शनिवार, ११ एप्रिल, २०२०

मादळमोहित पासट गरीब कुटुंबाला पंढरिनाथ बापू लगड कडुन                   पन्नास हजाराचा किराणा मालाची वाटप

मादळमोहि (हँलो रिपोर्टर) दि.10- महाराष्ट्रात कोरोणा सारख्या महामरीचा जोर वाढत चाललाय
त्यातच सर्वत्र लाँकडाऊन परस्थिती आहे.गरीबाना घरात पैशाची व खाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.महामारीचा ऊपद्रव कधी थांबेल सांगता येत नाही. मजुरी करुन खाणारी आणी ज्याला कामही होत नाही. आशा कुटुंबातील व्यक्ती उपाशीपोटी राहु नये म्हणून मादळमोत माजी सभापती श्री पंढरीनाथ लगड यांनी बीड जिल्यात सुरु आसणारे लाँकडाऊन व सोशल डिस्टंट चा नियम पाळत मादळमोहि च्या पासस्ट कुटुंबात पन्नास हजार रुपयाचा किराण हँलो रिपोर्टर संपादक चंद्रकांत हक्कदार. मादळमोहि पोलीस जमादार सोनवणे पो .काँ.गणेश गुरखुदे. पत्रकार रामकिसन तळेकर लक्ष्मण सरपते आंगणेवाडी सेविका गमेबाई.संगिता वखरे. टाकसाळ मँडम सौ.केशरबाई लगड यांच्या हस्ते .पंढरिनाथ लगड(बापू)यानी स्वतःच्या निवासस्थानी शिस्तबद्ध पध्दतीने 10 एप्रिल रोजी हा समाजीक ऊपक्रम राबवला आहे.
योग्यवेळी योग्य मदत हेच खरे समाज कार्य-
बीड जील्हयात कोरोना या महामारी आजारा मुळे सरकारने लाँकडाऊन घोषित केले आहे.पंधरा दिवसाचा कालावधी लोटलाय संचारबंदी कायम आहे.गरीबा सह श्रीमंतानी ही आपल्याला घरात कोंडुन घेतले आसुन यामध्ये गरीबाकडील पैसा आन्नधान्य.जवळ आसणारा पैसा कधीच संपला कुटुंब प्रमुख हताश झाला आहे.शासनाने मोफत रासेन ची घोषणा केली पण ती कधी पदरात पडणार या विंवचनेत सध्या गरीब लोक आहेत.म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जी.प.चे माजी शिक्षण सभापती पंढरिनाथ लगड यांनी आंगणेवाडी सेविकेला गावातील आतीशय गरीब कुटुंबाचा सर्व करण्यासाठी सांगितले त्यात संख्या हि अदिकच होती.पण त्यातील  40 लाभधारक निवडली पंरतु माल वाटप करताना मात्र पासस्ट कुंटुबाला किराणा द्यावा लागला.
स्वतः ची पन्नास हजाराची एफ.डी.तोडून केली गरीबाला मदत
लगड यांनी विचार केला कि आज गरीब लोक संकटात आहेत . मी जरी आज घरात दोन टाईम सुखात खात आसेल पण माझे गावातील गरीब कुटुंबातील कोणी ऊपाशी झोपु नयेत.गहु.तांदूळ. रासेन चे मिळाले पण त्यांच्या ईतर किराणा मालाचे काय याचा विचार केला व पन्नास हजारात  .एक एक लाभ धारकाला दोन कि.साखर दोन कि.तेल  .तिखट.शेंगदाणे. चाहापुडे आंगाच्या .व कपड्याच्या साबणी सह किमान दोन महिने पुरेल ईतका कीराणा दिला आसल्याने सदरील माल घेताना आनेकांच्या चेहर्यावर एक प्रकारे समाधान दिसत होते. कुठल्याही पदावर आथवा सत्तेत नसताना हि.गरीबाच्या घरात आशा संकट समयी जो नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता धाऊन येतो तो व्यक्ती लोक विसरत नाहित.
आता ऊर्वारित गरीब कुटुबासाठि मादळमोहित कोणी दाता पुढे येईला काय?
दोन दिवसा पुर्वि कैलास भुजबळ यांनी मोफत रासेन  400 कुंटुबाला वाटप केले लगड यांनी पासस्ट गरीब कुटुंबात किराणा वाटला आहे.आता बाकीच्या गरीब कुटुंबाला समाजातील दानशुर व्यक्तीने पुढे येऊन मदत करावी आशि विनंती गेवराई तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येते.
 या सामाजिक ऊपक्रम यशस्वी करण्यासाठी आजीत वर्मा. सुरज लगड.आक्षय.किरण. लगड.विनोद भोपळे. हरिभाऊ जगताप. दत्ता तळेकर. माऊली दुधाळ.यांनी मोलाचे सहकार्य केले.

     एक मदतीचा हात

गरजूंना अन्नधान्य वाटप
गेवराई, प्रतिनिधी :- शिरसमार्ग येथील ग्रामपंचायत अंतर्गत मौ. सिरसमार्ग,तरटेवाडी,काळवाडी येथे कोव्हीड-१९ च्या अनुषगाणे करण्यात आलेल्या लॉकडाऊन  मुळे अनेक जनाचे रोजगार  बुडाल्यामुळे अनेक कुटुंब आज् उघड्यांवर आले आहेत त्याच जाणिवेतून सिरसमार्ग ता. गेवराई येथील तलाठी अशोक डरफे व ग्रामसेवक बाबासाहेब कूडके  यांनी गावातील प्रतिष्ठित  नागरिक तसेच सरपंच यांचेशी चर्चा करून "एक् हात मदतीचा" असा कार्यक्रम हाती घेतला आणि सर्व लोकांनी या मध्ये हिररीने सहभाग नोंदवला त्या कार्यक्रमाआंतर्गत आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून घरोघरी जाऊन ज्याला जे शक्य  होईल तितकी मदत करण्याचे आव्हान करण्यात आले त्या मध्ये अनेक दानसुर लोकांनी आपल्या मदतीचा हात दिला कोणी तांदूळ कोणी गहू कोणी  पैश्याच्या स्वरूपात मदत केली त्यामधून तबल ७० गरजु कुटुंब निवडून त्यांना एक महिना पुरेल येवढे राशन व किराणा आज् दि. ११ वार् शनिवार रोजी सकाळी ११:०० वाजता  मा. उपविभागीय अधिकारी बीड श्री टीळेकर साहेब यांच्या हस्ते  घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. यां वेळी गेवराई पोलिस स्टेशनचे एपीआय काळे साहेब, मंडळअधिकारी मादळमोही साळुंके साहेब ,तलाठी डरफे, ग्रामसेव कुडके, सरपंच वखरे उपस्थित होते यावेळी समितीला मार्गदर्शन करताना  माननीय टिळेकर  साहेब  यांनी  गावातील  एकजुटीचे  व राबवलेल्या उपक्रमाचे  कौतुक केले तसेच या जागतिक संकटाला घरी राहून सुरक्षित राहून हरवण्याचे आव्हान केले. तसेच एपीआय  श्री काळे साहेब यांनी देखील उपक्रमाचे कौतुक करून  सर्वांना घरी राहण्याचे व पोलीस  प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले ग्रामसेवक बाबासाहेब कुडके यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले तसेच समितीमध्ये  असणारे  व सहकार्य करणारे पंचायत समिती सदस्य अनिल पवळ, सरपंच महारुद्र वखरे, माजी सभापती पांडूरंग कोळेकर,सोमेश्वर गचांडे, सुहास पवळ, दिनेश गुळवे, सुरेश मार्कड, काकासाहेब काळे ,भास्कर मार्कड ,नागेश रडे,शेख दस्तगिर, बंडू देवकर, गुलाब मगर,संचार उमाप,ऋषिकेश परदेशी,व सर्व गावकर्याने खुप सहकार्य केले.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०


शहरातील दु:खीनगर भागातील 7 हजार 22 व्यक्तींचे सर्व्हेक्षण पुर्ण
              16 एप्रिलपर्यंत सर्व्हेक्षण सुरुच राहणार
जालना, प्रतिनिधी – जालना शहरातील दु:खी नगर परिसरात 20 पथकाच्या सहाय्याने 1 हजार 175 कुटूंबातील 7 हजार 22 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असुन हे सर्व्हेक्षण 
16 एप्रिल, 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती जिल्ह्यात एकच कोरोनाबाधित असलेल्या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या सामान्य रुग्णालयातील 17 कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असुन त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  दि. 6 एप्रिल रोजी कोरोना बाधित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आतापर्यंत 159 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन 15 व्यक्तींना अटक करण्याबरोबरच 15 वाहने जप्त करण्यात आली आहेत तर 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 499 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 131 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 305 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 22 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 306 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 267, रिजेक्टेड नमुने-03, एकुण प्रलंबित नमुने-34 तर एकुण 174 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 5, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 72 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या शुन्य, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-5, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या निरंक, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 131, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या            67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 

a
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

           राशन दुकानदारांकडून ग्राहकांची सरास लूट
         एका कार्ड धारकाकडून 5 किलोचे अन्न लंपास
                  हा काळा बाजार थांबणार कधी

  
जालना / प्रतिनिधी :- जालना तालुक्यात राशन दुकानदारांकडून गरीब ग्राहकांची सर्रास लूट करण्यात येत आहे.प्रत्येकी ग्राहकाकडून 5 ते 10 किलो चे धान्य दुकानदार 
लंपास करीत असल्याचे निदर्शनात आले.
शहराचा धान्य पुरवठा हा ग्रामीण भागात वितरण होत असल्याचे निदर्शनात आले आहे.शासनाकडून प्रत्येकी व्यक्ती 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ देण्यात येते परंतु स्वस्त धान्य दुकानदार हे प्रत्येकी कार्ड मागे 5 ते 10 किलो धान्य ग्राहकाकडून लंपास करून ग्राहकांची लूट करीत आहे.तसेच जालना शहरातील दुकान नंबर 44 चा धान्य हतवन येथील दुकान नंबर 157 मध्ये या धान्याची काळ्या बाजाराने विक्री होत असल्याची बाब लक्षात आली असता या दुकानदाराला जालना तालुका पुरवठा अधिकारी राजमनी यांच्या समोर हजर करण्यात आले.हा काळ्या बाजाराची त्याच्या समोर उघड झाला आहे.देश भरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे यामुळे देशभरात लोकडाऊन करून सचारबंदी लादण्यात आली आहे.यासाठी गरिबांचे हाल होऊ नये त्यांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. अन्नधान्य हा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विविध संघटना हे गोर गरिबांसाठी जेवण अन्नधान्य हे मोफत पुरवठा करत आहे.आणि दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदार याचा गैरफायदा घेत आपली घरे भरत आहे.गोरगरीब जनतेची पिळवणूक करीत आहे.याला शासनाने कुठेतरी आळा घालावा नसता गरीब जनतेवर उपासमारीची वेळ येईल.जालना तालुका पुरवठा अधिकारी राजमनी यांनी असं जर कुठे आढळून आल्यास याची तक्रार करावी जेणे करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना राजमनी म्हणाले की,मे व जुनचा पुरवठा हा रास्त भावानेच होईल तोही उद्यापासून त्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे त्यात तांदूळ हे शासनाकडून मोफत देण्यात येणार आहे त्याचे कोणतेच पैसे घेण्यात येणार नाही ते मोफत देण्यात येईल.जर कोणी दुकानदार त्याचे पैसे लादत असेलतर त्याची तक्रार करावी त्याच ठिकाणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
             साध्या पद्द्तीने महात्मा फुले जयंती साजरी करवी.

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- महात्मा ज्योतिबा फुले यांची सार्वाजानिक जयंती 11एप्रलि रोजी असुन ती आपल्या घरातच कुटूंबासोबत साजरी करावी, 
असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष संजय गिराम यांनी केले आहे. देशावर कोरोनाचे संकट आहे. सर्वांनी घरातच फोटोची पुजा करावी.सध्या जगावर कोरोना सारख्या माहामारीचे संकट आहे आणी हजारो लोक म्रुत्यु मुखी पडले आणी हजारो लोकांना याची लागन झालेली आहे हीच परिस्थिती लक्षात घेता भारतात सुध्दा 14 एप्रिल पर्यंत संचार बंदी घालण्यात आली आहे . महात्मा जोतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करावी व सरकार ला सहकार्य करावे असे महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष संजय गिराम यांनी सांगितले.

             पोलीसांनी तयार केली सॅनिटायझर व्हॅन
             पोलिसांसाठी देखील सॅनिटायझर व्हॅन!
पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निर्मिती
जालना,प्रतिनिधी :- जीव धोक्यात घालून 
ही रक्षण करणाऱ्या पोलीसांचे संरक्षण व्हावे म्हणून जालना पोलीसांनी सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती केली आहे. एका पोलीस व्हॅनचे रुपांतर सॅनिटायझर व्हॅनमध्ये केले असून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी या व्हॅनमधून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेकडून या व्हॅन ची निर्मिती करण्यात आली आहे.कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना एका प्रकारे सुरक्षा कवच मिळाले आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही व्हॅन तयार केली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, प्रशांत महाजन आणि बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक संजय व्यास या तिघांच्या प्रयत्नांमधून ही व्हॅन तयार झाली आहे.व्हॅनच्या आतमधील सर्व बाजू प्लास्टिकने बंद करुन शेती आणि यंत्र अन्य कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पिंकलरच्या साह्याने यांमधून सॅनिटाझरची शरीरावर फवारणी होते. शहरातील सर्व भागांमध्ये फिरून त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसाठी ही व्हॅन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा विशेष शाखेने केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनातून त्यांचे कौतुकही होत आहे. अतिरीक्त पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी बोलताना या व्हॅनची माहिती दिली.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

          धर्माबाद नगर परिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व  सीमा बंद; बाहेरच्यांना लोकांना शहरात नो एन्ट्री
धर्माबाद( भगवान कांबळे) :-कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस स्टेशन 
व नगर परिषद च्या वतीने धर्माबाद शहर आता शिल करण्यात आले  आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत तालुक्यात व शहरात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या लोकांमळे हा आजार आपल्या शहरात व तालुक्यात  पसरू शकतो या भीतीने काही गावांनी आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे सोमवारी सरकारने राज्यात संचारबंदीसह जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जिल्ह्यात अकडून पडलेत. तर, गावकऱ्यांनीही सीमा बंद केल्याने गावातही जाताना अडचण येत आहे. दरम्यान, गावाकडे आलेल्या नागरिकांशी सौजन्यावे वागण्याचं आवाहन धर्माबाद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे  यांनी केलं आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला. सोबतच जिल्ह्यातील सीमाही ऐकमेकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या आहेत.
                      तालुक्यातील काही गावतही सीमाबंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून धर्माबाद  तालुक्यातील ब-याच  गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे.  राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...