शुक्रवार, १९ जून, २०२०

भारतीय जवानांना अखिल भारतीय सेनेच्या वतीने श्रद्धांजली


जालना,ब्युरोचीफ :- भारत-चीन सीमेवरील गवलान येथे चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरूवारी (ता.१८) जालना शहरात अखिल भारतीय सेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
   गांधी चमन येथे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बोलताना अखिल भारतीय सेनेचे जालना जिल्हा संपर्कप्रमुख गणेश चांदोडे म्हणाले की, चीन भारताच्या सीमेवर कुरापती काढत आहे.कोरोनाचा जगभरात फैलाव करणाऱ्या चीनची जगभरात बदनामी होत आहे.भारतीय नागरिक चीनच्या वस्तुवर बहिष्कार घालत आहे.यामुळे चीनचे पित्त खवळले आहे.यामुळे चीनी सैनिकांनी भारतीय सेनेच्या जवानांवर हल्ला केला,यात २०जवान शहीद झाले आहेत.प्रत्येक भारतीय नागरिकाने चीनी वस्तूवर बहिष्कार टाकावा व चीनी वस्तूंची होळी केली तरच ती आपल्या भारतीय शहीद जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल.
   यावेळी अखिल भारतीय सेनेच्या जालना शहराध्यक्ष नंदा पवार, अखिल भारतीय सेनेचे जुना जालना विभाग प्रमुख अमोल रत्नपारखे , आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...