गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

घरपोच किराणा वाटपाचा शुभारंभ : गरजवंतांसाठी शिवसेना ठरली " आधारवड "
शिवसेना प्रमुखांचे संस्कार कृतीतून जोपासण्याचा प्रयत्न - माजी मंत्री अर्जुनराव  खोतकर
 जालना ( प्रतिनिधी) :-कोरोना महामारीस रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या गोर- गरीब, मजूर, कामगार, श्रमजीवी कुटूंबियांसमोर जगण्याची भ्रांत पडली असतांना " संकटं तिथे मदतीला शिवसेना " हे ब्रीद सार्थ ठरवत सर्व प्रथम जालना शहर व जिल्हाभरात शिवसेना पक्ष गरजवंतांना मदतीसाठी धावून आला आहे.
मुंबई येथील कोरोना ग्रस्तांना मदत, पहिल्या टप्प्यात जनजागृती, घरपोच भोजनाची पाकीटे, भाजीपाला वितरित करत माणसे जगविण्यासाठी सुरू असलेल्या सेवा यज्ञात शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मोठा समिधा वाहिला असून आता घरपोच किराणा साहित्य मिळणार असल्याने  गरजवंतांसाठी शिवसेना मोठी आधार वड ठरली आहे. तथापि " गरज पडेल तिथे मदतीचा हात सदैव पुढे करा " ही शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीत जोपासून मदतीचा अल्पसा प्रयत्न केला असल्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
शिवसेनेच्या वतीने हजारो कुटूंबांना सोशल डिस्टन्स चे पालन करून किराणा साहित्य वाटपाचा शुभारंभ गुरूवारी ( ता.२३) भागवताचार्य प.पू.शेष महाराज गोंदीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर राव अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, अनिरूध्द खोतकर, संजय खोतकर, पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, संतोष मोहिते,शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त,दीपक रन्नवरे,युवासेना समन्वयक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पांडुरंग डोंगरे, हरीहर शिंदे, नगरसेवक विजय पवार,अशोक पवार, निखिल पगारे, संतोष जांगडे, गणेश घुगे, गोपीकिशन गोगडे,संदीप नाईकवाडे, किशोर पांगारकर, संताजी वाघमारे, दादाराव पाचफुले, राम सतकर,शंकर लुंगे, विजय जाधव, जगन्नाथ चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यावेळी बोलतांना म्हणाले की, एकीकडे राज्याला कोरोना मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रत्येक क्षणास झटत आहेत. लॉकडाऊन मुळे संकटात सापडलेल्यांना मदतीसाठी शासनासोबतच शिवसेना पक्षाकडून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. असे खोतकर यांनी नमूद केले. जालना जिल्ह्यात वाडी, वस्ती, तांडे यांसह शहरी भागातील झोपडपट्टया, कामगार, श्रमजीवी व सर्वसामान्य कुटुंब राहत असलेल्या वसाहतींमध्ये मदत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरु असून याच सेवेचा एक भाग म्हणून ही मदत देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. असे सांगून सर्व नगरसेवक, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी यांच्या मार्फत नियोजन बध्द रितीने सोशल डिस्टन्स राखत सदरील मदत वाटप केली जाणार असल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले.
या वेळी अंकुश पाचफुले, घनश्याम खाकीवाले, संतोष सलामपुरे, राजेश घोडे, किशोर नरवडे, राजू सलामपुरे, किशोर शिंदे, सुशील भावसार,दीपक वैद्य, संतोष परळकर, दीपक राठोड, संतोष क्षोञीय, भोला कांबळे शिवाजी मुळे यांच्या सह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
गरजूंना जगण्याचे बळ मिळाले : प.पू.शेष महाराज
आजमितीस रोजगार नसल्याने अनेकांसमोर  जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतांना सातत्याने समाजकार्यात अग्रेसर असलेल्या माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी माणसे जगविण्यासाठी  मदतीचा हात दिल्याने गरजवंतांना जगण्याचे बळ मिळाले असा विश्वास भागवताचार्य प. पू.शेष महाराज गोंदीकर यांनी व्यक्त केला. विपरीत परिस्थितीत दातृत्वाची ज्योत प्रज्वलित ठेवून अर्जुनराव खोतकर यांनी धर्माचरण जपले असून गरजवंतांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहतील. असेही शेष महाराज गोंदीकर यांनी सांगितले.
खोतकर यांची सामाजिक बांधिलकी स्फुर्ती देणारी : भास्कर राव अंबेकर
संकट काळात गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असलेले माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी कायमच सामाजिक बांधिलकी ची भूमिका जोपासली असून त्यांचे कार्य सर्व घटकांना स्फुर्ती देणारे आहे. असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर राव अंबेकर यांनी सांगितले. आज कुठल्याही पदावर नसतांना स्वखर्चाने गरजवंत कुटुंबांना घरपोच किराणा वितरित करण्यासाठी खोतकर यांनी उचललेले पाऊल गरजूंना नवी उर्जा देणारे आहे. असे भास्कर राव अंबेकर यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...