गुरुवार, १४ मे, २०२०

राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह

जवानांना जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज

डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी दिला टाळया वाजवुन निरोप.



राज्य राखीव पोलीस दलातील जवान व परतुर येथील 32 वर्षीय युवकाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना,प्रतिनिधी :- राज्य राखीव पोलीस बलगट क्र.3 चे कोरोनाबाधित असलेल्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटीव्ह आल्याने त्यांना आज दि. 14 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी चारही जवानांना टाळया वाजवनु निरोप दिला. या जवानांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  तसेच राज्य राखीव पोलीस बलगट क्र.3 मधील एक जवान व परतुर येथील 32 वर्षीय पुरुषाच्या स्वॅबचा अहवाल आज दि. 14 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.**
आनंदनगर नुतन वसाहत येथे राहणारी व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल दि. 11 मे रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या लोरिस्क 9 सहवासितांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला आहे.  तसेच रंगनाथनगर पाण्याची टाकी परिसर, जालना येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील ३ हायरिस्क व 8 लोरिस्क असे एकुण 9 व्यक्ती संपर्कात आले होते.  त्यापैकी ३ जणांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला असुन उर्वरित 8 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.  अंबड तालुक्यातील कानडगाव येथील कोरोनाग्रस्त आढळलेल्या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ५ हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला असल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकुण 1606 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 21 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 839 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 14 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1269 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 17 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1234, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 254, एकुण प्रलंबित नमुने -14 तर एकुण 818 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या - 5, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 629 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-87, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -431, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-9, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -21, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -10, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 315 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन  117 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 3 हजार 83 असे एकुण 3 हजार 200 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4369, बिहार-2944, मध्यप्रदेश-1014,राजस्थान-658, पश्चिमबंगाल-469, झारखंड-418, यासह उर्वरित 16 राज्यातील एकुण 10891 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 4776 अशा एकुण 15667 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-119,आंध्रप्रदेश-103,ओरिसा-113,मध्यप्रदेश-710,छत्तीसगड-8, उत्तरप्रदेश-2673, झारखंड-03,राजस्थान-107, तेलंगणा-27, हैद्राबाद-05 अशा एकुण 3868 नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे. परदेशी अडकलेल्या भारतीयांना स्वगृही  आणण्यासाठी भारत सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्यात चार नागरिक दाखल झाले आहेत.  कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 431 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-07,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-12, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-23,पोलीस प्रशिक्षण केंद्र-81, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-08, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-4, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -77, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -35, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 18, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-45, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-64,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, भोकरदन-23 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 579 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 103 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 574 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 83 हजार 200 असा एकुण 310008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...