रेल्वे अपघात १६ कामगार मृत्युमुखी पडले या अपघाताला जबाबदार जालना तहसीलदार यांना निलंबित करून कंपनी मालक याच्यावर ३०२ कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे - प्रकाश सोळंके
मनसे च्या वतीने मुख्यमंत्री मोहदय यांना निवेदन.
जालना,प्रतिनिधी :- जालना एमआयडीसी येथे एका स्टील कंपनी कामगार काम करीत होते, लॉकडाऊन मुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जालना येथून औरंगाबादच्या दिशाने जाण्यासाठी निघाले होते,१९ कामगारांपैकी १६ कामगार रेल्वे अपघात मृत्युमुखी पडले, या कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला होता का नाही, जर संपर्क केला असेल तर ते पाई का निघाली होते, त्यांना जालना तहसीलदार त्यांनी योग्य मार्गदर्शन का केले नाही या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या जालना तहसीलदार यांना निलंबित करून, या संबंधित कंपनी मालकावर निष्काळजीपणा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून या कामगारांना ५ लाख रुपये मदत जाहीर केल्याबद्दल श्री .प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री मोहदय यांचे मनापासून आभार मानले.
या रेल्वे अपघातातील १६ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार जालना तहसीलदार व कंपनी मालक असल्यामुळे तहसीलदार यांना निलंबित करून कंपनी मालकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी श्री.प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदनात केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा