास ठरावाच्या सभेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हायकोर्टाने अशी स्थगिती देण्यास नकार देत केवळ निकाल जाहीर न करण्याचा निर्णय दिला. ही सुध्दा आ.सोळंके यांना एकप्रकारे चपराक होती.

जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केली विशेष सभा! काय म्हटले आहे आदेशात?
माजलगाव नगर परिषदेच्या एकुण 18 नगरसेवकांनी दि.27.05.2020 रोजी महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55 अन्वये माजलगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री.सहालबीन आमेरबीन चाउस यांध्या कामाकाजावर अविश्वास व्यक्त करत असलेबाबत निवेदन सादर केले होते.
संदर्भ क्र. 2 अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55 (2) अन्वये दि.04.06.2020 रोजी गुरुवार दुपारी 12.00 वाजता नगर परिषद माजलगाव च्या सभागृहात उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली
कामात कसूर करणार्यां पल्लवी इंटरप्राजेस वर स्वछता निरीक्षकानी केला गुन्हा दाखल 
"”"""""""""""""""""""""""""""""""""""
*नांदेड हँलो रिपोर्टर*
विशेष प्रतिनिधी- *संजुकुमार गायकवाड*

 गायकवाड
सध्या देशात राज्यात कोविड-19चा शिरकाव फार मोठया प्रमाणात होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने या व्हायरसचा शिरकाव रोखण्यासाठीचे  निर्देश सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांना दिला होता.नांदेडजिल्हाधिकारी मा.विपीन इटनकर यांनी जिल्यातील सर्व स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थाना या व्हयरसचा शिरकाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे सूचित केले होते.त्यास लागणाऱ्या निधीचीही वेवस्था मा.पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी प्रशासकीय यंत्रणेला कोणत्याच पद्धतीची हयगय खपऊन घेतली जाणार नसल्याचे बजावून सांगण्यात आले होते.तश्या पद्धतीचे पालन जिल्यातील बहुतांश स्थनिक स्वराज्य संस्थांनी केले असून ही या कोविड-19व्हायरस ची जिल्यात रोख थांब करण्यासाठी जिल्याचे शिलेदार अहोरात्र झटत असताना हिमायतनगर पंचायत येथे कमी वेळेत जास्त पैशे चुकीच्या पद्धतीने कमवण्याच्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून एका रात्रीत करोडोपत्ती होण्याचे स्वप्न बाळगून असतात पण वाडवडिलांनी सांगितलेल्या मांजर डोळे मिटुनी दूध पिते तिला वाढतें मी तर डोळे मिटून दुध पीत आहे.मला कोण पहाणार आहे. या मणी प्रमाणे हिमायतनगर पंचायत येथे घनकचरा व्येवस्था पणाचे काम पाहान्या साठी "पल्लवी इंटरप्रायजेस"या संस्थास हिमायतनगर पंचायत हद्दीत शहरातील नाली, रस्ते, व इतर कामे करण्यासाठी चालू वर्षाचे कामाचा ठेका  देण्यात आला  आहे.या मालकाने शहरात सुरवातीचे काही दिवस कोणचीच तक्रार न येऊ देता काम करून आधीकार्यांचे मनेजिंकली म्हणून मी काही केले तर कोण विचारणार या अती शोक्तीने शहरातील परमेश्वर मंदिर परिसरात बस्थानक परिसरातील मुख्य मार्गांवर प्रशासनाच्या वतीने शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी देण्यात आलेल्या सोडियम हायपोक्लोराइट ओषधाचा वापर करणे अपेक्षित असताना या गुतेदारांच्या माणसानी त्या फवारणीत सोडियम हायपोक्लोराइट चे मिश्रण योग्य प्रमाणात पाण्यात टाकून परिसर निर्जंतुकीकरण करावयास पाहिजे होते पण काही जागरूक नागरिकांनी भा.ज.पा.युवा मोर्च्यातालुकाध्यक्ष रामभाऊ सुरवंशी. व भा.ज.पाचे तालुकाध्यक्ष अशिष  सकवान यांनी कोरोना च्या काळात शहर सॅनिटाझर करण्याच्या नावाखाली होत असलेल्या निव्वळ पाण्याच्या फवारणीचा जनतेसामोर भाडाफोड करून याप्रकरणी सखोल चोकशी करण्याचे निवेदन हिमायतनगर तहसिलदार नगरपंचायतचे मुख्यधीकारी व जिल्हाअधिकारी नांदेड यांना केला.सदर प्रकरणी आदिक चोकशी करण्यासाठी नगरपंचायतच्या सहाय्यक अधीक्षिका मुक्ता कांदे व रत्नाकर डावरे यांनी जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष व त्या परिसरातील नागरिकांन समोर त्या फवारणी यंत्रातुन दोन बाटली भरून त्या बाटल्या न्याईक पडताळणी करण्यासाठी वैज्ञानिका कडे पाठवून अहवाल सादर करण्याचे सुचवण्यात आले होते.पण न्यायिक पडताळणीत त्या फवारणी यंत्रतुन तपासणी साठी घेण्यात आलेल्या बाटलीत कोणत्याच प्रकारचे सोडियम हायपोक्लोराइट ची मात्रा नसल्याचा अहवाल दिला असल्यामुळे हिमायतनगर पंचायतचे स्वच्छता निरीक्षक रमाकांत बाचे यांनी पल्लवी इंटरप्रायजेस चे मालक किशन विठ्ठल वनांळे रा.शिवाजीनगर इतवारा नांदेड  यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे तक्रार नोंदवली असून त्यानुसार हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये सदरील इसमावर 420, 188, 269, 270, 271, भा.द.वी.व सह कलम महाराष्ट्र आपत्ती कायदा 2005चे कलम 53, 56, अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
खासगी रुग्णालये तात्काळ सुरू करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जळगाव येथे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी आरोग्यमंत्र्यांनी साधला संवाद.
#जळगाव_दि. ३ | जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा मृत्यू दर कमी करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सहकार्य करुन टास्क फोर्ससाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहेत.

कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. टोपे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आज सकाळी नियोजन भवनात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. एन. एस. चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री राजेश टोपे म्हणाले, सेवाभाव सर्वांत महत्त्वाचा आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून उपाययोजना करीत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत. त्यासाठी आयएमएला दोन हजार पीपीई कीट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी फिजिशियन्स व इन्सेन्टीव क्षेत्रातील किमान तीन- तीन तज्ज्ञ उपलब्ध करुन द्यावेत. त्यांना वेतन सुध्दा अदा करण्यात येईल. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा. तसेच जे खासगी रुग्णालये सुरू होणार नाहीत त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने  करावी, असेही निर्देश मंत्री राजेश  टोपे यांनी दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, सध्या खासगी रुग्णालये सुरू होण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सामाजिक भावना जोपासत आपापली रुग्णालये सुरू करावीत, असेही आवाहन केले. खासगी रुग्णालये उद्यापासून सुरू केली जातील, असे आश्वासन आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिले.

बुधवार, ३ जून, २०२०

                      जाफराबाद मध्ये सापडले 5 रुग्ण 
जाफराबाद :- दिनेश जाधव (ता.प्रतिनिधी):- जाफराबाद मधील आदर्शनगर येथे आढळला कोरोनाच्या रुग्ण. जाफराबाद मधील आदर्श नगर कंटेंनमेन झोन घोषित.पुढील तीन दिवस कडकडीत बंद.जाफराबाद तालुक्यात कोरोनाच्या पाचवा रुग्ण मिळाला आहे जाफराबाद येथील वॉर्ड क्रमांक 1 व वॉर्ड क्रमांक 2 या भागातील आदर्श नगर येथे हा रुग्ण आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे,हा रुग्ण दिनांक 18,19 तारखेच्या दरम्यान नांदेड येथे काही इतर राज्यातील लोकांना  घेऊन गेला होता त्याकाळात हा रुग्ण कुठेतरी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त आहे.जाफराबादेत कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे तहसील प्रशासनाने लगेच शहरातील प्रमुख लोकांची पोलीस ठाणे जाफराबाद येथे बैठक घेऊन काय काय उपाय योजना केली आहे याची माहिती दिली जाफराबाद तालुका प्रशासनाच्या वतीने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पुढील 3,4, व 5 तारखेस तीन दिवस जाफराबाद शहरात प्रशासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे,ज्या ठिकाणी म्हणजेच आदर्शनगर हा पूर्ण भाग कंटेनमेन झोन म्हणून घोषित केले आहे.
जो रुग्ण आढळला त्या रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्याना हिंदुस्थान लॉन्स येथे तर दुरदूरण संपर्कात आलेल्या व्यक्तींना जिजाऊ इंग्लिश शाळेत कॉरिनटाईन केले आहे, कॉरिनटाईन केलेल्यांची संख्या ही 11आहे तसेच त्यांचे स्वब लवकरच घेण्यात येईल असे प्रशासनाणे सांगितले आहे ,संचारबंदीत फक्त दवाखाने व मेडिकल ही अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा तहसीलदार सतीश सोनी,ए पी आय अभिजित मोरे यांनी केली आहे.

   यावेळी या बैठकीत नगरपंचायत मुख्याधिकारी पुजा दुधनाळे,तालुका वैद्यकीय अधीकारी प्रशांत टेकाळे,पी एस आय पोठरे ,नगराध्यक्ष दिपक वाकडे ,सुरेश दिवटे,सुरेश गवळी,बाळकृष्ण हिवाळे, अनिल बोर्डे,बाबुराव लहाने,प्रभु गाढे,अमोल पडघन,निवृत्ती बनसोड,विनोद हिवराळे,मोहन मुळे,गजानन उदावंत शहरातील व्यापारी,नगरसेवक,समाजसेवक,पत्रकार आदी उपस्थित होते.
                                              आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाला यश



                                      कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू 
                                             करण्यास मान्यता मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा


जालना,ब्युरोचीफ :-* कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी  राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाला यश आले असून जालना जिल्हा रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जालना येथे कोरोना चाचण्यांची सुविधा निर्माण होणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे जिल्हावासियांसह मराठावाडा भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
        याबाबत सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, जालना येथील रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेता आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेवरील ताण पाहता जालना येथे प्रयोगशाळा होणे गरजेचे होते. त्यासाठी आता मान्यता मिळाली आहे.
        या प्रयोगाशाळेसाठी अंदाजीत खर्च सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास असून त्याला मान्यता मिळाल्याने प्रयोगशाळा उभारणीस वेग येईल. आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार असून लागणारी यंत्रसामुग्री, मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

        जालना जिल्ह्यात आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू होणार असल्याने कोरोना रुग्णांचे नमुने तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने उपचार देखील मिळण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रयोगशाळेमुळे भविष्यातही स्वाई फ्लू, डेंग्यू सारख्या विषाणूसंसर्ग आजारांच्या चाचण्या करण्यासाठी मदत होणार असल्याने जालना जिल्हावासियांसाठी दिलासा देणारी बाब ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
         सलग अडीच महिन्यांपासून अंबरनाथ मध्ये गरजूंना मदत वंचितकडून मदतीचा ओघ सुरूच



अंबरनाथ,ब्युरोचीफ :- कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अंबरनाथ भागात अनेक गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर दैनंदिन जीवनासाठी लागणारे साहित्य रोगप्रतिकार औषधे इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांना तयार जेवण, इतर साहित्य, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या अडीच महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी हा उपक्रम राबवला आहे.** अंबरनाथ परिसरात कामानिमित्त  येऊन तात्पुरता निवारा घेणारे कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कारखाने, लघु उद्योग बंद झाल्याने अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी कसेही करून त्यांच्या स्थलांतर केले. मात्र इतर कामगारांचे हाल झाले. अशा लोकांना वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी, गुंजाई फाउंडेशन, शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार कुटुंबांना रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अन्नधान्यांचे किट, भाज्या, तयार जेवण, मास्क, स्यानेटायझरचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. तसेच जे मजूर अंबरनाथवरून त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते, अश्या लोकांसाठी महामार्गावर तयार जेवण, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या विश्रांतीची सोय देखील करण्यात आली होती. गेले अडीच महिने या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापही अंबरनाथ भागात वंचित बहुजन आघाडीकडून गरजूंना मदत करण्यात येत असल्याचे प्रवीण गोसावी यांनी सांगितले.
               देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरोचीफ :-  देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकार्यक्षम असून नेमके काय करायला पाहिजे जेणेकरून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, हेच कळत नसल्याने केंद्र सरकार त्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत येणार्‍या अफवांना बळी पडू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
      जागतिक संघटनेने भारताला पूर्णपणे कंगाल म्हणून घोषित केले आहे. तशीच परिस्थिती चीनची झाली आहे म्हणून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता यांच्या नाकी नऊ आले आहे. चीन आणि भारत या दोघांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कोरोना पसरविला म्हणून चीनवर जगभरातून आरोप केला जात आहे. तर भारतात कोरोनाची परिस्थिती कशी हाताळावी हे पंतप्रधान मोदी यांना कळत नाही म्हणून देशातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. दोघांनाही त्यांच्या देशातील लोकांना फसवायचे आहे आणि म्हणून जशी गावांमध्ये लुटुपुटूची लढाई होते तशाच पद्धतीने चीनचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान या दोघांची लुटूपुटूची लढाई सीमेवर सुरु झाली आहे. कधी लडाख तर कधी आसाम  तर कधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश मध्ये ही लढाई दिसून येते. दोन्ही देशांची परिस्थिती अजून ही युद्धा सारखी झालेली नाही, किंवा दोन्ही देश युद्ध करू शकतात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजप आणि आर.एस.एस यांनी जो खेळ चालवलाय की चीनकडून आपल्याला धोका आहे. तर त्यांच्या अफवांना बळी पडू नका. मात्र चीनकडुन भारताला धोका निश्चित आहे. पण ते वेगळ्या कारणांमुळे, दोन्ही देश ढासळलेल्या आर्थिक परिस्थिती मुळे त्रस्त झाले असून आर्थिक स्थिती कशी सुधारावी हे या लोकांना कळत नाही. त्यामुळे दोन्ही देश त्रस्त झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे  यांनी दिली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...