शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांच्या वतीने मा.पोलिस आधिक्षक औरंगाबाद निवेदन सादर.
औरंगाबाद,ब्युरो चीफ :- आज जगभरात कोरोनो (कोविड 19) या संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला असून अनेक जण मरत आहेत, तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारने यांनी अनेक कठोर पावले उचलली आहेत,परंतु त्याचे गांभीर्य मिसर् वाडी भागातील काही लोक घेत नाहीये व बेशिस्त वागत आहेत,तसेच इतकी महामारी असतानी आपल्या भागात पोलिस प्रशासन यांचा दिवसात फक्त एक किंवा दोनच राऊंड होतात, त्यामुळे नागरिक पण त्याविषयी गांभीर्य घेत नाहीये म्हणून मिसरवाडी भागासाठी चौक मधे पाच किंवा आधिक पोलिस प्रशासन यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख मिसारवाडी संभाजीनगर विकी लोखंडे यांनी निवेदनात केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा