शनिवार, ९ मे, २०२०

अंबड़ तलुक्यातील वाड़ी शिराढोण येथील पिण्याच्या पाण्याची नागरिकांचे प्रश्न सुटले


संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम यांचे गावकारी व विद्यार्थी सेनेचे अद्यक्ष बाबू घुले, इतर कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले


अंबड़/ प्रतिनिधि : लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची वेवस्था मुळीच नव्हती अंबड़ तालुक्यातील वाडी शिराढोण येथील महाराष्ट्र शासन कडून  संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम  आडव, बाबु घुले , (विद्यार्थी सेना आध्यक्ष )  असलम पटेल , संदिप उघडे ,संमदर पटेल ,मंजर पटेल, अखेप पटेल , सोनु घुले, राजु घुले,राजु उघडे इत्यादि यांनी गावात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविले  पाणीपुरवठ्याची यवस्था करुन दिली व त्या गावातील नागरिकांनी आभार व्यक्त केली.

पोलीस ठाणे परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधीकारी निलेश ताबे यांची मुदतवाढीची मागणी 

परतुर /प्रतिनिधी :-प्रशांत वाकळे
          परतुर तालुक्यातील पोलीस ठाणे परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधीकारी निलेश ताबे यांची मुदत वाढीची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली. निवेदनात असे म्हटले आहे की,पोलीस स्टेशन परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी निलेश तांबे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असुन त्यानी सिंघम स्टाईल ने परतुर तालुक्यातील अवैध धंध्दांना आळा घातला.असुन मटका,दारु,रेती माफीया परतुर शहरात हाहाकार माजवला होतो त्याच वेळी तांबे यानी ह्या माफीयांनवर अंकुश घातला आहे.तसेच अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्हांचा तपास व अनेक गुंडावर दहशत निर्माण करून परतुर शहरात शांततेचे वातावरण निर्माण केले आहे.म्हणुन सर्व सामान्य व्यक्ती निर्भयपणे जगत व वावरत आहे.म्हणुन अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांची अजुन काही काळ परतुर येथे कार्यरत ठेवावे अशी मागणी नीवेदन देवुन नागरीकांणी केली आहे .यावेळी निवेदनावर शे.खालेख शे.अहमद कुरेशी,अँड आर एल पाईकराव ,एस एम आखाडे,सनि गायकवाड ,ईन्सान कुरेशी,राजु सोनटक्के,शहेबाज अन्सारी आदी च्या स्वासऱ्या आहे.

बीड हॅलो रिपोर्टर

स्टार मराठी न्युजचे संपादक गणेश कांबळे यांच्या वर दारू संबंधित बातम्या प्रसिद्ध करत असल्यांचा राग मनात धरून गणेश कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला 



इंदापूर,प्रतिनिधी:- कोरोना वायरस पाश्वभमीवर संपूर्ण भारतात लोकडाऊन सुरू आहे,कोरोना वायरस संदर्भात जनजागृती करण्याचे काम हे पत्रकार आपल्या बातम्या करून लोकांन पर्यत पोहचवण्याचे काम हे पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता वृत्तसंकलन करतात.अश्या परस्तीमध्ये दैनिक तुफान क्रांती वुत्तपत्राचे पुणे जिल्हा प्रतिनिधी तसेच स्टार मराठी न्युजचे संपादक गणेश कांबळे यांच्यावर बावड्यातील अवैद्य दारू विक्री करणार्याच्या सांगण्यावरून धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आला.पोलीसांना खबरी त्याचप्रमाणे सातत्याने दारू संबंधित बातम्या प्रसिद्ध करत असल्यांचा राग मनात धरून गणेश कांबळे व त्यांच्या साथीदारावरती धारदार शस्त्र हातात घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला यासंदर्भात भारतीय दंड संहिता १४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६, यानुसार इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला मुळे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटने वतीने ह्या घटनचा निषेध व्यक्त केला आहे व निवेदन सादर करण्यात आले
वाहन चालक मालक सामाजिक संघ,( कार्यक्षेञ - भारत )
 आविनाश तांदळे | बीड (बीड हँलो रिपोर्टर)
संपूर्ण भारतात कोरोना विषानुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे मी माझ्या व माझ्या बांधवांच्या स्वास्थासाठी जरी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन मध्ये सहभागी झाले आहे, तरीपण घेतलेले वाहन कर्जाच्या या अडचणीच्या वेळी कर्जपुरवठा करणाऱ्या फायनान्स कंपन्यांकडून नियोजित व थकित कर्जाच्या हप्त्यासाठी येणाऱ्या वसुलीच्या फोनला उत्तर देणे कठीण आहे, असे प्रत्येक ठिकाणी छोट्या-मोठ्या तसेच टुरिस्ट गाड्या व मालवाहतुकीच्या व्यावसायिकांस वाहन कर्ज धारकास प्रश्न निर्माण झाला आहे, कारण जरी सरकारने बँकांना सूचना दिल्या तरी संबंधित व्याज व्यतिरिक्त हप्ता चुकल्यावर लागणाऱ्या वाजवी 500 ते 2000 रुपये किंवा अधिक दंडास ही बळी पडावे लागणार आहे, तरी यावर सरकार व प्रशासनाने उपाययोजना करावी व भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी बर्‍याचश्या वाहन चालक मालक संघ व संघटना करीत आहे, तसेच वाहन चालक मालक सामाजिक संघ,( कार्यक्षेत्र भारत ) यांची ही आग्रही मागणी आहे,तरी सरकार व प्रशासन यांनी याची त्वरित दखल घेऊन  आम्हा सर्वांना योग्य दिलासा द्यावा ही नम्र विनंती,व तसेच गेली बर्याच दिवसापासुन आमची सर्व वाहन चालक व मालक यांची सर्व वहाने उभ्या स्थितीत आहेत,कुठलेही गाडी भाडे अथवा कुठल्याही प्रकारची दळनवळन होण्यास मार्ग नसल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील चालक व मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे,कृपया महाराष्ट्र शासन व प्रशासन याची त्वरीत दखल घ्यावी आम्हा सर्वांना योग्य दिलासा देण्यात यावा हि आग्राहाची परत एकदा नम्र विनंती करत आहोत,
 प्रकाश राक्षे मराठवाडा सचिव
 वाहन चालक मालक सामाजिक संघ,( कार्यालय भारत )
7798767279
जय,हिंद 
जयसंघ
जय सारथी,
🙏🙏🙏
बीड हँलो रिपोर्टर न्युज ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
संपादक चंद्रकांत हक्कदार पाटील. आविनाश तांदळे .(कार्यकारी)संपादक.

शुक्रवार, ८ मे, २०२०

लॉकडाऊनमध्ये कुंटनखान्यावर छापा.
अविनाश तांदळे | बीड महाराष्ट्र
  कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळातही अंबाजोगाई शहरामध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास प्राप्त झाली. गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईमध्ये एका आंटीवर गुन्हा दाखल करत दोन पीडिताची सुटका करण्यात आली.

     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील महात्मा फुले नगर येथे कुंटनखाना सुरु होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास मिळाली. त्यांनी दोन पोलीस डमी ग्राहक पाठवून शहानिशा केली. फोनवरुनच संभाषण करुन आंटीने सर्व माहिती त्यांना दिली. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन मुली आंटीने समोर उभ्या केल्या. डमी ग्राहक असलेल्या पोलीसांनी बाजूलाच असलेल्या पोलीसांना इशारा करताच छापा टाकण्यात आला. यावेळी एका आंटीला ताब्यात घेत तिच्यावर अंबाजोगाई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोन पीडिताची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेेचे पोनि.भरत राऊत, भास्कर केंद्र, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रमुख पोउपनि.राणी सानप, शमीम पाशा, सिंधु उगले, सुरेखा उगले, मिना घोडके, शिवाजी भारती, प्रताप वाळके, विकास नेवडे, सतिष बहिरवाळ, चालक सुस्कर यांनी केली
========================================================================

बीड रिपोटर



शासकीय हरभरा खरेदी केंद्र, धर्माबाद गोदाम अभावी पुन्हा बंद होण्याची शक्यता


धर्माबाद (भगवान कांबळे ):- कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद चे गोदाम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने किरणे घेऊन गोदामाची अडचण दूर करावी ह्यासाठी मा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.हंगाम 2019-2020 मधील शेतकऱ्यांच्या हरभरा शेतमालाची शासकीय दराने नाफेड मार्फत खरेदी सुरू आहे. धर्माबाद तालुक्यातून जवळपास 3400 शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नाफेड मार्फत खरेदी झालेला माल गोदामात डिपॉझिट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ धर्माबाद येथे जागा उपलब्ध नसल्याने मध्यंतरी खरेदी बंद ठेवण्यात आली. खरेदी केंद्र गोदामा अभावी पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. धर्माबाद वर्ष 2016 मध्ये हे महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प अंतर्गत 2000 मेट्रिक चे गोदाम उभारले असून सदर गोदाम विनावापर पडून आहे. तेव्हा सदर गोदाम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने प्रचलित दरानुसार बाजार समिती धर्माबाद जी करारनामा करून किरायाने घेतल्यास धर्माबाद तालुक्‍यातील शेतकऱ्यांची समस्या सुटण्यास मदत होईल. सदर गोदामात जवळपास 20 हजार क्विंटल माल ठेवण्याची क्षमता आहे .तरी या पर्यायाचा संबंधित विभागाने लवकरात लवकर विचार करून गोदामा अभावी खरेदी केंद्र बंद पडणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत. हे निवेदन मा मुख्यमंत्री मा विरोधी पक्षनेता मा ना पालकमंत्री , नांदेड ,मा खा प्रतापराव पाटील चिखलीकर,मा जिल्हाधिकारी  मा आ राजेशजी पवार ,मा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड, वरीष्ठ व्यवस्थापक,वखार महामंडळ, लातूर ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी ,नांदेड ह्यांना मेल द्वारे पाठविण्यात आले. सोबत मी स्वतः रविंद्र पोतगंटीवार, साईनाथ शिरपूरे, अविनाश जैरमोड व मुरली गौड होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...