गुरुवार, ७ मे, २०२०

मनसेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन.


जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणीकृत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी गावोगावी जाऊन करण्यात यावी.जालना जिल्ह्यातील शासनाने हरभऱ्याला 4850 रु प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी आणि आडत दुकानदार यांच्याकडून सद्या हरभरा 3800 रुपये प्रति क्विंटल ने खरेदी केला जात आहे. यात शेतकऱ्यांचा प्रति क्विंटल 1000 रु तोटा होत आहे. याकडे शासनाच्या कसलेही लक्ष नाही.शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केले आहेत परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ह्या चार दिवसांत हे खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. खूप उशिराने ही खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. जालना जिल्ह्यातील या गर्दीमुळे शेतकऱ्यांना कोरोनाचा धोका संभवु शकतो त्यामुळे शासनाने खरेदी केंद्राची सर्व यंत्रणा गावोगावी घेऊन जाऊन गांव निहाय नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी करावी. अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष जालना प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...