सोमवार, ३० मार्च, २०२०

              श्रीहरी पाटील डोंगरे यांनी कोरोना बचाव साठी
              आपल्या कर्जत गावात केली औषध फवारणी.
 अंबड प्रतिनिधी: आज कर्जत येथे कोरोना
व्हायरस  गावात पसरू नये म्हणून गावातील कर्तव्यदक्ष सरपंच श्रीहरी पाटील डोंगरे यांनी स्वतःगावात सानिटायझर तसेच ब्लिचिंग पावडरची ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या साहाय्याने फवारणी केली.यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग तात्या डोंगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश्वर मुंडे यांचे सहकार्य लाभले.कोरोना या संकटाला आपल्याला सर्वांना पळून लावायचे आहे त्यानिमित्ताने नागरिकांनी कुणीही घराबाहेर पडू नका.आत्याआवश्यकत वस्तूचे दुकानें वगळता इतर कोणतेही दुकानें उघडू नये,हात धुण्यासाठी डेटॉल ,सानिटायझर तसेच साबनाचा वापर करा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी श्रीहरी पाटील डोंगरे यांनी केली.

बदनापूर येथील हलदोला येथे ग्रामपंचयतीमार्फत केले धूर फवारणी
बदनापूर प्रतिनिधी:- बदनापूर येथील हलदोला 
येथे ग्रामपंचयती मार्फत केले धूर फवारणी जगभर कोरोना विषाणूने हाहाकर झाला आहे. भारत सरकारने लोकड्डाऊन केले आहे .कोरोना विषाणू रोखण्यासाठी हलदोला येथे ग्रामपंचायत ने ट्रॅक्टर द्वारे गावामधे धुर फवारणी केली.यावेळी गावतील प्रगतशील शेतकरी भारत मात्रे यांनी त्यांच्या ट्रॅक्टर ने फवारणी केली. व सरपंच उध्दव मात्रे यांनी सर्व जनतेला घरातच राहण्याचे आव्हान केले आहे .जनेकरून आपले गाव कोरोनामुक्त राहील.

    परराज्यातील नागरिकांच्या अडचणी तसेच अत्यावश्यक वस्तु संदर्भातील                      अडचणी सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

जालना, प्रतिनिधी - लॉकडाऊन मुळे अडकलेले मजूर,
विस्थायपीत झालेले कामगार, परराज्याुतील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह अन्ने, पाणी, वैद्यकीय देखभाल आदी व्यावस्थाअ जिल्हाा प्रशासन करणार आहे. सर्व संबंधीतांना त्या च ठिकाणी थांबुन प्रवासाचा प्रयत्नय न करता तालुका अथवा जिल्हाे प्रशासनास या बाबत माहिती द्यावी. तसेच बाहेर राज्याितील नागरीकांना काही अडचण असल्या स जिल्हा प्रशानाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
राज्याातील नागरीकांना काही अडचण असल्याास संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन यामध्ये  टी.ई.कराड, कामगार अधिकारी, जालना मो. नं. ९४२३१४१४२३ , ७२१८१६१६२७ तसेच अन्न्धान्यन, रेशन, दैनंदीन उपजिवीका भागविण्यानसाठी अत्यामवश्ययक वस्तूअसंदर्भात अडचणी आल्यास श्रीमती.रिना बसय्ये, जिल्हात पुरवठा अधिकारी, जालना, मो.  ९८२३७५९९९७ व संतोष बनकर, सहायक जिल्हाी पुरवठा अधिकारी  जालना, मो.९६८९००११४९ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
  जालना जिल्या मध्येह दिनांक ३० मार्च, २०२० रोजी ०९ रुग्णच नव्या९ने दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८७ रुग्ण  विलगीकरण कक्षात दाखल होते. त्या पैकी ८६ रुग्णांवचे स्वॅाब घेण्याबत आले असुन त्याणपैकी ७४ रुग्णांकचे अहवाल निगेटिव्ह९ प्राप्त झाले असुन त्या‍ रुग्णांझना डिस्चायर्ज देण्याुत आला आहे. आजरोजी ०९ रुग्णा विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांाची प्रकृती स्थिर आहे.
  रुग्णा्लयातून डिस्चा्र्ज झालेल्या  तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यतक्तीं्चे घरी अलगीकरण करण्यालत आलेले आहे. आजपर्यंत एकुण ११२ परदेश प्रवास केलेले व्य्क्तींसपैकी १११ व्य क्तीाचे घरीच अलगीकरण करण्या त आले आहे. एका व्यलक्ती्स विलगीकरण कक्षात दाखल करण्यागत आले आहे. तसेच इतर शहरे व राज्याकतून आलेल्याह ९ हजार ७०३ व्यतक्तींकचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्या त आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंधी कळेगाव येथे जंतुनाशक औषंधाची फवारणी
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंधीकाळेगाव येथील ग्रामपंचायत
पातळीवर देखील उपाय योजना करण्यात येत आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सोमवारी गावात जंतुनाशक औषंधाची फवारणी करण्यात आली. कोरोणा विषानुच्या पाशर्वभुमीवर शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर काही आवश्यक सुचना देण्यात आल्या त्यानुसार सिंधीकाळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सार्वजानिक ठिकाणी व रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात आली यावेळी ग्रामसेवक कोरके साहेब, सरपंच वसंत जोगदंड, माजी सरपंच सुभाष गिराम (आबाजी), ग्रामपंचायत सदस्य सुभाष गिराम, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मन गिराम, अंकुश जोगदंड, मोकींदा गिराम, जगन्नाथ मुळे, बाबसाहेब वैद्य, सय्यद उस्मान, आदिंची उपस्थिती होती.
   रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
                  अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा.
मुंबई, प्रतिनिधी  :-  रेशनवरील धान्य खरेदी
करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे.  सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये अवैद्य वाळूचा उपसा सुरू शासनाचे दुर्लक्ष.
वंचित बहुजन आघडीचे तालुका उपाध्यक्ष विनोद मगरे यांचा
 वतीने कार्यवाही करण्याची मागणी.
बदनापूर प्रतिनिधी :- कोरोना विषाणु मुळे 
भारता मध्ये लॉक डाऊन मुळे संपुर्ण भारतात काम काज बंद झाले. कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन बंदोबस्तात गुंतले आहे.कारखाने बंद,आठवडी बाजार बंद, कलम 144 असल्याने काम बंद आहे .पण लोक काऊन बंद काळात या संधीचा फायदा उठवत देवगांव कुसळी येथील दुधना नदी चा काही उफसा थाबत नाही कोरोना व्ह्यारस्मुळे सर्व कामकाज बंद ठेण्यात आलेले आहे व अवैध काम चालू आहे तरी   तहसीलदार व महसुल अधिकारी यांनी थोड़ लक्ष्य देण्यात यावे.व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघडीचे तालुका उपाध्यक्ष विनोद मगरे यांनी केले आहे.

छाया:श्याम गिराम

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :-जालना तालुक्यातील रामनगर येथे  सांचार बंदीच्या काळात बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना चहा व पाणी देऊन रामनगर येथील हॉटेल व्यावसायिक शकील शेख यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...