मंगळवार, ३ मार्च, २०२०

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, एक प्रामाणिक भीमयोद्धा, आंबेडकरी चळवळीचे नेते. तसेच स्वाभिमानी मुप्टाचे मराठवाडा अध्यक्ष व औरंगाबाद पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष, डॉ अनिल पांडे 50वा वाढदिवस स्वाभिमानी मुप्टा प्राध्यापक व शिक्षक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
प्रा. संजय काळे | औरंगाबाद 
 डॉ अनिल पांडे आणि डॉ आरती पांडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पार पडला. डॉ शंकर अंभोरे, डॉ किशोर साळवे, विलास पांडे,देवानंद वानखेडे या मान्यवरांनी डॉ अनिल पांडे यांना वाढदिवसाच्या व भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ माणेराव, सुधीर शेषवरे, एम एस ओव्हळ, सुबोध साळवे, एस बी जाधव, प्रदीप आमले,संजय काळे, डॉ मिलिंद तायडे, डॉ राहुल तायडे, डॉ लिहिणार, खरात सर, पवार सर, प्रा रविराज चव्हाण आणि इतर शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर...
नरडाणा:-धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सवानिमित्ताने देण्यात येणार
यंदाचा राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार-२०२० व राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार-२०२० पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
*राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार-२०२०*

सुनिल अमृत गोपाल (शिरपूर),नरेंद्र गुलाबराव बाविस्कर(तामसवाडी ता.पारोळा),ध्रुवास ममराज राठोड (चाळीसगाव),दिपक रोहिदास पाटील (जिराळी -इंधवे ता.पारोळा),सदाशिव सोमा महाजन(दोंडाईचा),संदीप हिरामण पाटील (तामसवाडी ता.पारोळा),प्रशांत दत्तात्रय कोतकर(पिंपळनेर),देविदास शिवराज हिरे(भाटगाव ता.चांदवड),श्रीराम साहेबराव महाजन(चेंबूर,मुंबई)संजयकुमार उमेशचंद्र महाजन(शिंदखेडा),
अनिल अरुण काळे (नरडाणा ता.शिंदखेडा),रविंद्र रामदास सोनगीरे(शिरपूर),चेतन रामदास जाधव (मोहाडी उपनगर,धुळे),मनोहर धनगर चौधरी (चारणपाडा ता.शिरपूर),दिलीप नामदेव पाटील (विखरण ता.शिरपूर),बाबुराव गुंडाजी गायकवाड (बजाजनगर,औरंगाबाद),राकेश हिराजी पगारे(सामोडे ता.साक्री )चंद्रकांत बापू नेरकर(मोरदडगांव ता.धुळे),विशाल रमेश राठोड (रावेर जि.जळगाव)विनोद अशोकराव सोनवणे(मोंढाळे पिंप्री ता.पारोळा)प्रा.चंद्रकांत सदाशिव सोनार (शिरपूर)राजेंद्र धनालाल गुरव(दोंडाईचा)संजय सोमगीर गोसावी, योगेश देविदास जोशी (विरदेल ता.शिंदखेडा),सुनिल न्हानु दाभाडे(जळगाव) सुरेश बाबुराव सोनवणे (बोरविहीर ता.धुळे) प्रा.समीर विष्णू घोडेस्वार,प्रा.चंद्रकांत शिवाजी कोळी, प्रा.अनिल रविंद्र गजरे(जामनेर पुरा,जि.जळगाव)विजय रामचंद्र सैतवाल(मालदाभाडी ता.जामनेर),अशोक दिगंबर जाधव (कारवा.जि.चंद्रपूर),अनिल भगवान माळी(दत्ताणे ता.शिंदखेडा)अनिल विज्ञान महिरराव (नवपाडा(मुखेड)ता.शिरपूर)
राज्यस्तरीय राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार-२०२०
सुनिता आधार पाटील (बोरविहीर ता.धुळे)डॉ. सुरेखा शिवाजी बोरसे (कावपिंप्री ता.अमळनेर),जयश्री महेंद्र जाधव (दहिद बु.|| जि.बुलढाणा),माधुरी विजय देवरे (नाशिक),सुनिता विश्वनाथ हंडोरे (नाशिक)
यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.तसेच कार्यक्रमाचे दिनांक:- १९ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२:०० वाजता.कार्यक्रमाचे ठिकाण :- प्रा.आर.ओ.निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज,गोंदूर-मोराणे बायपास रोड,गोंदूर,धुळे येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. असे आवाहन धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल एच.पाटील,उपाध्यक्ष योगेश वाघ,सचिव शशिकांत पाटील,सहसचिव मोहन सुळ,वासुदेव शेलकर,विशाल निकम, संभाजी बोरसे,राहुल पवार यांनी केले आहे.
लेडी सिंघम पल्लवी जाधव मॅडम यांनी सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला स्वतःचा वाढदिवस
जालना प्रतिनिधी/:- लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना दामीनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव मॕडम यांनी आपला
वाढदिवस शहरातील गांधीनगर स्थित शिक्षा संस्कार केंद्र येथे साजरा केला.आपण कोणत्याही कार्यक्षेत्रात कितीही मोठ्या पदावर का असेना, सामाजिक बांधीलकी आणि गरजूंना मदत करण्याची ओढ आपल्याला असली पाहिजे. जेणे करून वाढदिवसाचे निमित्त असो किंवा अन्य काही आनंदाचे क्षण, त्याचे रूपांतर आपण ईतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यास सक्षम ठरत असू तर ते एक महान सामाजिक कार्य सर्वांनी केले पाहिजे. असा संदेशच जणू त्यांच्या वाढदिवसानिमित्त लेडी सिंघम यांनी आपल्या कृतीतून दिला. यावेळी पल्लवी जाधव मॕडम च्या वतीने शिक्षा संस्कार केंद्र च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. येथे गरिब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून मुलींना स्वरक्षणाच्या मार्गदर्शना सोबत कायद्याविषयक माहिती दिली.परिक्षेसंबंधी प्रोत्साहन देऊन सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सर्व विद्यार्थ्यांनी मॕडमचे आभार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

 राशन धान्य गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱा ट्रक पोलिसांनी पकडला.
                      भोकरदन पोलिसांनी कारवाई
भोकरदन प्रतिनिधी : रेशनचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असतांना तो ट्रकसह पोलिसांनी पकडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, दि.1.मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ट्रक
(क्र.एम.एच.15.सी.के.23.89)मधून राशनचा गहू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन पोलिस कर्मचारी विजय जाधव, गणेश निकम, संदीप उगले, संजय क्षीरसागर यांनी सापळा लावून सिल्लोड रोडवर ट्रकला थांबविले. या दरम्यान ट्रकचालकाने ट्रक थांबवून तेथून पोबारा केला.दरम्यान सदरील ट्रकमध्ये रेशनचा गहू असल्याची माहीती समोर आली. या ट्रकमध्ये प्रत्येकी 50 किलोचे 355 पोते आढळून आले.दरम्यान पोलिसांनी एकुण बारा लाखाच्या वर ट्रकसह मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार, २ मार्च, २०२०

उज्जैनपूरी येथे रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त श्याम महाराज मुळे यांचे दरवर्षीप्रमाणे श्रीमंत भागवत कथेचे आयोजन.
 जालना / प्रतिनिधी :-  जिल्ह्यातील बदनापुर उज्जैनपुरी येथे दरवर्षी  प्रमाणे श्री रोकडोबा महाराज यात्रे निमित्त 21 मार्च ते 27 मार्च पर्यंत शाम महाराज मुळे याचे हे पहिल्या 9 वर्षांपासुन उज्जैनपुरी
गावकऱ्यांकडून एक रुपयाची देणगी न घेता ब्राह्मणाना सायंकाळी 7 दिवस भोजन देऊन श्रीमद् भागवत कथा केली या  गावची कथा सांगायची ठरली तर फार मोठी आहेत रोकडोबा  महाराज कुठलाही नवस आसु तो  पूर्ण होतो या गावातून जिल्‍हाधिकारी पासून तर शिपायापर्यंत शासकीय पदापर्यंत पोहोचले छोट्या कार्यकरत्या पासून तर राष्ट्रीय महामंत्र पर्यंत पोहोचले विद्यार्थ्यांना शिक्षक डाॅक्टर ,ईजिनियर, या गावातूनच दिले थोडक्यात सांगायचे ठरले तर कुठलाही भाविक गाव सोडून गेला तर परत यात्रेनिमित्त गावात येतो औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी पिराजी सोरमारे जाफराबाद चे पीएसआय घुगे साहेब काँग्रेसचे कल्याण दळे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे भाकवतकार शाम शाम महाराज मुळे  पंचायत समिती चे सभापती बिटी शिंदे  प्राध्यपक  राम भाले सर या  गावातून मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले या गावात अठरापगड जाती धर्माचे गाव  आहे सात दिवस कोणी मासारी खाणार नाही देणगी  सांगायचं ठरलं तर एक माणसाला शंभर रुपये रात्री जन्माला कधी आला तर शंभर रुपये येऊन देतो  घरात दहा माणसाकडे असेल तर हजार रुपये होते देणगीसाठी गावकरी घरा पर्यत जाणार नाही स्वतःहून मंदिरापर्यंत पोहोचते सात दिवस श्रीमद् भागवत कथा किर्तन भजन विविध कार्यक्रम पार पडतात 27 मार्च रोजी सकाळी सात वाजता दिंडी निघते रोकडोबा महाराज मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिर रोकडोबा महाराज  प्रर्तत निघते सकाळी  आठ वाजता वाणी समाज ब्राह्मण समाज यांना शिदा दिल्यात  जातो दहा वाजता श्रीमद् भागवत कथा सुरुवात होते एक वाजता समाप्त होते बारा वाजता प्रदिप महाराज मुळे बबन महाराज मुळे अशोक पाटणकर दिलीप महाराज मुळे याच्या  हे रोकडोबा  महाराजांना नेवध्या  दिल्या जातो   दोन वाजता सर्व गावकरी मंडळ कडून जिल्हा परिषद शाळेवर महाप्रसादाचे  आयोजन केले जाते चार वाजता ब्राह्मण समाजाचा नवस निघतो   रात्री आठ वाजता प्रदिप महाराज  मुळे बबन महाराज मुळे डिलीप मुळे लक्ष्मण मुळे सुरेश मुळे कैलास मुळे विलास मुळे  ब्राह्मण याना ब्राह्मण म्हणुन  हार घालुन ब्राह्मणा रोकडोबा महाराजांच्या वाजीत गाजीत    मंदिरापर्यंत गेले होते तिथून पुढे नाटक सुरु होते सकाळी पाच वाजता आई भवानी  सोग निघते रोकडोबा महाराज मंदिर  घुगे गल्ली पंचायत समिती मारुती मंदिर ब्राह्मण गल्ली वाणी गल्ली रोकडोबा महाराजाला परत आई भवानीचे सोंग  निल्या जाते  तिथून जत्रेला सुरवात होते पुढे घेतला सुरुवात होते

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या कामांना गती द्या
अबंड व घनसावंगी तालुक्यातील कृषि विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार कृषि सेवकांच्या मानधनात वाढीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री राजेश टोपे
जालना, दि. 29 – शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत उपयुक्त असुन या योजनेंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांना गती द्यावी.
तसेच प्रत्येक कृषि सहाय्यकांनी एक गाव दत्तक घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी करावा, अशा सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.येथील अंकुशनगर सहकारी साखर कारखाना येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.यावेळी  कृषि विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, उप विभागीय कृषि अधिकारी श्री सोनकांबळे,श्री कोकाटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मनोज मर्कड, तालुका कृषि अधिकारी एस.व्ही. गिरी, सखाराम मोहोळ, श्री काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रमाणात संपर्क येणारा कृषी विभाग आहे.  या विभागामध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणुक द्यावी. शासकीय कार्यालयात काम करत असताना आपले वर्तन हे लोकशाहीला पोषक असे असले पाहिजे.  वेतन घेऊन जनसामान्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असुन आपल्या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी करावा. त्याचबरोबर विकासाची कामे करत असताना नियमानुसार व वेगाने कामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. घनसावंगी व अंबड तालुक्यातील कृषि विभागामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विविध पदे रिक्त आहेत.  ही सर्व पदे तातडीने भरण्यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत कृषि सेवकांना आजघडीला केवळ सहा हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. या मानधनातसुद्धा वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा  सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असुन या प्रकल्पामध्ये वैयक्तिक विकासाबरोबरच सामुहिक विकासाच्या अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 2 लाख 7 हजार 66 अर्जापैकी 1 लाख 31 हजार 193 अर्ज पात्र ठरली असुन विविध पातळयांवर पात्र अर्जामधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काम करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत आजपर्यंत 4 हजार 942 शेतकऱ्यांना 36 कोटी 33 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.  या प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, शेडनेट, ठिबक सिंचन यासारख्या बाबींसाठीची प्रकरणे  15 दिवसांच्या आत पुर्ण  करावीत, जिओ टॅगींगचे काम प्रत्येक कृषि सहाय्यकाने आठ दिवसात पुर्ण करावेत तर उप विभागीय स्तरावरील प्रकरणे चार दिवसात पुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थितांना दिले. बैठकीस तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सेवक आदींची उपस्थिती होती.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

जळगाव चे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल जाहीर सत्कार.
जळगाव ( प्रतिनिधी ) :- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी " डॉ .श्री.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक जळगावयांना राष्ट्रपती
पोलीस पदक ( PM )  प्रदान  प्राप्त झाल्याने जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय विभाग जळगाव व राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष यांचे कडुन  -  डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार सोहळा संपन्न.याबाबत सविस्तर माहिती अशी पोलीस अधीक्षक श्री.डॉ . पंजाबराव उगले यांना १५ ऑगस्ट २०१८ या वर्षी शासनाकडुन गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM) ( मा.राष्ट्रपती ,भारत सरकार यांचे कडुन जाहिर ) जाहिर करण्यात आले होते.माननिय राज्यपाल महोदयांच्या हस्ते  पदक प्रधान करण्याबाबतचा 'अलंकरण समारंभ ' सोहळा मंगळवार दिनांक :- १८ / ०२ / २०२० रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री.डॉ.पंजाबराव उगले यांना सन्मानिय राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी , महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक (PM) प्रधान करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने आज मा .पोलीस अधीक्षक  जळगाव यांच्या दालनात जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय  विभाग जळगाव - कल्पना गरीबदास अहिरे , राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष - ममताताई सोनवणे , उपाध्यक्ष - सुवर्णा  हेमकांत पवार , सरचिटणीस  -शिल्पा बाविस्कर ,उपाध्यक्ष - सुमनताई बनसोडे , उपाध्यक्ष - मनीषा देशमुख , मिनाक्षी पाटील , सुवर्णा सोनवणे यांचे हस्ते डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार करण्यात आला .

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...