शुक्रवार, १५ मे, २०२०

वरखेडा विरो येथे वीज पडून बैलजोडी मुत्युमुखी.



जाफ्राबाद,प्रतिनिधी:- तालुक्यात दि. १३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जोरदार मेघगर्जनेसह पाऊस झाला, पावसाबरोबरच वारा व विजेचा कडकडाटही जोरदार होता. या पावसातच तालुक्यातील वरखेडा विरो येथील शेतकरी दिनकर भाऊराव तायडे यांची बैलजोडी शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेली असतांना वीज पडून जागेवरच मुत्यूमुखी पडली असून तायडे यांचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या तोडांवर बैलजोडी मेल्याने तायडे यांच्या समोर संकट निर्माण झाले असून त्यांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी तेथील शेतकरी गजानन उबाळे, दत्तु उबाळे, राम उबाळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...