गुरुवार, ७ मे, २०२०


अंजानी आई फाऊंडेशनच्या वतीने व IRS Shri Garkal sir (JNV), Assistant Commissioner GST Aurangabad यांचे माध्यमातुन  औरंगाबाद येथील भिमनगर एरीयामध्ये  रेशन कीट वाटप.


औरंगाबाद प्रतिनिधी :- कोरोनावायरस संसर्ग ने देशभर हाहाकार माजवला असुन  लाॅकडाउन मुळे गोर गरीबांचे हाल होत आहेत. औरंगाबाद शहरा मध्ये दुस-या राज्यातुन, जिल्हयातुन  मोल मजुरी साठी व शिक्षणा साठी विद्यार्थी औरंगाबाद शहरा मध्ये येतात. अचानक लाॅकडाउन  मुळे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. औरंगाबाद शहरातील सर्वात जास्त  कोरोनाबाधित रुग्ण असणारा एरीया  भिमनगर सील करण्यात आला. अंजानीआई फाउंडेशन च्या औरंगाबाद टिम ला वसमत वरुन फोन आला काही  विद्यार्थी सर्वात जास्त कोरोना बाधित संख्या असणारा भिमनगर या ठिकानी विद्यार्थी अडचणीत आहेत. कोणतीही  संस्था भीती मुळे कोरोणा बाधित क्षेत्रात  धान्य देत नाही या भागात  धान्याची मदत करता येइल का अशी मागणी अंजानी आई फाउंडेशन ला करण्यात आली. कर्तव्यावर असणारे अंजानी आई फाउंडेशन चे PSI बी.एच.किरवले  यानी श्रीमती जयश्री गवई मॅडम (IRS) Deputy Commissioner, GST, Aurangabd, श्री गरकल सर
(IRS) Assistant Commissioner, GST, Aurangabad,श्री धिरज कांबळे सर (IRS)  Assistant Commissioner, GST, Aurangabd यांच्या माध्यमातुन तात्काळ 40 धान्यकिट भिमनगर औरंगाबाद  या ठिकाणी गरजुंना दिले. सामाजिक जबाबदारी स्वीकारुन  कोरोनाबाधित वार्डात स्वत: जाऊन मदत करण्यात आली.
एकीकडे पोलीस अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालुन  कर्तव्य बजावत आहेत तसेच अंजानी आई फाउंडेशन जालना गरीब , गरजु कुटूंबांना धान्य, फुड पॅकैट  देउन भुक भागवित आहे, सामाजिक कर्तव्य निभावत आहे.अशी माहीती फाउंडेशन च्या विधा जाधव, ज्ञानज्योत संस्था च्या अध्यक्षा ज्योती आडेकर यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...