शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

मातंग समाजाच्या आत्याच्यार प्रकरणाकडे लक्ष घालणार - मा.राज ठाकरे
साठे युवा मंचाचे अध्यक्ष डॉ.साबळे यांच्या वतीने मा.राज ठाकरे यांना निवेदन सादर
सिल्लोड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षा पासून राज्यातील अल्पसंख्याक हिंदू मातंग समाजाच्या महिला, पुरुष,  युवतीचे  खून,  बलात्कार , मारहाण अशा अत्याचाराचा घटना वाढत चाललेल्या असून मातंग समाज असुरक्षित झाला आहे. राज्यातील अकोला, नांदेड, जालना, औरंगाबाद आदीसह इतर जिल्ह्यात समाजाच्या महिला, पुरुषावर अन्याय अत्याचार करीत खून करण्यात आले आहे. मातंग समाजाच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.  या संदर्भात विश्वसाहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्यावतीने म्हणून डाँ. सचिन साबळे यांच्या नेतुत्वा खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांना राज्यातील हिंदू मातंग समाजाच्या अन्याय अत्याचार प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष देण्याची मागणीचे निवेदन औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम गुह येथे देण्यात आले.
युवा मंचचे अध्यक्ष डाँ.सचिन साबळे हे मा.राज ठाकरे साहेब यांना निवेदन देताना .
यावेळी ठाकरे यांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नाकडे लक्ष घालनार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.या निवेदनावर डॉ.सचिन साबळे,श्री.दौलतराव सिरसाट,प्रा.अनिल साबळे ,श्री.गजानन आव्हाड,श्री.सीताराम कांबळे , श्री.सचिन आव्हाड,श्री.विजय आव्हाड ,सौ.अंजली साबळे,राधा यंगड, स्नेहल साबळे, लताबाई सोनवने, दादाराव सिरसाट,श्री.अनिल सोळसे, श्री.संतोष थोरात, श्री.मनोज गायकवाड,आदीसह पदाधीकार्याच्या स्वक्षर्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...