शनिवार, १४ मार्च, २०२०

मातंग समाज संघ वतीने औंरंगाबाद येथे बैठकिचे आयोजन.
औरंगाबाद /प्रतिनिधी :- मातंग समाज संघ वतीने बैठक चे बैठक 
 मातंग समाज संघ चे संस्थापक अध्यक्ष मा.एडवोकेट गायकवाड साहेब यांच्या आदेशाने घेण्यात आली.हया बैठकीत खालील विषय चर्चा करण्यात आली.1) पुढील मिटिंग सर्वांना सोईस्कर रविवार या सुट्टीच्या दिवशीच घ्यावी (2)वधुवर परिचय मेळावा चे नियोजन करणे (3) बचत गट स्थापण करून बचत गटाचला आर्थिक बळकटी देणे (4)इयत्ता दहावी आणि बारावी साठी परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे (5) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सरकारी योजना बाबत मार्गदर्शन करणे. मिटिंग मधे मा श्री अरुण आव्हाड साहेब(औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष)मा श्री सिध्दांत कांबळे साहेब (औरंगाबाद जिल्हा प्रभारी) मा श्री प्रभाकर पोळ साहेब (औरंगाबाद शहर अध्यक्ष) मा सौ सविता ताई गायकवाड (औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्षा) तसेच  मा संतोष नाडे साहेब हे उपस्तिथ होते.मातंग समाज संघ- औरंगाबाद




श्री साईबाबांच्या पदकमलाने  तसेच वास्तव्याने पावन झालेल्या  सर्वप्रथम साईभक्त चांद पटेलांची कर्म  भूमी धुपखेडा वरून प्रसिद्ध होणाऱ्या "श्री साईबाबा सेवा  साधना आश्रम" संचलित "साई संस्कार "मासिके च्या वतीने मान्यवरांच्याा उपस्थितीत मा.श्री.ए.के डोंगरे (आय ए एस) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून -श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिरडी) नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच   श्री साईबाबा सेवा साधना आश्रम धुपखेडालाही भेटीचे  निमंत्रण  देण्यात आले या वेेेेळी साई संस्कार या मासिकाचे कार्यकारी संपादक : हिराजी कारके,साई भक्त वेदांत कांबळे, श्री. दशरथ तुपे ( नगरसेवक ),पत्रकार श्री किरण वाबळे इत्यादी उपस्थित होते

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

अंबड़ शहरात दुप्पट सोने करणाऱ्या  भामट्याच्या चोरांना गजा आड़
दुप्पट सोने करुण देतो असे म्हणत ऐका महिलेच्या हातात धातु देऊन फवनुक.
अंबड | अरविंद शिरगोळे दुप्पट सोने करुण देतो असे म्हणत ऐका महिलेच्या हातात धातु देऊन फवनुक तो  सोन्याचा आहे असे सांगून महिलेच्या अंगावरील सोन्याच्या पोतीवर आज दि.12 मार्च रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास अंबड बस स्थानक गेट नंबर दोन मध्ये हात साफ करुन फसवणूक करणाऱ्या भामटयाच्या चोरला तात्काळ अंबड पोलीसांनी आवळुन त्यास गजाआड केल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील राहणारी महिला नामे शोभाबाई बनन पवळ वय 47 वर्ष ही तिच्या पाहुणीच्या लग्नाला निकळंक ता.बदनापुर येथे जाण्यासाठी धाकलगाव येथून खाजगी रिक्षात अंबड पर्यंत आली. व बस स्थानक गेट नं. 2 मधुन पायी आत जात असताना तिच्या पाठी मागुन दोन अज्ञात भामटे तिच्या जवळ गेले. व तीच्या हातात सोनेरी रंगाचा धातु देऊन तो सोन्याचा आहे असे दाखवुन तिच्या गळयात 50 सोन्याचे मनी व दोन डोरले अशी असलेली पोत जिची किमत 15 हजाराची अशी दुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवून ती काढून घेतली. तेव्हा सदर महिलेस सोने म्हणून देण्यात आलेला धातु तिने इतर लोकांना दाखविले असता तो सोन्याचा नसुन धातु असल्याचे तिला सांगितल्याने तिची फसवणुक झाल्याचे तिला समजले. सदर घटणेची माहिती अंबड पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांनी तपासाचे चक्र फिरवून पो.उप.नि.सुग्रीव चाटे, जमादार विष्णु चव्हाण,पोलास कॉन्सटेबल वंदन पवार,संतोष वनवे यांना माहिती काढणे करीता शहरात रवाना केले. त्यांनी गुप्तबातमीदारामार्फत माहिती काढुन फसवणुक करणारा भामटा बंडु लक्ष्मण जाधव रा.बीड ता.जि.बीड यास शहरातील आठवडी बाजारातुन  त्यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन अंबड येथे आणून त्यास विचारपुस केली असता तो पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी अंबड पोलीसात शोभाबाई भ.बबन पवळ वय 47 वर्ष धाकलगांव ता.अंबड जि.जालना हिच्या फिर्यादवरुन कलम 420,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे करीत आहेत.

गुरुवार, १२ मार्च, २०२०

अपंग निवासी विद्यालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत इको-फ्रेण्डली होळी साजरी करण्यात आली.
जालना/प्रतिनिधि :- ज्ञानज्योत बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व अंजानी आई फाउंडेशन च्या वतिने जमना नंगर येथील अंपग
निवासी विधालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत ईको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा यानी होळीच्या शुभेच्छा देऊन होळी सन साजरा का करतात या बाबत माहीती दिली कि हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल.अशी छोटी कथा सांगुन मुलाना सागितले कि होळी सुरक्षित होळी सांजरी करा
शक्यतो रंग वापरण्या पेक्षा फुलाने होळी साजरी करावी रंग खेळतानी,त्वचा,डोळे, याची काळजी घेउन ऊत्सव साजरा करा असे ज्योती आडेकर बोलत होत्या या कार्यक्रम ला ज्योती आडेकर,विधा जाधव,रूपाली पवार गौरव जाधव जावेद भाई,पवार सर व पदाधिकारी उपस्थित होते
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न.
मादळमोही | प्रतीनिधी. दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या प्रतिवर्षी मादळमोही कर अंखड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज पारायणाचे सात दिवस आयोजन करत आसतात या दरम्यान महाराष्ट्रातील प्राख्यात किर्तन काराचे किर्तन आणी प्रवचनाचे आयोजन  करण्यात आले होते.तर काल या नाम सप्ताहाची सांगाता श्रीक्षेत्र नारायण गड मठापती .ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत ह.भ.प संभाजी बाबा तुकाराम संस्थान मादळमोही यांच्या किर्तनाने झाली.
या सप्ताह सांगता प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्ता सह माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांच्या सुविद्य पत्नी सौ.गिरिका भाबी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गेवराई तालुक्यात मादळमोही येथे  4 मार्च रोजी श्रीक्षेत्र तुकाराम संस्थान येथे आंरभ झालेला अंखड हरीनाम सप्ताह या सप्ताहाची पंरपरा पार जुनी आसुन बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायण गडाच्या शुभ आशिर्वादाने सुरु आसणार्या सप्ताहात मादळमोही कर तन.मन.धनाने आपले लक्ष केंद्रित करुन ह.भ.प शिवाजी बाबाच्या आशिर्वादाने आणी ह.भ.प.संभाजी बाबा च्या सान्निध्यात हे आध्यात्म कार्य निर्विवाद पणे सुरु आहे.या सप्ताह दरम्यान ख्यातनाम किर्तन सेवा भाविक भक्ताना मंदिरात ऐकाला मिळत आसते तर येथील तरुणाचे फार मोठे योगदान या वेळी पाहायला मीळते प्रतेक वर्षी या अध्यात्मिक कार्यक्रमात मादळमोही चे तरुण रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यक्रम राबवतात .या वर्षी तर कोरोना सारख्या रोगाचा जो धुमाकूळ माजला आहे. त्या बाबत सुध्दा जनजागृती करण्यात आली आणी ।ह.भ.प.संभाजी बाबानी तर गावकर्याचे आसणारे संस्थानवरचे प्रेम हे खुपच अप्रतिम आसल्याचा उल्लेख करत 2021 नारळी सप्ताहाची पुर्व तयारी सुध्दा गावकर्यानी चांगल्या पैकी सुरु केल्याने शिवाजी बाबानी गावाचे कौतुक हि केले आहे.याच कार्यक्रमात पैठण ची नाथशेस्टी कोरोना व्हायरस मुळे रद्द करण्यात आली या मुळे येथील वारकऱ्यांची दिंडी निघणार नाही आशी घोषणाहि मादळमोही त करण्यात आली.

बुधवार, ११ मार्च, २०२०

शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
घनसांवगी प्रतिनिधी :- अाज दि.11/03/2020 वार बुधवार रोजी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा, कुं. पिंपळगाव
 या शाळेत शालेय पोषण आहाराचा उदघाटन कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूर्ती  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके हे उपस्थित होते,तर उदघाटन म्हणून पंचायत समिती  घनसावंगी कार्यालयाचे शालेय पोषण आहार, अधीक्षक विलास काळे साहेब हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप चव्हाण, विनायक कदम  हिम्मतराव सोळंके व प्राचार्य ज्योती कोल्हे  हे उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष,उदघाटन व प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती मातेच्या  प्रतिमेचे पुजन करून उदघाटन केले.त्यानंतर विद्यार्थी मनोगत घेण्यात अाले.तसेच शाळेतील शिक्षकांनी व प्रमुख पाहुण्यांनी शा. पो.आहारा विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.  तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक यांनी शिक्षणाबरोबर शालेय पोषण आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून पटवून दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्यात आला. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन विजयकुमार काळे यांनी केले,तर अाभार दिपक सांगळे यांनी मानले.

सोमवार, ९ मार्च, २०२०


*                 विहामांडवा हिरडपुडी रोडची दुरुवस्था*
विहामांडवा /प्रतिनिधी (मोहम्मद शेख):- हिरडपुडी-विहामांडवा या रस्त्याची दुरवस्था झाली असून,हा रस्ता तत्काळ 
दुरुस्त करण्यात यावा,अशी मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे विहामांडवा व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.विहामांडवा ते हिरडपुडी रस्ता अत्यंत खराब झाला असून,या रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे.रस्त्यावरुन चालणाऱ्या मुक्कामी बसगाड्या बंद झालेल्या आहेत.गेल्या ३५ वर्षात रस्त्याचे एकदाही पुर्ण करण्यात आलेले नाही.त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे,नसता १६ मार्च आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.या निवेदनावर विहामांडवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर यांच्यासह अनेक व्यापारी व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.विहामांडवा ते हिरडपुडी या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची अशी दुरुवस्था झाली आहे.याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...