शनिवार, ९ मे, २०२०

बीड हॅलो रेपोर्टेर

छत्रपती अन्न सहाय्यता छत्राच्या माध्यमातून मोतीगव्हाण येथे गरजुंना धान्य वाटप


 जालना (प्रतिनिधी) :- कोरोना या संसंर्गजन्य रोगाने थैमान घातले असल्याने संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यावर नाही तर खेड्यापाड्यांवर सुद्धा मोठे संकट आले आहे. मोलमजुरी करून खाणारे लोकांच्या हाताला कामधंदा नसल्याने जालना जिल्ह्यातील बाजीउम्रद, माणेगाव (जा), माणेगांव (खा), राममुर्ती, सावरगाव, सावंगी तलाव, ब्राम्हणखेड, सिंधीकाळेगाव, मोतीगव्हाण,  येथे धैर्यशील अरविंदराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून गोर-गरीब गरजुंना धान्य वाटप करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरू आहे.
याप्रसंगी बोलतांना धैर्यशील चव्हाण म्हणाले की, सद्या लॉकडाऊन असल्यामुळे ज्या गरजुंना धान्यांची गरज भासेल त्यांनी संपर्क साधावा त्यांना छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून दिले जाईल. मोतीगव्हाण येथे छत्रपती अन्न सहाय्यता छत्रचे सहकारी उमेश मोहिते यांच्या हस्ते गरजुंना धान्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत विठ्ठल मोहिते, गणेश मोहिते, महादेव मोहिते, प्रवीण मोहिते, निवृत्ती घडलींग, आदित्य मोहिते आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल सर्व गावातील नागरीकांतून आभार व्यक्त करण्यात येत आहे. 

बीड हॅलो रिपोर्टर

आ.कैलास गोरंट्याल यांनी केली मान्सूनपूर्व कामांची पाहणी

जालना (प्रतिनिधी) :- नगर पालिकेच्या वतीने शहरात  मान्सून पूर्व मोठ्या  नाल्यांची साफसफाई  कामांची सुरूवात करण्यात आली असून शनिवारी ( ता. ०९) आ.कैलास गोरंट्याल यांनी या कामांची पाहणी केली.आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेच्या वतीने मोठ्या नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून भाग्यनगर भागातील मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. आ. कैलास गोरंट्याल यांनी कामास भेट देऊन पाहणी केली.या वेळी  बबलू चौधरी,राम सावंत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद ,नगरसेवक जीवन सले,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष  नंदकिशोर  जांगडे , स्वच्छता विभाग प्रमुख, संजय वाघमारे , स्वच्छता निरीक्षक सॅमसन कसबे ,,अरुण, वानखेडे, संदीप वानखेडे.यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नाले साफसफाईसाठी तीन जेसीबी ,पाच ट्रॅक्टर, पाच टिप्पर व सफाई कामगार असा मोठा लवाजमा तैनात करण्यात  करण्यात आला आहे. सदरील काम हे एक महिना चालणार असून यामध्ये शहरातील विविध ठिकाणचे एकूण 35 नालेसफाई करण्यात येणार असल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख संजय वाघमारे यांनी सांगितले. या वेळी प्र.स्व.निरिक्षक रवींद्र कल्याणी, दफेदार श्रावण सराटे, सागर कदम आदी उपस्थित होते.






नगर पालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामांची आ.कैलास गोरंट्याल यांनी पाहणी  केली. या वेळी बबलू चौधरी, शेख मेहमूद, राम सावंत, नंदकिशोर जांगडे, जीवन सले, आदी.


लाँकडाऊनच्या काळात विद्यार्थी आपल्या आवडत्या विषयाला देतात वाव

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी ):- सर्व परिक्षा झालेल्या असुन निकालाची वाट पाहणे सुरू आहे. माञ कोरोना ने खुप उग्र रूप धरले आहे.निकाल कधी आणी कसा येणार आणि आपन पुढे काय करावे आणि कसे करावे हि चिंता विद्यार्थी यांच्या मनात आहे. आणि त्यातुन दिलासा भेतन्यासाठी ते आपल्या आवडत्या विषय कडे वळले. असुन चिञकला हा विषय तासन तास हाताळत आहे. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील नंदकिशोर नारायण गिराम. या विद्यार्थीयाने B. A. ची परिक्षा दिली असुन चिञकला या विषय कडे आपली चांगली आवड म्हणुन पाहतो  .गणपती ,साई बाबा, आणि थोर पुरूष यांचे सुबक चिञ  हुबेहुब काढण्याचा छंद जोपासत आहे.असे नंदकिशोर गिराम याने सांगितले. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील नंदकिशोर गिराम याने हुबेहुब साईबाबा यांचे चिञ काढताना दिसत आहे.





बीड हॅलो रेपोर्टर

रेल्वे अपघात १६ कामगार मृत्युमुखी पडले या अपघाताला जबाबदार जालना तहसीलदार यांना निलंबित करून   कंपनी मालक याच्यावर ३०२ कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे - प्रकाश सोळंके


मनसे च्या वतीने मुख्यमंत्री मोहदय यांना निवेदन.



 जालना,प्रतिनिधी :- जालना एमआयडीसी येथे एका स्टील कंपनी कामगार काम करीत होते, लॉकडाऊन मुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जालना येथून औरंगाबादच्या दिशाने जाण्यासाठी निघाले होते,१९ कामगारांपैकी १६ कामगार रेल्वे अपघात मृत्युमुखी पडले, या कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला होता का नाही, जर संपर्क केला असेल तर ते पाई का निघाली होते, त्यांना जालना तहसीलदार त्यांनी योग्य मार्गदर्शन का केले नाही या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या जालना तहसीलदार यांना निलंबित करून, या संबंधित कंपनी मालकावर निष्काळजीपणा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे.

         मुख्यमंत्री सहायता निधीतून या कामगारांना ५ लाख रुपये मदत जाहीर केल्याबद्दल श्री .प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री मोहदय यांचे मनापासून आभार मानले.

या रेल्वे अपघातातील १६ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार जालना तहसीलदार व कंपनी मालक असल्यामुळे तहसीलदार यांना निलंबित करून कंपनी मालकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी श्री.प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदनात केली आहे.

अंबड़ तलुक्यातील वाड़ी शिराढोण येथील पिण्याच्या पाण्याची नागरिकांचे प्रश्न सुटले


संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम यांचे गावकारी व विद्यार्थी सेनेचे अद्यक्ष बाबू घुले, इतर कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले


अंबड़/ प्रतिनिधि : लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची वेवस्था मुळीच नव्हती अंबड़ तालुक्यातील वाडी शिराढोण येथील महाराष्ट्र शासन कडून  संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम  आडव, बाबु घुले , (विद्यार्थी सेना आध्यक्ष )  असलम पटेल , संदिप उघडे ,संमदर पटेल ,मंजर पटेल, अखेप पटेल , सोनु घुले, राजु घुले,राजु उघडे इत्यादि यांनी गावात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविले  पाणीपुरवठ्याची यवस्था करुन दिली व त्या गावातील नागरिकांनी आभार व्यक्त केली.

पोलीस ठाणे परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधीकारी निलेश ताबे यांची मुदतवाढीची मागणी 

परतुर /प्रतिनिधी :-प्रशांत वाकळे
          परतुर तालुक्यातील पोलीस ठाणे परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधीकारी निलेश ताबे यांची मुदत वाढीची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली. निवेदनात असे म्हटले आहे की,पोलीस स्टेशन परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी निलेश तांबे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असुन त्यानी सिंघम स्टाईल ने परतुर तालुक्यातील अवैध धंध्दांना आळा घातला.असुन मटका,दारु,रेती माफीया परतुर शहरात हाहाकार माजवला होतो त्याच वेळी तांबे यानी ह्या माफीयांनवर अंकुश घातला आहे.तसेच अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्हांचा तपास व अनेक गुंडावर दहशत निर्माण करून परतुर शहरात शांततेचे वातावरण निर्माण केले आहे.म्हणुन सर्व सामान्य व्यक्ती निर्भयपणे जगत व वावरत आहे.म्हणुन अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांची अजुन काही काळ परतुर येथे कार्यरत ठेवावे अशी मागणी नीवेदन देवुन नागरीकांणी केली आहे .यावेळी निवेदनावर शे.खालेख शे.अहमद कुरेशी,अँड आर एल पाईकराव ,एस एम आखाडे,सनि गायकवाड ,ईन्सान कुरेशी,राजु सोनटक्के,शहेबाज अन्सारी आदी च्या स्वासऱ्या आहे.

बीड हॅलो रिपोर्टर

स्टार मराठी न्युजचे संपादक गणेश कांबळे यांच्या वर दारू संबंधित बातम्या प्रसिद्ध करत असल्यांचा राग मनात धरून गणेश कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला 



इंदापूर,प्रतिनिधी:- कोरोना वायरस पाश्वभमीवर संपूर्ण भारतात लोकडाऊन सुरू आहे,कोरोना वायरस संदर्भात जनजागृती करण्याचे काम हे पत्रकार आपल्या बातम्या करून लोकांन पर्यत पोहचवण्याचे काम हे पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता वृत्तसंकलन करतात.अश्या परस्तीमध्ये दैनिक तुफान क्रांती वुत्तपत्राचे पुणे जिल्हा प्रतिनिधी तसेच स्टार मराठी न्युजचे संपादक गणेश कांबळे यांच्यावर बावड्यातील अवैद्य दारू विक्री करणार्याच्या सांगण्यावरून धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आला.पोलीसांना खबरी त्याचप्रमाणे सातत्याने दारू संबंधित बातम्या प्रसिद्ध करत असल्यांचा राग मनात धरून गणेश कांबळे व त्यांच्या साथीदारावरती धारदार शस्त्र हातात घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला यासंदर्भात भारतीय दंड संहिता १४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६, यानुसार इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला मुळे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटने वतीने ह्या घटनचा निषेध व्यक्त केला आहे व निवेदन सादर करण्यात आले

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...