गुरुवार, १४ मे, २०२०

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन.


जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील अनधिकृत वाळु चोरी करणाऱ्या तस्करांवर कार्यवाही करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांची मागणी


जालना,प्रतिनिधी :- २०१९ या वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी पडला मुळे परतुर-मंठा तालुक्यातील वाळु चोरणाऱ्या लोकांना ही संधी उपलब्ध झाली म्हणून. परतूर-मंठा तालुक्यातील रोज मोठ्या प्रमाणात अनधिकृत गौण खनिज वाळूची तस्करी होत आहे. या परतूर मंठा तालुक्यामध्ये वाळू तस्करी करणारी फार मोठी टोळी असून. ही टोळी दिवसा व रात्रभर जसी संधी मिळेल तसी वाळूची तस्करी करीत आहेत. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर येथे दि.२४/२/२०२० रोजी निवेदन देऊन वाळू तस्करी बाबत तक्रार करण्यात आली होती. परंतु वाळू तस्करी करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही झाल्या दिसून येत नाही. कोरोना मुळे लॉकडाऊन हे तर वाळु चोरणाऱ्या लोकांच्या पथ्यावर पडले. या लॉकडाऊनच्या काळात ५० ते ५५ दिवस लॉकडाऊन मध्ये वाळू तस्करांनी वाळु चोरीच्या वाळूची विक्री तिप्पट दराने विक्री करीत आहे‌त. एक वाळूच्या हायवा गाडी ची किंमत सध्या ३५ ते ४० हजार रुपये प्रती गाडी किंमत आहे. हि  तस्करी वाळू चोरी मंठा तालुक्यातील. पूर्ण नदी पात्रातुन मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यात पण विक्री होत आहे. तसेच मंठा तालुक्यात वाळूची विक्री फार मोठी प्रमाणात चालू आहे. परतूर तालुक्यातील दूधना नदी. गोदावरी गंगा नदी. निम्न दुधना प्रकल्प धरणात पाणी कमी असल्यामुळे परतुर तालुक्यातील  परतूर सेलू रोडवरील चिंचोली सालगाव फुलाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात व या धरणाच्या पात्रातून वाळूची तस्करी करून चोरीच्या मार्गाने बांधकाम करणारे लोकांना तिप्पट किमतीने वाळू तस्कर वाळू उपलब्ध करून देते. या वाळू तस्करी चोरी करणारे पूर्णा नदी. दूधना नदी.गोदावरी (गंगा) नदी.या सर्व पात्रातुन. खास बाब म्हणजे यावर्षी निम्न दुधना प्रकल्पाच्या पात्रात कमी पाणी असल्यामुळे वाळू तस्कर चोरांचा मोर्चा तिकडे वळाला आहे. या ठिकाणा वरुण वाळू तस्करी चोरी केली जाते याची संपूर्ण माहिती या सर्व सजा मध्ये कार्यरत असलेले मंडळाधिकारी तलाठी यांना पूर्ण कल्पना असते परंतु चिरीमिरी मुळे हे मंडळाधिकारी व तलाठी कार्यवाही करत नाहीत. उदाहरणार्थ एखादी कारवाई केली तर ती यामुळे केलेली असते मंडळ अधिकारी व तलाठी यांचा हप्ता न मिळालाल्या मुळे. म्हणून कधी कधी मंडळ अधिकारी व तलाठी कार्यवाही करीत असतात. म्हणून मंडळाधिकारी व तलाठी यांना चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे वाळुंज चोर त्यांच्यावर ते कार्यवाही करत नाहीत,कारण हजारो ब्रास वाळूची तस्करी चोरी होत असेल आणि मग फक्त ५० ते १०० ब्रास वाळू चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो.या वाळू तस्कर चोरीला आळा बसतांना दिसत नाही. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गौण खनिज यांच्या मार्गदर्शनाखाली एक नविन पथक नेमून. पूर्ण नदी. दुधना नदी. निम्न दुधना संपूर्ण प्रकल्प पात्र.गोदावरी गांगा नदी या सर्व पात्रातून आज पर्यंत किती ब्रास वाळू चोरी गेली असेल या बाबत जनतेला माहिती द्यावी व या वाळू तस्करी चोरी प्रकरणाला संबंधित मौजे सजाचे मंडळाधिकारी तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. यापूर्वी उपविभागीय अधिकारी परतूर यांना या पात्रातून वाळूची तस्करी होत असल्याचा निवेदन देऊ तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी परतुर तहसीलदार मंठा तहसीलदार यांना संबंधित वाळू चोरीप्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या बाबत जा.क्र.२०२० जमा बंदी/कावी.दिनांक ०५/०३/२०२०. पत्र देण्यात आले होते परंतु पुढे परतुर तहसिलदार व मंठा तहसिलदार. या दोन्ही तहसिलदारांनी या वाळु चोराच्या विरोधात कठोर कार्यवाही  केलेली दिसून आली नाही. आणि कामात हलगर्जीपणा केला असे दिसून येत आहे.परतूर-मंठा तालुक्यातील वाळू तस्कर वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी नविन पथक निर्माण करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच आजपर्यंत अंदाजे किती वाळूचोरी झाली असेल याचे मोजमाप करून संबंधित मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून दंड वसूल करून.वाळु चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करून त्या वाळू तस्करांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना मार्फत केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...