शनिवार, ९ मे, २०२०

बीड हॅलो रेपोर्टेर

छत्रपती अन्न सहाय्यता छत्राच्या माध्यमातून मोतीगव्हाण येथे गरजुंना धान्य वाटप


 जालना (प्रतिनिधी) :- कोरोना या संसंर्गजन्य रोगाने थैमान घातले असल्याने संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यावर नाही तर खेड्यापाड्यांवर सुद्धा मोठे संकट आले आहे. मोलमजुरी करून खाणारे लोकांच्या हाताला कामधंदा नसल्याने जालना जिल्ह्यातील बाजीउम्रद, माणेगाव (जा), माणेगांव (खा), राममुर्ती, सावरगाव, सावंगी तलाव, ब्राम्हणखेड, सिंधीकाळेगाव, मोतीगव्हाण,  येथे धैर्यशील अरविंदराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून गोर-गरीब गरजुंना धान्य वाटप करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरू आहे.
याप्रसंगी बोलतांना धैर्यशील चव्हाण म्हणाले की, सद्या लॉकडाऊन असल्यामुळे ज्या गरजुंना धान्यांची गरज भासेल त्यांनी संपर्क साधावा त्यांना छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून दिले जाईल. मोतीगव्हाण येथे छत्रपती अन्न सहाय्यता छत्रचे सहकारी उमेश मोहिते यांच्या हस्ते गरजुंना धान्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत विठ्ठल मोहिते, गणेश मोहिते, महादेव मोहिते, प्रवीण मोहिते, निवृत्ती घडलींग, आदित्य मोहिते आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल सर्व गावातील नागरीकांतून आभार व्यक्त करण्यात येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...