बुधवार, १० जून, २०२०

बीड हँलो रिपोर्टर न्युज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज वाटप करतांनी बँकांनी फेरफार हि अट रद्द करण्याची मनसे च्या वतीने मागणी.

 मा.विभागीय आयुक्त साहेब(कार्यालयऔरंगाबाद) यांच्या कडे निवेदन सादर


जालना,ब्युरोचीफ :- मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी फेरफार नक्कल विना शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्या बाबत बँकांना आदेश दिले आहेत, म्हणून ११ते १६ जुन दरम्यान जिल्हाधिकारी जालना फेसबुक लाईव्ह अधिकृत जालना जिल्ह्यातील जनतेशी संपर्क करणार आहेथ, या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक कर्ज हा विषय मार्गी लागावा, यापूर्वी पिक कर्ज मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ जून अंतिम तारीख दिल्याली आहे, यापूर्वी ते कर्जासाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून पीक कर्जाची मागणी केली होते, यापैकी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पिक कर्ज साठी ऑनलाईन अर्ज केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना बँक एसएमएस करून बोलून घेत आहे परंतु कर्ज प्रकरणातील बँकेने मागितलेले ७/१२, होल्डिंग,आधार, इतर बँकेच्या सूचनेनुसार महत्त्वाचे कागदपत्र असतांनी फेरफार चे गरजच नाही, म्हणून कागदपत्र यामध्ये फेरफार ची नक्कल काढताना संबंधित शेतकऱ्यांना खूप अडचण येत आहे, म्हणून ही फेरफार अशी जाचक अट वाटत आहे,या फेरफार अटीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप खाण्यास खूप विलंब होणार आहे,यामुळे फेरफार नक्कल कर्ज वाटप करताना बँकेने मागणी करून नये,अशा प्रकारचे संबंधित बँकेला आदेश द्यावा करण कोरोना साथीच्या रोगांमुळे अनेक जाग्यावर कागदपत्र काढण्यासाठी अडचणी फेरफार नक्कल काढायला सुद्धा खूप अडचणी येत आहेत, या सगळ्या सगळ्या पूरस्थितीचा विचार करून खरिपाची पेरणी थोड्याच दिवसात सुरू होणार आहे, या  सर्व दृष्टिकोनातून विचार करून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फेरफारची विनाअट बँकेने पीक कर्ज संकट समयी लवकरात लवकर उपलब्ध व्हावे...
 सध्याची परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फेरफार कल विना अट पीक कर्ज मंजुरी करण्यासाठी बँकांना आदेश देऊन शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून व्हावे,  कारण कारण मराठवाड्यातील इतर जिल्हा अधिकाऱ्यांनी यांनी फेरफार नक्कल न घेता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्या बाबत आदेश दिले आहेत, ह्याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज विना फेरफार उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी  मा.विभागीय आयुक्त साहेब(कार्यालयऔरंगाबाद) यांच्या कडे निवेदन सादर केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...