रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्रातील आरोग्यसेवकाच्या बळकटीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अधिकचा निधी मिळवा -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री कडे मागणी.

मुंबई, (प्रतिनिधी):- दि.२३: महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला बळकटी मिळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी करतानाच मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात इंटर्नशीप करावी. जेणेकरून विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी होता येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.देवनार येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या शैक्षणीक आणि प्रशासकीय इमारतीचा भूमीपुजन सोहळा झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. केंद्रीय सचिव प्रिती सुदान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संस्थेच्या इमारतीच्या कामाचे केंद्रीय आरोग्यमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की,  एकमेव अशा या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संशोधनाचे कार्य अभिनंदनीय आहे.  संस्थेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात इंटर्नशीप करण्या करीता आले पाहिजे. आम्ही  त्यांचे स्वागतच करू. आरोग्य विषयक ज्या राष्ट्रीय योजना आहेत त्यांचा नेहमी सर्वे केला जात असतो त्यामध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग झाल्यास नक्कीच त्याचा फायदा या योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी होऊ शकतो.या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. संस्थेने केलेल्या संशोधनाचा फायदा त्यांना मिळू शकेल.त्याचबरोबर आरोग्य विषयक योजनांच सामाजिकदृष्ट्या लेखापरिक्षणही करावे, अशी मागणी श्री. टोपे यांनी यावेळी केली.कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावशाली-केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. सर्वांसाठी आरोग्य या जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी आपला देश प्रयत्नशील आहे. आरोग्य सेवेच्या आपल्या देशाचं हे मॉडेल अन्य देशांकडूनही राबविले जाईल, असेह त्यांनी यावेळी सांगितले. बाळंतपणा दरम्यान एकाही महिलेचा मृत्यू होऊ नये आणि देशातील अकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याध्येयाने काम केले जात आहे. या आंतरराष्ट्रीय संस्तेतील तरूण विद्यार्थ्यांनी संशोधनातून नविन योजना आरोग्य क्षेत्रात पुढे आणाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...