रविवार, २४ मे, २०२०

[24/05, 4:55 PM] Chandrakant Hakkdar: https://helloreporter108.blogspot.com/2020/05/blog-post_328.html
[24/05, 6:56 PM] Gaikawd Mangaw. (Raigad): गेली अनेक वर्षांपासून तुटलेल्या  पुलामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिक नवीन पुलाच्या प्रतिक्षेत

     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  माणगांव तालुक्याच्या खरवली ते बोरघर पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि या विभागाती सर्व सामान्य नागरिकांना नदीच्या पलीकडे असलेल्या आपापल्या शेतावर आणि नाईटणे, बोर्ले, सुर्ले आणि मोर्बा इत्यादी ठिकाणी आपल्या कामासाठी उन्हाळ्यात आणि   पावसाळ्यात जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या चेरवली आणि नाईटणे दरम्यान च्या नदी वरील पुल जीर्ण झाल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून नदी पात्रात तुटून पडला आहे. त्यामुळे या पुलावरून नदीच्या अलिकडे आणि पलिकडे दोन्ही बाजूला आपापल्या कामानिमित्त येजा करणार्या शेतकरी कामगार, शेतमजूर आणि सर्व सामान्य  नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी नवीन पुलाच्या प्रतिक्षेत आहेत. 
      सदर पुल सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात काळ प्रकल्प सिंचन विभाग तथा कालवा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. कारण काल प्रकल्प विभागाने माणगांव तालुक्यातील खरवली विभागातील खरवली, चेरवली, पेण तर्फे तळे, नाईटणे, सुरव, बोर्ले, सुर्ले, मोर्बा, देगाव, महादपोली, दहिवली, गोरेगांव इत्यादी ठिकाणच्या शेतकर्यांची एक पिकी जमीन ओलीताखाली आणून ती दोन पिकी तथा दुबार पिकी करून या विभागातील शेतकर्यांना समृद्ध करण्यासाठी या विभागातून सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात कालवा खोदून सदर कालव्याच्या माध्यमातून या विभागातील शेतीला पाणी सोडण्यात आले. 
      सदर कालवा माणगांव तालुक्यातील खरवली विभागातून पुढे मोर्बा विभागातील गावांकडे नेण्यासाठी चेरवली आणि नाईटणे दरम्यान असलेल्या नदीचा या काल प्रकल्पात अडसर ठरत होता. यावर मात करण्यासाठी या प्रकल्पातील तत्कालीन अभियंत्यांनी सदर नदीच्या खालून भूयारी पद्धतीने पुढे कालव्याचे पाणी नेण्याची व्यवस्था केली. व या कालव्याची पुढे देखभाल करण्यासाठी सदर कालव्याला सर्वत्र समांतर रस्त्याची निर्मिती केली. व सदर नदीवर पूल बांधला. या पुलाच्या माध्यमातून या विभागातील नागरिक नदीच्या दोन्ही बाजूला आपापल्या शेतावर कामासाठी आणि मोर्बा बाजारपेठेत जाण्यासाठी व या विभागातील गावांमध्ये दळणवळणासाठी येजा करत होते. मात्र गेली दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सदर पुल जीर्ण झाल्यामुळे नदीच्या पात्रात मध्यभागी कोसळून पडला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत या तुटलेल्या पुलावरून जीवघेणी कसरत करून येजा करत आहेत. या मधून संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. आणि जीवीत हानी सुद्धा नाकारता येत नाही. या तुटलेल्या पुलाकडे
 संबंधित विभागाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेली अनेक वर्षे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या विभागातील सर्व शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या पुलाच्या प्रतिक्षेत आहेत.
*अनैतिक संबधातून पत्नीसह दोन मुलांची हत्या*

बीड : शहरातील शुक्रवार पेठ परिसरामध्ये आईसह दोन लहान मुलांची रविवारी (दि.24) दुपारी हत्या करण्यात आली. सदरील घटनाही पत्नीच्या अनैतिक संबधातून घडली असून या घटनेने जिल्हाभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सशंयित म्हणून एकास ताब्यात घेतले आहे.
     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता संतोष कोकणे (वय 35), सिद्धेश्वर संतोष कोकणे (वय 9) व मयुर संतोष कोकणे (वय 6) अशी मयतांची नाव आहेत. संगीता व सिद्धेश्वर यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आली तर मुयरचा मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये आढळून आला. यांना दगडाने किंवा बॅटने मारहाण केली असाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरील प्रकार हा अनैतिक संबधांतून घडला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास गेलेल्या संतोष कोकणे यास पोलीसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व पोलीस दाखल झाले असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
*उर्वरित शेतकऱ्यांच्या शासकीय कापूस खरेदीची ऑनलाईन नोंदणी तात्काळ सुरू करा-पूजा मोरे*

*कारणे दाखवुन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस खरेदी केंद्रावरून परत पाठवू नका*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूसाची खरेदी उद्यापासून सुरू होणार असली तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या कापसाची ऑनलाईन नोंद झालेली नाही.त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचलच्या कापसाची सुद्धा तात्काळ ऑनलाईन नोंदी घेऊन तो कापूस  शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे व मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील एकुण १६ कापुस खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी ग्रेडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या.विभागीय कार्यालय, परळी वै.जि.बीड यांचे नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज दि.२६मे २०२० पासुन करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. त्यानुसार 13 मार्च पर्यन्त प्राथमिक कापूस नोंदणी केलेल्या  24,921 शेतकऱ्यांपैकी उर्वरित 21,000 शेतकऱ्यांची कापूस खरेदी 26 मे पासून सुरू होत आहे परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी झालेली नाही.त्या शेतकऱ्यांचा कापूस सरकार घेणार की नाही ? असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खुलासा करणे गरजेचे आहे.व नोंदणी न झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांची तात्काळ ऑनलाईन कापूस नोंदणी सुरू करून 13 मार्च पूर्वी नोंदी केलेल्या शेतकऱ्याच्या पाठोपाठ लगेच कापूस खरेदी करणे गरजेचे आहे.

तसेच 13 मार्च पूर्वी केलेल्या नोंदणी नुसार शेतकरी कापूस विक्रीसाठी केंद्रावर जात आहेत परंतु त्यांचा कापूस काही तरी कारण दाखवून खरेदी केंद्रावर गेल्यावर ग्रेडर अपात्र ठरवत आहे अश्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत.त्यामुळे आता या कापसाचे करायचे काय?कापूसच खरेदी झाला नाही तर वाहतुकीचा खर्च द्यायच्या कुठून?वाहनात कापूस भरणाऱ्या मजुरांचा खर्च करायचा कुठून? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.तरी ग्रेडरने त्या कापसाच्या ग्रेड नुसार भाव ठरवून तो खरेदी केंद्रावरच खरेदी करून घ्यावा.कोणत्याही शेतकऱ्याला कापूस खरेदी न करता परत पाठवु नये.अन्यथा शेतकरी पुन्हा दलालांच्या तावडीत सापडतील व पांढरे सोने मातीमोल भावात विकण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय रहाणार नाही व या अडचणीच्या काळात बी- बियाणे कसे खरेदी करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावेल व त्यातून शेतकरी आत्महत्याना प्रोत्साहन भेटू नये व  "सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचं मरण"ठरू नये म्हणून तात्काळ ग्रेडनुसार सरसकट शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा.व नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या तात्काळ नोंदी करून घ्याव्यात व जिल्ह्याधिकारी यांच्या मार्फत तसा खुलासा लवकरात लवकर करण्यात यावा.अशी मागणी स्वाभिमानीच्या पूजा मोरे व गजानन बंगाळे यांनी केली आहे.

शुक्रवार, २२ मे, २०२०

विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात महाविद्यालयांना सुचना


जालना,प्रतिनिधी:- सर्व महाविद्यालय प्राचार्य, महाविद्यालये, विद्यार्थ्यांना संस्था प्रमुखांनी आपल्या महाविद्यालय, संस्थेत सन 2019-20 शैक्षणिक वर्षात प्रवेशित अनु- जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी ज्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच विद्यावेतन योजनेचे अर्ज ऑनलाईन प्रणालीhttp://mahadbtmahait.gov.in यावर भरण्यात आलेल्या अर्जापैकी मोठ्या प्रमाणात अर्ज महाविद्यालयाचे लॉगिनवर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.**
            सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था प्रमुखांनी सन 2019-20 शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन नोंदविलेल्या अर्जापैकी परिपुर्ण स्वरुपात पात्र अर्ज मंजुर करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या लॉगिनवर पाठविण्यासाठी दि. 26 मे, 2020 ही अंतीम तारीख असल्याचे ऑनलाईन प्रणालीवर कळविले आहे. सदरील अर्जापैकी त्रुटीचे अपात्र मंजुर केल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. तसेच अनुसुचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत मंजुर झाले नसल्याने शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य पुर्णत: जबाबदार राहतील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित व्दितीय टप्प्याची उपस्थिती नोंदवुन मंजुरी बाबत ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज या कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावेत, असे आवाहन कार्यलय अधीक्षक, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या 860 नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना



जालना,प्रतिनिधी:- लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकुन पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोय करण्यात येत असुन यापूर्वी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातुन  उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे.  आज दि. 22 मे रोजी 1400 नागरिकांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरु झाल्याने बऱ्याचशा बिहारी नागरिकांनी या कंपनीमध्ये स्वत:हुन थांबणे पसंत केल्याने प्रवासासाठी आलेल्या 860 एवढ्या नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झाली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत शिस्तबद्धरितीने नियोजन करण्यात येत असुन या कामामध्ये जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करत असुन दि. 22 मे रोजीच्या विशेष रेल्‍वेसाठीही जिल्‍हा प्रशासनाने अत्यंत चोख असे नियोजन केले होते.  बिहार राज्यामध्ये येण्यासाठी बिहार सरकारकडून लेखी  परवानगी प्राप्‍त करुन घेत कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली.  शासनाच्या निर्णयानुसार या सर्व नागरिकांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या तिकीटाचे पैसे प्रशासनामार्फत अदा करण्यात आले. जालना शहरामधून जाणाऱ्या नागरिकांना व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकुन पडलेल्या या मजुरांना  जालना रेल्वेस्टेशनपर्यंत आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. प्रवास करणा-या मजुरांची सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातुन रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणा-या  या रेल्वेचे  पुर्णपणे ‍निर्जंतुकीकरण करण्यात येवून प्रवास करणा-या प्रत्येकाने चेह-यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. रेल्वेमधुन पाठविण्यात येणा-या प्रवाशांना सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले होते. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करुन  त्यांच्यासोबत खाद्य पदार्थही देण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार श्री सोनवणे, बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक श्री महाजन यांच्यासह महसुल,  रेल्वे, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोरोना पार्श्वभूमीसह सर्वच पातळीवर राज्य सरकार अपयशी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन



परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

शेताच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून मागील सहा महिन्यापासून सरकार अस्तित्वात आल्यानंतर देखील फक्त विकास कामांना स्थगिती देण्याचे काम राज्य सरकारकडून करण्यात आले आहे अद्याप पर्यंत एक रुपयाचेही काम संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही झालेलं दिसून येत नाही कोरोना पार्श्वभूमीसह सर्वच पातळीवर राज्य सरकार अपयशी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन केले असून सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करत अनेक कुटुंबांनी जाब विचारला आहे, परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात महाराष्ट्र बचाव आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळाला अशी माहिती माजी मंत्री आमदार बबबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आज राज्य सरकार कडून शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात नाही, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करू म्हणत शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप नाही, रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नाही, केंद्र सरकार ने शेतकऱ्यांसाठी कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) सुरू आहे परंतु नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे शक्य नसल्याने राज्यसरकार ने कापूस खरेदी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे असे असताना राज्य सरकार त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही लोणीकर यांनी यावेळी सांगितले

फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात नाही, बांधकाम कामगारांना हक्काचे अनुदान नाही, नाभिक बांधव किंवा गटई कामगार यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, हातावर पोट असणाऱ्या लहान व्यवसायिकांना हमाल मापाडी प्रवर्गात काम करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत सरकारकडून झालेली नाही. कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर नर्स पोलीस स्वच्छता कर्मचारी यांना आरोग्य विभागाकडून किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली गेलेली नाही उलट त्यांचा पगार किंवा मानधन कपात करण्याचे पाप या सरकारने केले आहे असे लोणीकर यांनी स्पष्ट केले

अनेक स्थलांतरित लोक जे बाहेरगावी कार्यरत होते ते लोक लॉकडाउनच्या काळात गावाकडे परत आले असून त्यांना आज शासनाकडून शिधा पत्रिका देऊन धान्य वाटप करणे गरजेचे आहे परंतु अनेक लोकांकडे रेशन कार्ड नाही विलगीकरण कक्षामध्ये स्थलांतरितांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही. नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे त्या लोकांना कापूस खरेदी केला नसेल तर अनुदान देणे आवश्यक आहे त्या लोकांना कोणत्याही प्रकारचे अनुदान दिलेले नाही यापूर्वी भाजपा सरकारने तुरीची नोंदणीकृत शेतकऱ्यांना १००० रुपये मदत केल्याची आठवण करून दिली. सरकार स्थापन झाल्यापासून अनेक विकासकामांना केवळ स्थगिती आणि स्थगिती दिली जात आहे त्यामुळे जनतेचा शासनावरील विश्वास उडाला आहे. महाराष्ट्र हा साधुसंतांचा महाराष्ट्र असून याच महाराष्ट्रात साधुसंतांची निर्घुन हत्या या सरकारच्या काळात घडते आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे सरकार संपूर्णपणे असमर्थ ठरले आहे असेही लोणीकर यांनी यावेळी म्हटले आहे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारचा लक्षात करून ठेवता अनेक योजना राबवल्या गेल्या होत्या परंतु सरकार स्थापन होतात या सरकारने या योजनेत खोडा घालत लक्ष घातले आहे खरे पाहता या योजनेसाठी प्रचंड पैसा उपलब्ध आहे तरीदेखील लक्षांक फक्त शासनाची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट होत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन मुळावर आला आहे काय असा सवाल यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. मराठवाड्यासाठी वरदान ठरणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीडला स्थगिती देण्याचा महापाप या सरकारने केला असून मराठवाड्याची जनता या तीघाडी सरकारला कधीही माफ करणार नाही असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.

स्थलांतरित लोकांना गावी परत येण्यासाठी आपण स्वतः पत्रव्यवहार केला असून राज्यपाल महोदय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी 9 मे रोजी मोफत बसची व्यवस्था केली होती परंतु सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे की काय मोफत बसची व्यवस्था 11 मे रोजी पुन्हा एकदा परिवहन मंत्र्याला कोणत्याही प्रकारची माहिती न देता रद्द करण्यात आली ही अत्यंत खेदाची बाब असून त्यामुळे अनेक लोकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे ही बाब सर्वसामान्य जनता विसरणार नाही असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. लॉकडाऊन काळात लहान-मोठ्या व्यवसायिक दुकानदारांची दुकाने पूर्णतः बंद असताना देखील महावितरण कंपनीकडून या दुकानदारांना सरासरी स्वरूपात वीज दिले जात आहे ते वीजबिल माफ करण्यात यावे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे परंतु सरकार कोणत्याही मागणीकडे लक्ष देत नाही अशी खंत यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली.

पेरणीचे दिवस जवळ आलेल्या असताना शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे कर्ज पुरवठा झाला नाही तर या सर्व शेतकऱ्यांना पेरणी साठी लागणारा पैसा उपलब्ध करण्यासाठी सावकाराच्या दारात जाणे भाग पडणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते ही बाब अत्यंत चिंताजनक असून सरकारला मात्र याबाबत अजिबात गांभीर्य नाही असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनच्या काळामध्ये महिला बचत गटांना दिलेले कर्ज माफ करण्यात यावे अशा प्रकारची मागणी देखील आपण महाराष्ट्र सरकारकडे केले आहे लोकांच्या काळात सर्व व्यवसाय बंद असताना बचत गटांना देखील कोणत्याही प्रकारचे काम उरले नाही त्यामुळे सर्व महिला बचत गटांचे कर्ज भरण्याची परिस्थिती आज रोजी तरी नाही म्हणून महिला बचत गटांचा कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली होती परंतु अद्याप पर्यंत त्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतलेली नाही म्हणून अशा निर्लज्ज आणि दळभद्री महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र बचाव आंदोलन केले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यासाठी अनेक कुटुंब आपल्या अंगणात समोर उभे राहून सरकारचा निषेध नोंदवताण दिसून आले त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन केले गेले असल्याची माहिती देखील यावेळी बबनराव लोणीकर यांनी दिली

एवढे करुन देखील सरकारला जाग येणार नसेल व सरकार लोकहित उपयोगी काम करणार नसेल आणि आपल्या कुंभकर्ण झोपेतून सरकार जागे होणार नसेल तर याहीपेक्षा अधिक आक्रमकपणे आंदोलन करून सरकारला जाब विचारला जाईल असेदेखील आमदार लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
*बीडमध्ये तलवारी जप्त*
  बीड : शहरातील पालवन चौक परिसरामध्ये एका घरातून तलवारीसह इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.22) दुपारच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार पालवन चौक येथील मस्के वस्तीवर करण भिमसिंग टाक याने तो राहत असलेल्या राजु महासिंग टाक यांच्या घरी अवैध शस्त्रसाठा केला असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेने घराची झडती घेतली यावेळी करण भिमसिंग टाक याने त्याचा चुलता करण भिमिंसंग टाक यांच्याघरामध्ये  चार तलवारी, दोन धारदार सुरे, एक रामपुरी चाकू, एक छर्‍याची गण असा 14 हजार 200 अवैध शस्त्रसाठा पोलीसांनी जप्त केला. आरोपींवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 4/25 भारतीय हत्यार कायदासह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यातील राजु टाक यावर विविध प्रकारचे 16 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भरत राऊत, पोउपनि.गोविंद एकिलवादे, पोह.तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, मुजंबा कुवारे, विकास वाघमारे, नरेंद्र बांगर, महिला कर्मचारी जयश्री नरवडे, चालक संजय जायभाये यांनी केली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...