रोजगार हमी योजनेची कामे सुरु ठेवण्याची मागणी
परतूर –प्रतिनिधी इम्रान कुरेशी
हॅलो रिपोर्टर न्युज
तालुक्यात रोजगार हमी योजनेचे कामे सुरु ठेवण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे युवक जालना जिल्हाध्यक्ष अच्युत पाईकराव यांनी तहसीलदार रूपा चित्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि लॉकडाऊनच्या काळात मंजुराच्या हाताला काम मिळाले नाही.यामुळे गरिबांच्या घरात अन्न धान्य व संसार चालवण्यासाठी पैसे नाहीत. मंजुराना हाताला कामे मिळावे म्हणून शासन स्तरावर कामे चालू करण्याच्या सांगितले जात असताना ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकांच्या उदासीन धोरणामुळे व पावसाळा सुरु झाल्याचे करण पुढे करत कामे बंद केले आहेत. जो पर्यंत चांगला पाऊस होत नाही तो पर्यंत रोजगार हमी योजनेचे कामे सुरु करण्याची ठेवण्याची मागणी शेवटी पाईकराव यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा