रविवार, ५ एप्रिल, २०२०

   शहागड येथील 26 नागरिक खबरदारीची  उपाययोजना म्हणुन            सामान्य रुग्णालय  जालना येथे तपासणीसाठी भरती.
जालना, प्रतिनिधी – निलंगा शहरात आढळलेल्या 8 कोरोना बाधीत व्यक्ती यांच्या प्रवास इतिहासात 
त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये दि.5 एप्रिल 2020 रोजी 29  रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात  दाखल होते. त्यापैकी 176 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यापैकी 140 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह आले आहेत व 3 नमुने रिजेक्ट असुन 33 नमुन्यांची अहवाल प्रलंबित आहे.आज रोजी 70 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन 70 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सदर रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 128 परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी 121 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर  शहरे व राज्यातुन आलेल्या 15 हजार 842 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवाशितांची (Contact) संख्या 124 असून संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 47, बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये 39, मुलींचे शासकीय वसतीगृह येथे 38 जणांना दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार दि. 1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी  व आवश्यकतेनुसार अलगलीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरीकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुग्णालय, जालना येथे करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे चहा पाणी करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या शहागड येथील 26 नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणुन सामान्य रुग्णालय जालना येथे तपासणीसाठी आणण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या सर्व 26 व्यक्तींना जिल्हा सामान्य  रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...