रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

शेतकऱ्याची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ  बदनापूर तहसील कार्यालयावर 25 तारखेला धरणे आंदोलन बदनापूर भाजपाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी घेतली पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन
बदनापूर (प्रतिनिधि):- बदनापूर येथील विद्यमान आमदार ना.रायण कुचे नारायण कुचे दिनांक 22 रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की 25 फेब्रुवारी सकाळी11:ते 3:00 यावेळेस या सरकारच्या
  निशा अर्थ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.ते म्हणाले की जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे मंगळवारी दिनांक 25 फेब्रुवारी 2020 बदनापूर येथे तहसील कार्याल समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी माहिती आमदार नारायण कुचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 आमदार नारायण कुचे म्हणाले की भाजपाचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने प्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी  ग्रस्तांना.25000 आणि फळबागासाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती पण महा विकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाला विसर पडला आहे.सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास नेत्यांनी या पैकी एकही आश्वासन पाळले नाही महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे महा विकास आघाडी सरकारे शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही दोन लाखावर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबाबत महा विकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत असल्याचा उल्लेख नाही भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस ,शेडनेट, शेती उपकरण,पशुपालन, शेळीपालन,मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता भाजप सरकारच्या व्यापक कर्जमाफी मुळे 43 लाख खातेधारांना 19 हजार कोटीची लाभ देण्यात आला होता.तूर खरेदीची निकष महा विकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्याकडून होणारा खरेदीची प्रमाण खूप कमी काम झाले आहे. शेतकर्‍यांची घोर फसवणूक करणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहे असे आमदार नारायण  कुचे म्हणाले त्यांनी सांगितले की गेल्या महिनाभरात राज्यातील महिला वरील अत्याचाराच्या घटनांमुळे मोठी वाढ झाली आहे.महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महा आघाडी सरकारची मंत्री सत्कार घेण्यात गावोगावी मग्न आहे.हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे ॲसिड हल्ला अल्पवयीन मुलीवर अत्याचार बलात्कार महिलांना जाळून टाकणे अशा घटना घडू लागल्यामुळे महिला-तरुणी मुलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महा विकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करीत आहे  पुढे नारायण कुचे यांनी सांगितले की मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, बदनापूर विधानसभा आमदार नारायण कुचे, तसेच भाजपा तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी ,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीच्या संचालक, सरपंच उपसरपंच, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख ,भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थितीत  धरणे आंदोलन धरणे तहसील कार्यालय येथे  होणार आहेत.
या पत्रकार परिषदेत उपस्थित भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष भुजंग महाराज, तसेच शहराध्यक्ष महेशजी लड्डा, सत्यनारायण गिल्डा ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान जी मात्रे ,नगरसेवक बाबासाहेब कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...