गर्दी होईल असे कुठलेही सण, उत्सव, समारंभ साजरे करु नयेत कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन
जालना, प्रतिनिधी:- विषाणु प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संपुर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल, 2020
पर्यंत वाढविण्यात आला असुन जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्रित येऊन गर्दी होईल अशा प्रकारचे कुठलेही सण, उत्सव, समारंभ साजरे करु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असुन नागरिकांनी एकत्रित येऊन गर्दी होईल अशा प्रकारचे कुठलेही सण, उत्सव, समारंभ साजरे करु नयेत. प्रत्येकाने आपल्या घरातच रहावे. जिल्ह्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा. तसेच कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा