सोमवार, ९ मार्च, २०२०

महिलांना समाजातील आपले स्थान दाखवण्याची गरज - अम्मारा
 महिला दिनानिमित्त जमाअते इस्लामी हिंद अंबड च्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे अयोजन
          अंबड ( प्रतिनिधी ) - महिला दिवस 8 मार्च निमित्त जमाअते इस्लामी हिंद अंबड कडुन जुनी तहसील शादीखाना
येथे दुपारी 2 ते 5 यावेळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला विंग अंबडच्या अध्यक्षा अनिस फातेमा तर प्रमुख वक्ते म्हणुन जालना महिला विंग शाखेचे शेख अम्मारा ह्या होत्या . शेख अम्मारा यांनी सभागृहात खचाखच भरलेल्या महिलानां उद्देशुन सांगीतले की , इतिहास साक्षीला आहे प्रत्येक परिवर्तानामध्ये महिलांनी महत्वाची भुमिका बजावलेली आहे . आणि त्यांनी आपल्या कुव्वतीन समाज परिवर्तन घडवुन अनलेला आहे . त्या साठी त्यांनी हजरत आयशा रजि . , जैनबुल गजाली , बिअम्मा या व्यतिरीक्त अलीकडच्या काळातील तमाम जिगरबाज , कर्तृत्वान महिलांचे उदाहरण दिले . आजच्या महिलांनी सुध्दा स्वतःला सक्षम व कर्तृत्वान बनवीने गरजेचे आहे . एक महिला ही आई , बहीन , मैत्रीन , पत्नी , मुलगी या सर्व नात्यांचा एक सुंदर गुंफन आहे . तीच्या पासुनच सुरुवात आहे आणि सुरुवातच नसेल तर बाकी सर्व व्यर्थ आहे . त्यामुळे समाजाने महिलांचे स्थान लक्षात ठेवावे . तिला कमी लेखुन हिनवु नये . महिलांना उद्देशुन त्यांनी सांगीतले की , आपण आपली जबाबदारी ओळखने गरजेचे आहे . प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली आग्रेसर भूमिका असायला हवी . आपल्याला कागदोपत्री पदव्याचा गर्व आणि स्वार्थीपना वाढलेला आहे . स्वातत्र्यांच्या नावाखाली आपला सवैराचार वाढलेला आहे . आपले वाकडे पाऊल पडते कामा नये . फॅशनच्या नावाखाली आपली संस्कृती आपण विसरत चाललो आहोत . वडीलधारी व्यक्तीचे न । ऐकने , मनमानी करने , थोडेसे मनाविरुध्द झालेतर आत्महत्याचा मार्ग अवलंबने इत्यादी गोष्टीचे प्रमाण वाढलेले आहेत . काय इस्लामने आपणाला हिच शिकवन दिलेली आहे का ? इस्लामची शिकवन व इस्लाम मधील स्त्रीयांचे स्थान ह्या सर्व गोष्टी आपण विसरत चाललेलो आहोत . त्यामुळे सर्वात प्रथम आपण स्वतःला सिध्द करणे काळाची गरज आहे . शिक्षण कडे लक्ष देने , समाजातील वाईट चालीरिती बंद करणे , मुलींच्या हत्या , हंडाबळी , गर्भपात ह्या बंद होणे गरजेचे आहे . या सर्व बाबीवर अम्माराबाजी यांनी चौफेर फटकेबाजी केली . कार्यक्रमाच्या सुरुवात सय्यदा खिजर यांच्या कुरान पठणानी झाली तर सुत्रसंचलन नाफीया कुरेशी यांनी केले यावेळे तब्बसम जबीन , सारा फिरदोस , यांनी आपले विचार व्यक्त केले . या ठिकाणी समाजात चालीरितीवर छोटी - छोटी नाटके , ड्रामे , अॅक्शन साँग जि . आय . ओ . च्या वतीने सादर करण्यात आले . कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सारा फिरदोस , सबहात , आयशा , नाफीया , सालीहा , नाजीया इत्यादी ने परिश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...