गुरुवार, ७ मे, २०२०

दैठणा .बु. चे सरपंच शत्रुघ्न कणसे यांचा पुढाकार, २ हजार लोकांना मोफत रेशनचा पुरवठा 



परतूर /प्रतिनिधी :- प्रशांत वाकळे
 गत दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील अनेक शेतमजूर, गोरगरीब कुटुंबाच्या हाताला रोजगार नाही. जवळ असली नसली जमापुंजी महिनाभर पुरली आता पुढे काय ? असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतमजूर जनतेला पडला आहे. 
शासनाकडून स्वस्त दरात मिळणारे  रेशन या कुटुंबासाठी मोठा आधार आहे, मात्र हे स्वस्त दरातील रेशन विकत घेण्यासाठी सुद्धा पैसा शिल्लक नाही. अशा स्थितीत लोकांची अडचण ओळखून. संकटात लोकांच्या मदतीला धावून जात परतूर तालुक्यातील दैठणा बुद्रुक येथील सरपंच शत्रुघ्न कणसे गावातील सर्व रेशन कार्ड धारकांचे पैसे स्वतःच्या खर्चातून भरून गावकऱ्यांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये गव्हू,तांदूळ आणि साखर या सामानाचा समावेश आहे.  गावातील २००० लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. माझे गाव हे माझे कुटुंब असल्याचे मी मानतो, गावाच्या संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे हा माणुसकी धर्म आहे, तोच माणुसकी धर्म आपण जपत असल्याचे सरपंच शत्रुघ्न कणसे सांगतात. मागील महिन्यात गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १ किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले होते.



 लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, किराणा दुकानदार, गिरणी चालक आणि पत्रकार यांना तीन एकरातील मोसंबीचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम दैठणा बु. येथील सरपंच शत्रुघ्न कणसे हाती घेतला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. सोबतच तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांना १५०० मास्क, ग्लोज, सनीटायरचे वाटप देखील करण्यात आले आहे.   महिनाभरापासून मोफत शुद्ध फिल्टर पाणी पुरवठा : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी वैयक्तिक स्वच्छता तसेच सामाजिक स्वच्छतेचे आचरण महत्वाचे आहे. पिण्याचे  पाणी अशुद्ध असेल तर त्या माध्यमातून अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही गरज ओळखून दैठणा बु ग्रामपंचायतच्या वतीने सुरुवातीला सशुल्क पाणी जार दिले होते. लॉक डाऊन मध्ये लोकांची अडचण ओळखून पाणी जार मोफत वाटप करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. याचा मोठा फायदा गावकऱ्यांना झाला असल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया :- मागील दोन महिन्यापासून कामधंदा बंद आहे. शासनाच्या वतीने स्वस्त दरात रेशन मिळते पण, ते रेशन घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. अशा बिकट परिस्थितीत सरपंच शत्रुघ्न कणसे यांनी मोफत रेशन देण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे आम्हाला मोठा. दिलासा मिळाला आहे. आमच्यावरची उपासमारीची वेळ टळली म्हटले तर वावगे ठरणार नाही. – विठ्ठल उमाजी घोडे, ग्रामस्थ दैठणा बु.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...