मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

             शहरी महानेट प्रकल्पाचा अप्पर जिल्हाधिकारी 
                  रवींद्र परळीकर यांच्या हस्ते शुभारंभ
जालना (प्रतिनिधी):- दि.24 -सध्या इंटरनेटचा वापर प्रत्येक कामकाजात आवश्यक झाला आहे .शासकीय कार्यालयासह सर्वानाच आता ऑनलाईन  कामकाजामुळे इंटरनेट शिवाय पान  हालत नाही. त्यामुळे इंटरनेट सुविधा असणे आणि ती विनाव्यत्यय  सुरु राहणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे . त्यासाठी शासनाने  शहरी महानेट प्रकल्प  सुरु केला असून या शहरी महानेट  प्रकल्पचा शुभारंभ अप्पर
 जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांच्या हस्ते नुकताच तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला .यावेळी तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार श्री.राजमाने, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आण्णासहेब वाघमारे,मंडळ अधिकारी श्री.भोरे, वरिष्ठ नेटवर्क अभियंता अंकुश तुपेकर, सागर खैरनार, रिलांस जिओचे देवेंद्र कुलकर्णी, रुपेश गुप्ता यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाचे शासकिय विभाग त्यांच्या अखत्यारित असलेले 203 शासकिय कार्यालये,शाळा, शासकिय विभाग इ. ठिकाणी ऐकमेकांना जोडली जाणार आहेत.नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर ऑप्टिक इंटरनेट सुविधे अंतर्गत त्या त्या ठिकाणी  उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे.   यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अण्णासाहेब वाघमारे यांनी योजनेचे फायदे तसेच सामान्यांसाठी होणा-या लाभाची माहीती दिली. शासकीय कार्यालये,शाळा वस्तीगृहे यांना मोफत व अल्प दरात जोडणी देण्यात येणार आसल्याचेही त्यांना शेवटी सांगितले. दुर्गम भागातील तालुक्याला देखील याचा लाभ मिळणार आसल्याने अप्पर  जिल्हाधिकारी  श्री. परळीकर  यांनी समाधान व्यक्त केले.या उपक्रमा अंतर्गत जिल्हातील शासकिय कार्यालयामध्ये ई-गव्हर्नस, आरोग्य सेवा, शिक्षण, ई-डेटा  उपक्रमांना गती देउन त्यांचा दर्जा सुधारणार आहे. नागरिकांना मिळणा-या दाखलांचे कामकाजही गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे.इंटरनेट वापराचे महत्व वाढल्याने या शहरी महानेट प्रकल्पाचा लाभ शासकिय कार्यालयांना होणार आहे या प्रकल्पामुळे इंटरनेटची सेवेची गती वाढणार असुन यामुळे शासकिय कार्यालयातील कामकाजाला गती मिळणार आहे.
स्वा.सै.स्व.धाकलेश्वर करनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
जालना/प्रतिनिधी :- येथील माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. करनाडे यांच्या प्रतिमेस राहुल करनाडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्याविषयी खलील पहेलवान यांनी विचार मांडले. तसेच उपस्थितांचे अकबर बादशाह व शे. सिद्दीक यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांच्यासह रहेमानगंजवासीयांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.
माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी खलील पहेलवान, अकबर बादशाह, शे. सिद्दीक, चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांची उपस्थिती होती.

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

   महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना टेंभुर्णी व                    तीर्थपुरी येथे आधार प्रामाणिकरणास प्रारंभ

जालना, दि. 24 - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या टेंभुर्णी तर घनसावंगी तालुक्याच्या तीर्थपुरी या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी पंढरीनाथ महादू धारे यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ आज  दि. 24 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील आपले सरकार सेवा केंद्र येथे करण्यात आला.यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती कल्पना शहा, चेअरमन रावसाहेब अंभोरे, जिल्हा सहकारी बँकेचे भागचौकसनिस देविदास दंदाले, गटसचिव गणेश चव्हाण, विष्णू डोईफोडे, भुंजगराव पिंपळे, शालिक बनकर, सरपंच गणेश धनवाई, भिकन खाँ पठाण, अंकुश देशमुख, हरिभाऊ सोनसाळे, गोरखनाथ राऊत आदींची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यातील टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील प्रत्येकी 551 अशा एकुण 1 हजार 102 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी  असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे.  जिल्ह्याभरातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या 28 किंवा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. 
 जालना जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन.
जालना,प्रतिनिधी:-दि.23-  रोजी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती  निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात
  अपर जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी तहसीलदार संतोष बनकर, श्री गिरी, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी, श्रीमती प्रतिभा इंगळे तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थित होते.

 छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उद्या दिनांक 25- 2 -2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
                            || आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ||
बीड | उमेश वाटमोडे  छावा क्रांतिवीर सेना बीड जिल्हा च्या वतीने उद्या दिनांक 25- 2- 2020 रोजी सहाय्यक आयुक्त आणि औषध प्रशासन यांच्या विरोधात धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे हे आंदोलन मा.श्री.करण (भाऊ) गायकर संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशावरून व अनिल (दादा) राऊत प्रदेश सरचिटणीस आणि रामेश्वर (अण्णा) बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार आहे.
 प्रमुख्याने मागण्या पुढील प्रमाणे -
1)निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या  व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी.
२)गेवराई शहरात व गावनिहाय होत असलेली भेसळ थांबवण्यासाठी व भेसळ करत असलेले दुकान चालकांच्या हॉटेल चालकांनी चौकशी करून कारवाई करणे.
३) जीवनावश्यक वस्तू रास्त दराने सहज उपलब्धतेची खात्री करणे.
४) सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साठवण निर्मिती करणे.
५) ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 ची अंमलबजावणी करून ग्राहकाच्या हिताचे ग्राहकाच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करणे व आपला लेखी अभिप्राय संघटनेचे तक्रार धारकास देणे.
-  अशा इत्यादी मागण्या घेऊन उद्या छावा क्रांतिवीर सेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने पदाधिकाऱ्यांसोबत नागरिकांनी उपस्थित राहावे.
 असे आव्हान छावा क्रांतिवीर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने केले जात आहे.
राहुल चाळक -जिल्हाध्यक्ष, मुक्ताराम मामा मोटे-जिल्हा सरचिटणीस,अविनाश तांदळे- शे.आघाडी जिल्हाध्यक्ष, ऋषिकेश परदेशी -जिल्हा कार्याध्यक्ष, प्रल्हाद उजागरे- चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष, संतोष राऊत -उपजिल्हाध्यक्ष, पंढरीनाथ शिंदे- तालुकाध्यक्ष बीड, संतोष शेळके- बीड दीलीप मोटे- तालुकाध्यक्ष गेवराई, जयराम काळे - युवा तालुकाध्यक्ष गेवराई, लक्ष्मण सटले-शे.आघाडी तालुकाध्यक्ष, बाबा खोत सोमनाथ मोटे नरसिंग पालेकर, विशाल मोटे,गणेश लोणके,
(SDM) उपविभागीय कार्यालयासमोर तीन दिवसापासून 
मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथे बीजेपी सरकारच्या विरोधात NRC/CAA व इतर
असंविधानिक कायदा रद्द करावा
अंबड/प्रतिनिधि : देशाची राजधानी दिल्ली येथे BJP सरकारच्या विरोधात  NRC/CAA व इतर असंवेधानिक कायदा रद्द करावा.
  या प्रमुख मागणीसाठी सर्व मुस्लिम बांधव धरने आंदोलन करीत असून त्या धरती वर अंबड येथील (SDM) उपविभागीय कार्यालया समोर तिन दिवसांपासून धरने आंदोलन सुरु आहे. या धरने आंदोलनाला बहुजन समाज पार्टीचा जाहिर पाठिबा देण्यात आला. व याकड़े सरकारने लक्ष न दिल्यास  BSP तीव्र आंदोलनाचा इशारा दिला उपस्थित चंद्रकांत कारके (BSP जिल्हाप्रभारी), रंजीत  कांबळे, शकील पठाण, वासिम तंबोळी, लालखा पठाण, राहुल कारके, सर्व मुस्लिम बांधव, है उपस्तित होते.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

           क्रांतिगुरूचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
 बुलढाण्यात संपन्न नारायण माहोरे रामदास आमले व गंगाधर वानोळे पुरस्काराने सन्मानित.

सिंधीकाळेगाव,२१ ( प्रतिनिधी)  :- महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा गेल्या दहा वर्षापासून बुलडाण्यातील
क्रांतिगुरू संस्था करीत आहे. यावर्षी नारायण माहोरे,गंगाधर वानोळे व रामदास आमले यांची निवड करून त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे.
      शैक्षणिक व सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध कार्य  केल्याबद्दल गंगाधर वानोळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, रामदास आमले यांना राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार तर नारायण माहोरे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
      बुलडाणा जिल्ह्यातील क्रांतिगुरू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुवार,दि.२० रोजी बुलडाण्यातील गुंधा येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा प्राचार्य भाऊसाहेब झोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बोरकर,ल.स.क.म.चे विदर्भ प्रमुख प्रा.ज्ञानदेव मानवतकर, वंजारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम केंद्रे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर,लोणार बँकेचे कार्यकारी संचालक शिवप्रसाद सारडा,पंचायत समिती सदस्या हर्षदाताई डव्हळे, मनसेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिसे, संचालक हनुमान इंगळे,सुधाकर राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस समाधान पोफळे, जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम जाधव,आयोजक शंकरराव मानवतकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव फुके यांनी केले.
 पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मान्यवरांची व श्रोत्यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर गिलवरकर, संचलन अश्रू फुके तर आभार आयोजक शंकर मानवतकर यांनी मानले.ज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. संतोष टारपे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र महामुनी,गुरुवर्य डी.एम.राठोड यांच्यासह पत्रकार, लेखक, साहित्यिक, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...