सोमवार, २ मार्च, २०२०

उज्जैनपूरी येथे रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त श्याम महाराज मुळे यांचे दरवर्षीप्रमाणे श्रीमंत भागवत कथेचे आयोजन.
 जालना / प्रतिनिधी :-  जिल्ह्यातील बदनापुर उज्जैनपुरी येथे दरवर्षी  प्रमाणे श्री रोकडोबा महाराज यात्रे निमित्त 21 मार्च ते 27 मार्च पर्यंत शाम महाराज मुळे याचे हे पहिल्या 9 वर्षांपासुन उज्जैनपुरी
गावकऱ्यांकडून एक रुपयाची देणगी न घेता ब्राह्मणाना सायंकाळी 7 दिवस भोजन देऊन श्रीमद् भागवत कथा केली या  गावची कथा सांगायची ठरली तर फार मोठी आहेत रोकडोबा  महाराज कुठलाही नवस आसु तो  पूर्ण होतो या गावातून जिल्‍हाधिकारी पासून तर शिपायापर्यंत शासकीय पदापर्यंत पोहोचले छोट्या कार्यकरत्या पासून तर राष्ट्रीय महामंत्र पर्यंत पोहोचले विद्यार्थ्यांना शिक्षक डाॅक्टर ,ईजिनियर, या गावातूनच दिले थोडक्यात सांगायचे ठरले तर कुठलाही भाविक गाव सोडून गेला तर परत यात्रेनिमित्त गावात येतो औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी पिराजी सोरमारे जाफराबाद चे पीएसआय घुगे साहेब काँग्रेसचे कल्याण दळे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे भाकवतकार शाम शाम महाराज मुळे  पंचायत समिती चे सभापती बिटी शिंदे  प्राध्यपक  राम भाले सर या  गावातून मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले या गावात अठरापगड जाती धर्माचे गाव  आहे सात दिवस कोणी मासारी खाणार नाही देणगी  सांगायचं ठरलं तर एक माणसाला शंभर रुपये रात्री जन्माला कधी आला तर शंभर रुपये येऊन देतो  घरात दहा माणसाकडे असेल तर हजार रुपये होते देणगीसाठी गावकरी घरा पर्यत जाणार नाही स्वतःहून मंदिरापर्यंत पोहोचते सात दिवस श्रीमद् भागवत कथा किर्तन भजन विविध कार्यक्रम पार पडतात 27 मार्च रोजी सकाळी सात वाजता दिंडी निघते रोकडोबा महाराज मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिर रोकडोबा महाराज  प्रर्तत निघते सकाळी  आठ वाजता वाणी समाज ब्राह्मण समाज यांना शिदा दिल्यात  जातो दहा वाजता श्रीमद् भागवत कथा सुरुवात होते एक वाजता समाप्त होते बारा वाजता प्रदिप महाराज मुळे बबन महाराज मुळे अशोक पाटणकर दिलीप महाराज मुळे याच्या  हे रोकडोबा  महाराजांना नेवध्या  दिल्या जातो   दोन वाजता सर्व गावकरी मंडळ कडून जिल्हा परिषद शाळेवर महाप्रसादाचे  आयोजन केले जाते चार वाजता ब्राह्मण समाजाचा नवस निघतो   रात्री आठ वाजता प्रदिप महाराज  मुळे बबन महाराज मुळे डिलीप मुळे लक्ष्मण मुळे सुरेश मुळे कैलास मुळे विलास मुळे  ब्राह्मण याना ब्राह्मण म्हणुन  हार घालुन ब्राह्मणा रोकडोबा महाराजांच्या वाजीत गाजीत    मंदिरापर्यंत गेले होते तिथून पुढे नाटक सुरु होते सकाळी पाच वाजता आई भवानी  सोग निघते रोकडोबा महाराज मंदिर  घुगे गल्ली पंचायत समिती मारुती मंदिर ब्राह्मण गल्ली वाणी गल्ली रोकडोबा महाराजाला परत आई भवानीचे सोंग  निल्या जाते  तिथून जत्रेला सुरवात होते पुढे घेतला सुरुवात होते

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या कामांना गती द्या
अबंड व घनसावंगी तालुक्यातील कृषि विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार कृषि सेवकांच्या मानधनात वाढीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री राजेश टोपे
जालना, दि. 29 – शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत उपयुक्त असुन या योजनेंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांना गती द्यावी.
तसेच प्रत्येक कृषि सहाय्यकांनी एक गाव दत्तक घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी करावा, अशा सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.येथील अंकुशनगर सहकारी साखर कारखाना येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.यावेळी  कृषि विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, उप विभागीय कृषि अधिकारी श्री सोनकांबळे,श्री कोकाटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मनोज मर्कड, तालुका कृषि अधिकारी एस.व्ही. गिरी, सखाराम मोहोळ, श्री काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रमाणात संपर्क येणारा कृषी विभाग आहे.  या विभागामध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणुक द्यावी. शासकीय कार्यालयात काम करत असताना आपले वर्तन हे लोकशाहीला पोषक असे असले पाहिजे.  वेतन घेऊन जनसामान्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असुन आपल्या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी करावा. त्याचबरोबर विकासाची कामे करत असताना नियमानुसार व वेगाने कामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. घनसावंगी व अंबड तालुक्यातील कृषि विभागामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विविध पदे रिक्त आहेत.  ही सर्व पदे तातडीने भरण्यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत कृषि सेवकांना आजघडीला केवळ सहा हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. या मानधनातसुद्धा वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा  सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असुन या प्रकल्पामध्ये वैयक्तिक विकासाबरोबरच सामुहिक विकासाच्या अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 2 लाख 7 हजार 66 अर्जापैकी 1 लाख 31 हजार 193 अर्ज पात्र ठरली असुन विविध पातळयांवर पात्र अर्जामधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काम करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत आजपर्यंत 4 हजार 942 शेतकऱ्यांना 36 कोटी 33 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.  या प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, शेडनेट, ठिबक सिंचन यासारख्या बाबींसाठीची प्रकरणे  15 दिवसांच्या आत पुर्ण  करावीत, जिओ टॅगींगचे काम प्रत्येक कृषि सहाय्यकाने आठ दिवसात पुर्ण करावेत तर उप विभागीय स्तरावरील प्रकरणे चार दिवसात पुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थितांना दिले. बैठकीस तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सेवक आदींची उपस्थिती होती.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

जळगाव चे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल जाहीर सत्कार.
जळगाव ( प्रतिनिधी ) :- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी " डॉ .श्री.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक जळगावयांना राष्ट्रपती
पोलीस पदक ( PM )  प्रदान  प्राप्त झाल्याने जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय विभाग जळगाव व राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष यांचे कडुन  -  डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार सोहळा संपन्न.याबाबत सविस्तर माहिती अशी पोलीस अधीक्षक श्री.डॉ . पंजाबराव उगले यांना १५ ऑगस्ट २०१८ या वर्षी शासनाकडुन गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM) ( मा.राष्ट्रपती ,भारत सरकार यांचे कडुन जाहिर ) जाहिर करण्यात आले होते.माननिय राज्यपाल महोदयांच्या हस्ते  पदक प्रधान करण्याबाबतचा 'अलंकरण समारंभ ' सोहळा मंगळवार दिनांक :- १८ / ०२ / २०२० रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री.डॉ.पंजाबराव उगले यांना सन्मानिय राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी , महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक (PM) प्रधान करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने आज मा .पोलीस अधीक्षक  जळगाव यांच्या दालनात जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय  विभाग जळगाव - कल्पना गरीबदास अहिरे , राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष - ममताताई सोनवणे , उपाध्यक्ष - सुवर्णा  हेमकांत पवार , सरचिटणीस  -शिल्पा बाविस्कर ,उपाध्यक्ष - सुमनताई बनसोडे , उपाध्यक्ष - मनीषा देशमुख , मिनाक्षी पाटील , सुवर्णा सोनवणे यांचे हस्ते डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार करण्यात आला .
मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे
            जालनादि. 27 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहेअशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेतमराठी भाषा बोली भाषेतलिखाणातश्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे आवश्यक आहेमराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.
          
  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री हजारे बोलत होते
यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजनतांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर पैठणेशंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री हजारे म्हणालेदरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा केला जातोया माध्यमातुन मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातातशालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतेबदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीयसंस्कृतिक बदलाचे परिणाम होतातमराठी भाषेवरही ते होत आहेतत्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते असे सांगत मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  
            माहिती सहाय्यक श्री महाजन म्हणाले भारत देशातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक भाषा आहेमहाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जातेमहाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचंऔचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपायमोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगत प्रत्येकांने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आलेतसेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलीयावेळी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा देण्यात आली.
        कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
           पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा

जालना, प्रतिनिधी :- राज्याचे  आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे  यांचा जालना जिल्हा दौरा
पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 5.30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने जालना येथे आगमन व अंजिक्य बंगला येथे राखीव सकाळी 10.00 वाजता जालना येथुन अंकुशनगर ता.अंबडकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता अंकुश नगर येथे आगमन व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा) बाबत बैठक ( स्थळ- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर) दुपारी 1.00 वाजता कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना येथुन सोयीनुसार प्रयाण व मुक्काम. 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

वंचितांना न्याय देण्यासाठी पुन्हा रिपब्लिकन सेनेत सुधाकर निकाळजे मराठवाडा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्याच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश.
  जालना (प्रतिनिधी) ः- सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मंगळवार दि. 25 रोजी घेण्यात आला.
  यावेळी मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे, पश्‍चिम जालना जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पुर्व जालना जिल्हाध्यक्ष रोविदास गंगातिवरे, जालना स. प. प्रमुख दिनेश आदमाने, जालना जिल्हा महासचिव एक्स आर्मी मेजर चंद्रकांत खरात, पुर्व जालना जिल्हा महासचिव अ‍ॅड. कैलास रात्नपारखे, जिल्हा संघटक मच्छिंद्र खरात आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे म्हणाले की, नव्या जोमाने काम करण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळून देण्यासाठी आपण पुन्हा रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला असून जालना जिल्ह्यामध्ये नव्या उमेदीने पक्ष वाढविण्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेवून काम करण्यात आहे.या प्रसंगी श्री. निकाळजे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये  उपाध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा सचिव भानुदास साळवे, जिल्हा सहसचिव नवनाथ ठोके, पुर्व जालना जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव आंभोरे, जालना तालुकाध्यक्ष भिमराज खरात, तालुका उपाध्यक्ष बबन खरात, जालन शहर अध्यक्ष कैलास बनसोडे, जालना तालुका युवा महासचिव सुमेध हिवाळे, जालना शहर महासचिव महेश घोरपडे, वाघरुळ सर्कल अध्यक्ष कैलास लाहाने, युवा तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, जिल्हा युवा महासचिव राज रत्नपारखे, शहर युवाध्यक्ष संतोष ऊनाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई, / प्रतिनिधी :- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
आज राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्यास उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी  सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभु, आशिष शेलार, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक उच्च सभागृहात मांडले जाणार असून, मराठी भाषा दिनानिमित्त ते विधानसभेत उद्या मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री गायकवाड यांनी दिली.त्याचबरोबर, ज्या खाजगी शाळा शैक्षणिक शुल्काबाबत नियम पाळत नाहीत अथवा गरजेपेक्षा जास्त शुल्क वापरतात अशा शाळांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित उपप्रश्नास दिली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...