सोमवार, ३० मार्च, २०२०

सामाजिक  आरोग्यासाठी, मानवी अस्तित्वासाठी नवतरुणांनी मोदी विचारधारेत सहभागी व्हावे:-बालाजी बच्चेवार
नांदेड (भगवान कांबळे ):- सामाजिक
 आरोग्यासाठी, मानवी अस्तित्वासाठी आधुनिक भारताच्या जडणघडणीत नवतरुनानी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रगल्भ विचारधारेत सहभागी व्हावे असे आव्हान भाजपाचे जेष्ठ नेते मा .बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
कोरोना व्हायरस चे गंभीर संकट सध्या आपल्या देशापुढे आहे. कोरोना व्हायरस मुळे अखिल मानव जात नष्ट होण्याचा महाभयंकर धोका आहे ?आणि ह्यातून सक्षम पणाने बाहेर पडायचे असेल तर मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचार धारेत नवतरुणांनी स्वतःला झोकुन घेऊन पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्व नागरिकांनी घरात बसून कोरोना व्हायरस चे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवतरुण यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान बच्चेवार यांनी केले आहे.
           
 बंधू-भगिनींनो विचार करा आपण एक किंवा दोन कुटुंब सांभाळतो तेव्हा आपली किती दमछाक होते ,तारा वरची कसरत करावी लागते .परंतु मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या वयाच्या(70 )सत्तराव्या वर्षी 130 कोटी जनतेची जबाबदारी खांद्यावर घेऊन सांभाळत आहेत. आणि मी आपल्या कुटुंबापैकी एक आहे भारतीय जनतेला हात जोडून विनंती करतो  कोरोना व्हायरस समूळ उच्चाटन करण्यासाठी सहयोग करा, आपल्या घरात बसा ,असे नम्र आव्हान वारंवार करत आहेत. म्हणून आपण खूप गांभीर्याने विचार करा? हा आजार किती गंभीर आहे ?म्हणून अशावेळी आपण सर्वांनी नवतरुणांनी सामाजिक आरोग्यासाठी मानव अस्तित्वासाठी मोदी विचारधारेत सहभागी व्हावे.
      राजकीय द्वेष ,व्यक्ती विरोध बाजूला सारून अशावेळी पंतप्रधानांना साथ द्या ,बळ द्या कारण कोरोना व्हायरस देशासमोर 'वैऱ्याची काळरात्र "होऊन समोर उभा आहे .आणि देशाचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान मोदीजी उभे आहेत हे आपल्या भारत मातेचे सौभाग्य आहे.
   देशावर आजवर बाह्य बाजूने आणि अंतर्गत बाजूने अनेक संकटे आली .कधी जागतिक दहशतवाद ,तर कधी अस्मानी संकट .मोदीजी यांच्या समोर आले .परंतु या संकटांना मोदीजींनी चिरडून टाकले आहे.

  कोणत्याही संकटात, लढाईत आपल्यातील  फितूर ओळखले की समोरच्या संकटाशी आणि शत्रूशी दोन हात सहज करता येतात -असे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगत होते.
      म्हणून आपण ह्या कोरोना व्हायरस च्या नाजूक संकट समयी कोणीही फितूर होऊ नका ?मा पंतप्रधानांच्या आव्हानाला तडा देऊ नका .कोणीही घराच्या बाहेर पडू नका जेणेकरून आपल्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल मानवी जीवनाला, अस्तित्वाला धोका होईल असे कृत्य करू नका
    आपल्या देशाला अनेक सार्वजनिक आरोग्याच्या संकटाचा इतिहास आहे .कारण प्रत्येक शतकातलं विसावं  वर्ष धोक्याचं ठरला आहे.
1720 ला -प्लेग आला
1820 ला -कॉलरा आला
1920 ला  -फ्लू आला
2020 ला कोरोना व्हायरस
        म्हणून मानवी जातीच्या अस्तित्वासाठी ,सामाजिक आरोग्यासाठी नवतरुनानी मोदी विचारधारेत सहभागी व्हावे कोरोणाच्या समूळ उच्चाटनासाठी आपण सहकार्य करावे असे माझे नम्र आव्हान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...