गुरुवार, १४ मे, २०२०

कोविड -19 च्या पार्श्वभुमीवर अतिजोखमीच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन वेळीच औषधोपचार करण्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश 



जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्हयात कोविड -19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, समाजातील काही अतिजोखमीच्या गटाला म्हणजेच क्षयरुग्ण,कुष्ठरुग्ण , एचआयव्ही संक्रमीत रुग्ण,मधुमेही,उच्च रक्तदाब असणारे रुग्ण,कर्करोग असणारे रुग्ण तसेच नवजात बालके ,गरोदर माता यांना तसेच समाजातील सर्व रुग्णांकरीता दैनंदिन आरोग्य सेवा नियमित सुरु ठेऊन अतिजोखमीच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना वेळीच औषधोपचार व आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...