शनिवार, २१ मार्च, २०२०

वैजापूर प्रक्रारणातील आरोपींना अटक करून फास्ट ट्रँक कोर्टात केस चालवा - वंचित बहुजन आघाडी
जालना प्रतिनिधी :- खंडाळा लाख गावात,
ता.वैजापूर, जि.औरंगाबाद येथील घडलेल्या घटने विषयी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र निषेध करून जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्वारे आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली .जातिवाधांनी बौद्ध कुटुंबावर रात्री अचानक तलवारीने व कुल्हाडीनी हल्ला करण्यात आला. या हल्यात बौध्द तरुण भिमराव बाळासाहेब गायकवाड(वय १७) यांच्यावर हल्ला केला व ते जागीच ठार झाला. माता पिता व लहान भावावर हल्लेखोरांनी हल्ला केला असता मुलाचे वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड व आई सौ.अल्का बाळासाहेब गायकवाड हे दोघेही गंभिर जखमी झाले व त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात आय.सी.यु.मध्ये अँडमीट केले. आज ते मूत्युशी झुंज देत आहेत. या घटनेने खंडाळा(लाख),ता.वैजापूर, जि.औरंगाबाद या ठिकाणी नरसहार झाले आहे. भिमराव गायकवाड हे बौध्द समाजाचा आसल्यामुळे बौध्द समाजात एकच आक्रोश निर्माण झाला आहे. जातिवादी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सर्व घटनेची निस्पर्शपणे चौकशी करून काही फरार गुन्हेगार असुन त्यांना तात्काळ अटक करून तात्काळ शिक्षा देण्यात यावी.
तसेच गायकवाड कुंटुबाच्या तक्रारीवरुण कलम ३०२ व जातीवाद्यांवर अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.व गायकवाड कुंटुबला न्याय देण्यात यावा या प्रकरणातील आरोपींना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा. या मागणीसाठी निवेदन देण्यात आले,या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी दिपक डोके,विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे, गौतम वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...