रविवार, १० मे, २०२०

उत्तर प्रदेश च्या 38 कामगारांना घेवुन महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस झाली रवाना



निलेश लोहिया यांच्या कडून कामगारांच्या जेवन,बिस्कीट दुधाची व्यवस्था


अंबड/अरविंद शिरगोळे : येथून उत्तर प्रदेश च्या 38 कामगारांना घेवुन महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस आज दि.10 मे रोजी दु.1 वा जालना येथे रवाना झाली असून जालना येथून सदरील कामगार रेल्वेने आपल्या गावी पोहचणार आहेत उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल व तहसीलदार राजीव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार एन.वाय दांडगे,मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर,कैलास राठी,तलाठी श्रीपाद देशपांडे,अव्वल कारकुन यु.डी.जाधव व शिरसाट यांनी उत्तर प्रदेशला जाणाऱ्या बसला रवाना केले सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना स्वाती ट्रेडर्सचे निलेश लोहीया यांनी जेवन,बिस्कीट, पाणीबाँटल तसेच लहान बालकांसाठी दुधाची व्यवस्था केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...