सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळा
- जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य
जालना,प्रतिनिधी:- लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी केले आहे.कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असुन पोलीस प्रशासन हे चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावेत. गर्दी होईल अशा प्रकारचे कुठलेही सण, उत्सव, समारंभ साजरे करु नयेत. लॉकडाऊनचे निमय मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा