बुधवार, १० जून, २०२०

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर यांना विधान परिषदेवर संधी द्या संतोष जमधडे यांच्यासह ओबीसी समाजाची मागणी



जालना (प्रतिनिधी):- जालन्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी माळी महासंघ मराठवाडा विभागीय अध्यक्ष संतोष जमधडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, भास्करराव अंबेकर हे विद्यार्थी दसेपासुन सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक, शहर प्रमुख, नगराध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी शिवसेनेत निष्ठापुर्वक, यशस्वीपणे पार पडल्या असून त्यांना अनेक वेळा विधानसभा निवडणुकीत डावलून सुद्धा त्यांनी शिवसेनेवर कायम निष्ठा ठेवत आजही पक्ष कार्यासाठी तळमळीने स्वतःला वाहून घेतले आहे. त्याचे हे कार्य आणि पक्ष निष्ठा आपणास नाक्खीच ग्यात आहे.
मराठवाडा हा ओबीसी बहुल भाग आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने या विभागातील सामाजिक रचनेचा विचार करून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या नियुक्त्या दिल्या आहेत जसे भाजपा राज्यसभेवर भागवत कराड विधान परिषदेवर बीड येथील कराड, कॉग्रेस पक्षाने राज्यसभेवर राजीव सातव, विधान परिषदेवर राजेश राठोड, राष्ट्रवादी पक्ष विधान परिषदेवर धनंजय मुंढे आणि यांना मंत्री पद म्हणजे या मराठवाडा विभागात सर्वच पक्षांनी ओबीसी समीकरण जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे आणि त्या पक्षाला त्याचा फायदाही झाला आहे.
         त्यामुळे आपल्या पक्षाने देखील आता सामाजिक समीकरणे जपुन मराठवाडा पुर्ववत आपला बाले किल्ला ठेवण्यासाठी भास्करराव अंबेकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणुन नियुक्ती द्यावी कारण महाराष्ट्रात माळी समाज लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात नंबर 2 वर असून मराठवाड्यातही ओबीसी मधील मोठा समाज आहे आणि तो आज पर्यंत कायम भास्करराव अंबेकर आणि शिवसेना पक्षाच्या खंबीरपणे पाठीशी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकाही माळी समाजातील एकाही कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही. तरी पण माळी समाज कायम 70 ते 80 टक्के शिवसेनेसोबत राहुन भरगोस मते शिवसेनेच्या पारड्यात टाकली असून दि. 15 जून रोजी विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त होत असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सर्व माळी समाज व भास्करराव अंबेकर समर्थकांची मागणी आहे. मराठवाड्यातील अभ्यासु, विकास प्रिय, सामन्यातील असामान्य सर्व समावेशक नेतृत्व म्हणुन ओळख असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख जालना भास्करराव अंबेकर यांना विधान परिषद उमेदवारी देण्यात यावी आणि मराठवाडा शिवसेनेचा बाले किल्ला कायम ठेवावा अशी मराठवाड्यातील शिवसैनिक, माळी समाज, सर्व ओबीसी समाज व अंबेकर  समर्थकांनी अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...