शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०


मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व निरीक्षक सोहन माच्छरे यांचे आवाहन.

धर्माबाद,प्रतिनिधी (भगवान  कांबळे):- महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक वरील दिलेल्या सुचनांचे जनतेने काटेकोरपणे 
पालन करुन आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांचे व आपल्या कुटूंबियांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श घडवू या. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोना विषाणूविरुध्दचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगू या...! असे आवाहन धर्माबाद उपविभागीय पोलिस अधिकारी सूनील पाटील व धर्माबाद ठाण्याचे  पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी नांदेड तालुक्यातील  जनतेला केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.शासनाने दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी पासून सुरु होत आहे. या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरीत्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह व इफ्तार पार्टीसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते व त्यामधून मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम बांधव मस्जीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येवू नये. घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. मोकळ्या  मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. लोकांकडून कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येवून साजरे होणार करु नयेत. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार पार्टी इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करु नये.
उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.


            150 खाटांच्या कोरोना हॉस्पीटलचा पालकमंत्री 
                    राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जालना जिल्हा सज्ज - पालकमंत्री राजेश टोपे                              
जालना,प्रतिनिधी:- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व सर्व सोईनीयुक्त अशा 150 खाटांची क्षमता असलेल्या व केवळ 29 दिवसांमध्ये उभारणी केलेल्या सुसज्ज रुग्णालयाच्या, सर्व प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या व सर्वांच्या सहकार्याने जालना जिल्हा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 
सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये व शहरांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घेण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना सॅनिटायजर, मास्क तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची माहिती पुस्तिका यांचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी राज्यस्तरीय प्लॅनच्या माध्यमातुन जिल्हा रुग्णालयासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन अंबड येथील रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातुनही निधी मिळण्यात येत असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.   हॉस्पीटलच्या उद्घाटनानंतर श्री. टोपे यांनी संपूर्ण कोरोना हॉस्पीटलची पाहणी केली.सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना हॉस्पीटलचा शुभारंभ फित कापुन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे बाधित झालेले दोन रुग्ण आहेत. या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.  परंतु जिल्ह्यात या विषाणुमुळे बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत या दृष्टीकोनातुन या दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे.  या ठिकाणी 100 खाटा व 50 खाटांचा अतिदक्षता कक्ष असुन या ठिकाणी 50 व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.  या ठिकाणी अनुभवी व पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती तसेच विविध संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी पीपी किट तसेच ट्रीपल मास्क, एन-95 मास्कही उपलब्ध करुन देण्यात आले असुन गरजुंना उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या टेलिमेडीसनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आली असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.
          कोरोना उपचारासाठी पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा 
                          थेरपी उपचाराला मंजुरी
            कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली असल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
            कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती देत  ज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०


कोविड -19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना
            शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य

  जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोविड -१९ विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.लॉक डाऊन परिस्थितीमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद पडले आहेत. बांधकाम कामगारावर बेकारीचे संकट ओढवले असल्यामुळे या संकट काळात त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डी.बी. टी.पद्धतीने मंडळाकडील नोंदीत व सक्रीय (जिवीत) असलेल्या बांधकाम कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपये अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगारांनी कुठलाही अर्ज भरण्याची किंवा चौकशीसाठी कार्यालयात गर्दी करू नये तसेच कुठल्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. अशा व्यक्तीची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला करावी. असे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी.ई. कराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


     कोरोनावर मात करीत तीन रूग्ण बरे होवून परतले घरी..!
शेगांव येथील दोन व चितोडा ता. खामगांव येथील रूग्णांचा समावेश
                   टाळ्यांच्या गजरात रुग्णांचे स्वागत

                आतापर्यंत 11 कोरोना बाधीत झाले बर

बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरेाना विषाणू संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यातही हळूहळू पाय पसरविणाऱ्या कोरोनाने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये आपली उपस्थिती दर्शवित कोरोनाने प्रशासनाला गंभीर केले.  कन्टेटमेंट प्लॅन, लॉकडाऊन, गर्दी कमी करण्यासाठी विविध योजलेले उपाय यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. 
जिल्ह्यात आज 23 एप्रिल रोजी कोरोनावर मात करीत तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 
     जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील एक, चितोडा ता. खामगांव येथील एक, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज शेगांव येथील दोन आणि चितोडा ता. खामगांव येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 11 रूग्ण बरे झालेले आहे.
     प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने चितोडा ता. खामगांव व शेगांव येथील रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोनावर मात केल्याने रूग्णांचे चेहरेही आनंदाने फुलले होते. समाधानाचे हास्य रूग्णांच्या चेहऱ्यावर होते.
   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच आणि आज 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 9 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
   कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.                                                                                                                                                 

मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व

मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात कोरोना आजाराने सर्वानाच हैराण केले आसुन केंद्र व राज्य सरकार आणि प्रशासकीय आधिकारी .हे ऊदभवलेल्या माहामारीला आटोक्यात आनण्यासाठि कामाला लागले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्र्यी श्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरीकाना केलेले आव्हान. मादळमोहि करानी त्याला साद दिली देत. सार्वजनिक रित्या रक्तदान शिबीराचे 23 एप्रिल गुरुवार रोजी सरकारी दवाखना मादळमोहित आयोजित करण्यात आले होते. महिलासह तब्बल पंचेचाळीस युवकांनी या सामाजिक ऊपक्रमात आपला सहभाग नोंदवत गावकर्यानी दाखवून दिले कि "संकट काळी" आम्ही काही मदत मागण्या ऐवजी येथील  युवक मदत करणारे आहोत .आणी तो रक्तदानाचा ऊपक्रम येथील वैद्यकीय अधिकारी डाँ. लांजेवार. डाँ. लोकरे. यांच्या उपस्थित तर बीड.जी.प.चे.माजी .आरोग्य सभापती. पंढरीनाथ लगड.संपादक चंद्रकांत हक्कदार. गेवराई. प.स.स.जयसिंग जाधव  यांच्या ऊपस्थित सोशल डिस्टंट मध्ये पार पडला.

गेवराई तालुक्यात मादळमोहि येथे काल गुरुवारी गावकर्यानी सार्वजनिक रित्या रक्तदान शिबीर आयोजीत केले.आसताना .मादळमोहि भंडगवाडी.जवाहरवाडी. येथील सर्वपक्षीय युवक या वेळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला व  सामाजिक ऊपक्रमाला साद दिली.आणी रक्तदानाच्या माध्यमातून  गरजु व गरीब रुग्णाच्या कामी याव.नाही तरीही सध्या महाराष्ट्रात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आसुन आनेकांना रक्ताचा तुटवडा जान ऊ नये गरजुवंताना मदत म्हणून येथील नागरीकांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.या शिबिरात महिलाचेहि योगदान लाभले. येथील सामाजिक कर्यकर्ते श्री पंढरीनाथ लगड .पत्रकार चंद्रकांत हक्कदार. कैलास भुजबळ.रमेश जीजा तळेकर.आदिनाथ गावडे.आजीत वर्मा. आमर जगताप. ईत्यादी सह सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी या वेळी पुढाकार घेतला.याप्रसंगी. माऊली तळेकर.विनोद भोपळे. प्रमोद घाटे.सुरज लगड.विशाल दुधाळ.सुरेश भोपळे. शोहेबभाई.आक्षय तळेकर.जयसिंग जाधव .परमेश्वर केकरे.आमोल जवरे. गंगाधर जवरे. आजय बांगर .राज बांगर.आमर काशिद.संदिप मेंडके.शरद पवार. भरत पवार. नितीन आखाडे. आमर काशिद.कैलास भुजबळ. पारस तळेकर.सौ.दिव्या आजित वर्मा. श्वेता बळीराम लगड.सुदाम दुधाळ.आशोक सरपते.शरद धूरंधरे.ईत्यादी सह पंचेचाळीस रक्तदात्यानी सहकर्यकरत सदरील शिबीर पार पाडले या वेळी मादळमोहि येथील सरकारी दवाखन्यातील डाँ.नर्स सेवक सुपरवायझर. तर विशेष बीड येथून आलेले जिल्हा आरोग्य विभागात कामरणारे ब्लड डोनेशन टिम या सर्वानी मादळमोहि रक्तदान शिबीरास सहकार्य केल्या बद्ल गावकर्यानी सर्वाचे आभार मानले.
अंबड़ तालुक्यातील वाड़ी शिराढोंन येथे पिण्याच्या पाण्याची सुवेवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष

एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत


अंबड़/अरविंद शिरगोळे: कोरोना विषाणु ने तर जगभरात खळबळ झाली आहे. त्यातली त्यात लॉक डाऊन संचारबंदी  अंबड़ तालुक्यातील वाडी शिरढोण येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून पानीचे प्रश्न होत आहे  ग्रामपंचयत
निश्काळजीपनाचे कळस,प्रशासन ही गंभीर नाही व  सरपंच शफीक पटेल याची दखल न घेता दुर्लक्ष केले आहे. यात गावकारी बांधव एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तरी गावकारी व भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू  घुले,अनिल जमधडे,संदीप उघडे,  यांनी प्रशासनाला वेळो वेळी कल्पना, नवेदन दिलेले असून तरी ही यावर अद्याप कुठलीही निर्णय घेतला गेलेला नाही.याची दखल लवकर लवकर घेण्यात यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू घुले व इतर कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे.


नळविहीरा गावात वाढला नशेली पदार्थ विक्री चा धुमाकुळ
जाफराबाद,प्रतिनिधी:- जाफराबाद नळविहीरा गावामध्ये जि. प. शाळेसमोर  दुकानामध्ये नसेली पदार्थ 
सर्वात जास्त प्रमाणात विकल्या जात आहे.यामुळे शाळेतील लहान मुलांना यावर परिणाम दिसून येत आहे याकडे शालेय शिक्षण समिती सदस्य काना डोळा करत आहेत. या दुकानामध्ये नसेली पदार्थ  तंबाखू गुटखा बार मावा पेट्रोल यादी नसेली पदार्थ विकल्या जातात. तर दुसरीकडे याच गावामध्ये जुगार खेळायला ५ ते६  गावचे लोक येत असतात. यामुळे कोरोना भिती  पोटी गावामधील नागरीकांना हिताचे वातावरण पसरले आहे.या गावाच्या शिवारात गावरान दारु सुध्दा मिळते. यामुळे गावातील महीलांना चितां जनक  होत आहे  . या संबंधी  आम्ही विचारपुस  केली असता ग्रामपंचायत कोणतेही कारवाई करायला तयार नाही.याकडे पोलीस प्रशासनाने सक्त प्रमानावर कारवाई करण्याची गरज आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...