मंगळवार, २८ जुलै, २०२०

कलाठिया कंपनी चा गौण खनिज (दगड) उत्खनन व वाहतुकीच तातपुरता परवाना समाप्त झाला असून तरी ही उत्खनन सुरु - राहुल व्ही खरात


अंबड,प्रतिनिधी :- में कलाठिया इंजीनियरिंग ऐंड कंस्ट्रक्शन ली.अहमदाबाद गुजरात या कंपनीस पाचोड-अंबड,घनसावंगी, आष्टी रसत्याच्या कामा करिता दगड या गौण खनिजाच्या 7000 ब्रास इतक्या मर्यादा व वाहतुकीसाठी अल्प मुदतीचा तातपुरता खांनपट्टा परवाना दिलेला होता.त्याची काढण्याची मुदत दि.5/6/2020 पासून ते मुदत दि.20/6/2020 पर्यंत सम्पात होत आहे.सदरिल खान ही मौजे वलखेड़ा गट न.25 आणि 31मध्ये परवानगी देण्यात आली.दगड काढण्याची मुदत समाप्त होऊन एक महीना उलटला तरी देखील उत्खनन सुरुच आहे.
कलाठिया कंपनीला 7000 ब्रास गौण खनिज दगड काढण्याची परवानगी आहे.म्हणून संबधित अधिकारी यांनी कलाठिया कंपनीचा चाललेला भोंगळ कारभार तात्काळ बंद करावा.आणि स्थल पंचनामा करुण ती खान सिल करण्यात यावीत.शासनाने दिलेल्या परवानगी ची पायमल्ली कलाठिया कंपनी करत आहे.त्यामुळे कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावीत.तसेच वाहतुकीसाठी शासकीय वाहतुक पासेस खनिकर्म अधिकारी यांच्या कडून घेण्यात आल्या का? यांची ही तपासणी करण्यात यावी.दगड उत्खनन परवानगी ची मुदत संपुन ही कलाठिया कंपनी राजरोज पणे सर्व नियम धाब्यावर बसवत आहे.
मर्यादा पेक्षा एक महीना जास्त दगड उत्खन करून अवैध रित्या काढलेला दगड कुठे नेण्यात आला?आणि विशेष म्हणजे या वर नियंत्रण ठेवनारी महसूल यंत्रणा गप्प का?तसेच परवाना दिला असल्याची माहितस्तव प्रत संबधित मंडल अधिकारी,तलाठी यानां ही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून देण्यात आलेली असते ,मग मुदत संपुन एक महीना उलटला तरी सुद्धा उत्खनन सुरु कसे ?आसे मत रिपब्लिकन सेना युवा जिल्हा आध्यक्ष राहुल व्ही खरात यांनी प्रसिद्धि पत्रकात व्यक्त केले आहे.

कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन.


अकोला,ब्युरो चीफ :- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महिला सचिव तथा कोकण निरीक्षक, कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे काल दुःखद निधन झाले.
वंचित बहुजनांचा आवाज समजल्या जाणाऱ्या तसेच सातत्याने कोळी समाजाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देणाऱ्या सुमन ताई कोळी यांचे दुःखद निधन झाले. कोकणात त्यांनी महिलांच्या माध्यमातून मोठा गट तयार केला होता. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक रायगड मधून लढवली होती. त्यांच्या जाण्याने आमच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.
ताईंच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. अशा शब्दात वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


सोमवार, २७ जुलै, २०२०

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पात येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संरक्षण करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



सिडको ने पाडलेल्या केरुमाता बौद्ध लेणी ला ना रामदास आठवलेंनी दिली भेट

बौद्ध लेण्यांच्या पुरातन अवशेषांचे लेण्यांचे जतन करण्यासाठी भव्य बौद्ध स्तूप उभारण्याची ना रामदास आठवले यांची सिडको ला सूचना;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविणार



मुंबई,ब्युरो चीफ  :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी 1हजार 100 हेक्टर जागेत पनवेल तालुक्यातील 10 गावांचे पूर्वसन करण्यात आले असून त्यात  येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे.  विमानतळाला आमचा विरोध नाही मात्र  बौद्ध लेण्यांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासाठी 
भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आपण प्रयत्न करू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 5 एकर जागेत भव्य बौद्ध  स्तूप उभारून बौद्ध लेण्यांचे अवशेष जतन करावे या मागणी साठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

उलवे पनवेल येथून जवळ असणाऱ्या वाघिवली वाडा येथील कोंबडभुजेमधील केरुमाता बौद्ध लेणी सिडको ने पाडल्यानंतर तेथे आज ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.

पाडण्यात आलेल्या केरुमाता  बौद्ध  लेणीचे पुरातन अवशेष सुरक्षितरित्या उत्खनन करून जतन करावेत. त्यासाठी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ  भव्य बौद्ध स्तुप उभारावा अशी सूचना सिडको प्रशासनाला ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.यावेळी पनवेल चे उपमहापौर आणि रिपाइं चे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड; सुरेश बारशिंग; नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ; महेश खरे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

  नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येणाऱ्या परिसरात केरुमाता बौद्ध लेणी तसेच कुंडेवहाळ येथील कुलुआई मंदिर; ओवळा पाणेरी आई लेणी आणि दापोली येथे राणू आई  लेणी या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे. त्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याला मार्फत प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
डॉ.कफिल खान यांची तात्काळ सुटका करा- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा

         राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने निवेदन सादर.


हिंगणघाट,ब्युरो चीफ :- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत
मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा च्या माध्यमातून डॉ कफिल खान यांच्या सुटकेसाठी दिनांक 27-07-2020 सोमवार रोजी राष्ट्रपतीला हिंगणघाट तहसीलदार द्वारा निवेदन देण्यात आले.
लोकशाही मध्ये सरकारच्या जनविरोधी नीतीच्या विरोधात आंदोलन करणे हा देशातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, या अधिकारांतर्गत संविधानिक मार्गाने एनआरसी, सिएए या कायद्या विरोधात देशभर आंदोलन झाले होते, लोकडाऊन च्या काळात केंद्र सरकार द्वारे विशेषतः एनआरसीचा विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्याला व विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
या कायद्याचा विरोध करणारे डॉ कफिल खान वर खोट्या आरोपात कारागृहात टाकण्यात आले, या अगोदर गोरखपूर अपघात घटनेत डॉ कफिल यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मुलांचा जीव वाचविला होता, त्याठिकाणी उत्तरप्रदेश सरकारच्या हलगर्जीपणामुळे ७० मुलांचे जीव गेले, त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप लावून कारागृहात टाकल्या गेले होते त्यानंतर डॉ कफिल खानची सुटका झाली.आताही डॉ कफिल खानला नाहक त्रास देऊन कारागृहात टाकण्यात आले आहे जिथे डॉ कफिलच्या जीवाला धोका आहे.त्याचप्रमाणे एनआरसी,सिएए चा विरोध करणारे जेएनयु, जामिया इस्लामीया आणि अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालय च्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस टाकल्या गेले आहे, नुकत्याच झालेल्या दिल्लीतील दंग्यांमध्ये पोलीसद्वारा हाच मार्ग आजमावल्या जात आहे,   
याविरोधात संपूर्ण भारतात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ३५राज्य,५००जिल्हे आणि ४००० तहसील मध्ये मा.राष्ट्रपती ला मा.तहसीलदार द्वारे निवेदन देण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांवरच्या खोट्या केसेस तात्काळ मागे घेऊन डॉ कफिल खान यांची सुटका करावी असे निवेदन देत राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष हाजी मिर्जा परवेज बेग, तालुका अध्यक्ष तालिब शेख, शहर अध्यक्ष महम्मद शाकिर, बहुजन क्रांती मोर्चा संयोजक इंजि.निखिल कांबळे, मयूर पाटील, गेमदेव म्हस्के, नम्रता नरांजे बिविसीपी, गजानन माऊसकर, लक्ष्मीकांत जवादे, चंद्रहास कांबळे,गजानन वऱ्हाडे, संजय डोंगरे इत्यादी सहयोगी संघटन उपस्थित होते.

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

                          अण्णाभाऊंना भारतरत्न का मिळावा

मित्रहो
         बहुतांश पुढारी नेते अण्णाभाऊं कडे फक्त एक महान लेखक व कवी या दृष्टिकोनाने पाहतात पण याच्या पलीकडेही अण्णाभाऊंचे योगदान हे फार मोलाचे आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी येथील शेतकरी कष्टकरी कामगार यांची व्यापक चळवळ उभी केली व एक मोठा निकराचा लढा अण्णाभाऊंनी दिला लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून अण्णा भाऊंनी आपल्या पहाडी आवाजाने शाहिरी सादर करून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जनजागृती केली त्यामध्ये शाहीर शंकर भाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर शाहीर पट्टे बापूराव कुलकर्णी यांनी अण्णाभाऊंना मोलाची साथ दिली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी अण्णाभाऊंनी एक मोठा क्रांतीचा लढा या महाराष्ट्रात उभा केला व अखेर ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली 15 ऑगस्ट 1947 साली हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947 साली अण्णाभाऊंनी आझाद मैदान मुंबई येथे 20 हजार लोकांचा मोर्चा काढला व त्यामध्ये यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है ही प्रमुख घोषणा देण्यात आली अण्णाभाऊ आपल्या वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत असं म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून येथील दलित कष्टकरी कामगार यांच्या तळहातावरती तरलेली आहे बंगालच्या फाळणीनंतर बंगालची हाक हा पोवाडा लिहून अण्णाभाऊंनी मानवतेचे दर्शन या जगाला घडवलं तसेच गोवा मुक्तिसंग्राम व हैदराबाद मुक्तिसंग्राम यामध्ये अण्णाभाऊंचे अमुलाग्र योगदान आहे तसेच छत्रपती शिवबांचा पोवाडा रशियाच्या चौकाचौकात डफावरची थाप मारून गाणारे अण्णाभाऊ होते छत्रपती शिवरायांचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे अण्णाभाऊ साठे होते अण्णाभाऊ हे महान लेखक व कवी होतेच पण त्याच्याही पलीकडे जाऊन अण्णाभाऊ हे एक थोर महान समाजसुधारक थोर महान क्रांतिकारक होते. अण्णा भाऊंनी आपल्या लेखनातून येथील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्या वरती घाव घातला व जे नायक-नायिका काळाच्या पडद्याआड गेले होते त्यांना अण्णाभाऊंनी पुन्हा जिवंत केलं अण्णाभाऊंनी ज्या प्रकारे आपल्या फकीरा कादंबरीत फकिराला जे स्थान दिलं तसेच स्थान शंकर पाटील व विष्णुपंत कुलकर्णी यांनाही दिले या भारताची संस्कृती खर्‍या अर्थाने कोणी जगासमोर मांडली असेल तर ती आण्णाभाऊंनी मांडली आहे आणि म्हणूनच भारतरत्न या पुरस्काराचे खरे हक्कदार साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हेच आहेत 2019-20 हे अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे देशभरातून अण्णाभाऊंच्या अनुयायांकडून अण्णा भाऊंना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतरत्न ची मागणी केली जाते व शासनाने या मागणीला अनुसरून अण्णा भाऊंना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन अण्णाभाऊंचा गौरव करावा अशी मी शासनास विनंती करतो

          सुरज साठे
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे
       जन्मभूमी वाटेगाव
         9370626619

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...