शनिवार, २५ एप्रिल, २०२०

अंबड़ तालुक्यातील किंनगांव येथे २८ वर्षीय युवकाचा विहिरीत पडूंन मृत्यु

       जनवरांना पाणी पाजत असता विहिरीत गेला तोल

अंबड़ /अरविंद शिरगोळे : अंबड़ तालुक्यातील किंनगांव येथील २८ वर्षीय युवकाचा विहिरीत पडूंन मृत्यु झाल्याची घटना काल दिनांक 24 एप्रिल रोजी घडली. 
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील  किनगाव  येथील युवक कृष्णा भाऊसाहेब तारडे वय २८ वर्ष हा शुक्रवार रोजी दुपारी १२.४५ वाजेच्यां सुमारास जनवरांना पाणी पाजण्यासाठी विहरीवर गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला यावेळी जवळपास कोनी नसल्याने पाण्यात बुड़ुन त्याचा दुर्दैवी  मुत्यु झाला असून त्यांचेकडे दुधाचे ८ ते ९ जनावरे असल्याने तो  दुधाचा व्यवसाय करत होता. याबाबत अंबड पोलिसात त्याचे नातेवाईक रावसाहेब तारडे यांच्या तक्रारीवरून ई .डी.दाखल करण्यात आली असून मयताचे पी.एम. उपजिल्हारुग्णालय अंबड येथे करून सदर बॉडी पो. कॉ . वनवे यांनी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिली असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल रंगनाथ सोनुने यांच्याकडे देण्यात आला आहे .मयत हा कुटुंबप्रमुख असल्याने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्र्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहिन असा मोठा परिवार आहे. सदर घटनेमुळे गावत हळचळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...