बुधवार, २२ एप्रिल, २०२०


              अत्यावश्यक सेवेतील  दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2
                             या वेळेतच सुरु ठेवावीत.

           जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना,प्रतिनिधी:- जालना शहरासह जिल्ह्यातील सर्व दुधविक्री, फळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पेट्रोलपंप, घरगुती गॅस व औषधी दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच सुरु ठेवावीत. या व्यतिरिक्त ईतर सर्व दुकाने 
जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 302 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-15, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 304 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 302 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 766 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 38 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 449 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 20 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 544 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 515, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 91, एकुण प्रलंबित नमुने-22 तर एकुण 411 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 89, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 27, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -302, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-09, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 38, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये संचारबंदीमुळे जालना जिल्ह्यातील अडकलेल्या ऊसतोडणी मजुर व ऊस वाहतुक करणारे कामगार व त्यांच्या कुटूंबियांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार मजुर ज्या जिल्ह्यात कामगार म्हणून काम करत आहेत तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मान्यता दिल्याच्या पत्राची प्रत त्यांना जालना जिल्ह्यात प्रवेशासाठी आवश्यक राहील. तसेच मान्यतेसोबत कामगारांचे त्यांच्या निवासी पत्त्यासह, गाव, तालुका व जिल्हानिहाय यादी, संबंधित कामगारांच्या गावातील सरपंचाचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांक याचा उल्लेख असावा. ज्या वाहनातुन  कामगार प्रवास करणार आहेत त्या वाहनांची  रीतसर परवानगी पत्र, कामगारांच्या वाहतुकीबाबत आवश्यक ते परवाने घेण्याची कार्यवाही करण्याबरोबर कामागारांना प्रवासामध्ये भोजन, पिण्याचे पाणी आदी व्यवस्थेची जबाबदारी संबंधित कारखान्यांची राहणार आहे.कामगारांना घेऊन वाहने जालना जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यानंतर पोलीस विभागाने येणाऱ्या वाहनांची चेकपोस्टवर संपुर्ण कागदपत्रांची व यादीतील व्यक्तींची तपासणी करावी. तसेच यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. चेकपोस्टच्या ठिकाणी पोलीस विभाग संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामगारांची तपासणी करेल. कामगार गावात आल्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांनी त्यांना वेगळे ठेवण्यासाठी योग्य अशी जागा निवडावी व आरोग्य विभागाच्या मदतीने संबंधित कामगारांना 14 दिवस क्वारंटाईन करावे. तसेच मुळ गावी पोहोचल्यानंतर कामगारांचा गावप्रवेश, कामगार मुळगावी पोहोचल्याचे प्रमाणपत्र संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणे बंधनकारक राहील.तालुका आरोग्य अधिकारी हे संबंधित कामगारांची सरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने 14 दिवस क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करतील व त्यांच्या दैनंदिन तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करतील. पथकाने त्या कामगारांची 14 दिवस दररोज भेट देऊन तपासणी करावी व अहवाल नियमितपणे जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन टाऊन हॉल परिसरातील एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजारानेग्रस्त आहेत.  वाटुर ता. परतुर येथील 34 वर्षीय पुरुष, रोषनगाव ता. बदनापुर येथील 21 वर्षीय तरुण, लालबहादुरशास्त्री महाविद्यालय परिसर, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष हे न्युमोनियानेग्रस्त असुन अंबड येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण क्षयरोगग्रस्त असुन जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल आहेत.  या सर्व रुग्णांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आलेले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.


मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

किनवटमध्ये डीसीएचसी, सीसीसी या दोन रुग्णालय व तपासणी केंद्राची स्थापना
     तपासणीसाठीचा घश्याच्या स्त्रवाचा नमुना घेता येणार
नांदेड(भगवान कांबळे):- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) व शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले असून कोरोना सदृश्य
लक्षणे आढळलेल्या रुग्णास येथे प्रविष्ठ करून त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व घश्याच्या स्त्राव घेऊन चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.जगभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना (कोव्हीड- 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. याचाच एक भाग म्हणून  कोरोना नियंत्रणासाठी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात  प्रशासनाच्यावतीने  तयारी करण्यात आली आहे.  उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सर्व वैद्यकीय साधनसामुग्री वऔषधांसह सुसज्ज पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर ( डीसीएचसी ) उभारण्यात आले आहे. तहसिलदार नरेंद्र देशमुख हे या केंद्राचे नोडल ऑफिसर अत्यावश्यक सेवा  म्हणून काम पाहणार असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे वैद्यकीय अधिकारी, नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. एखाद्या नागरिकास ताप, सर्दी, खोकला किंवा श्वासोच्छवासास अडथळा येणे, दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कोरोनासदृश्य रुग्ण म्हणून येथे भरती करून घेण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून   चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.किनवट येथील नवीन तहसिल इमारतीत शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले आहे. गटविकास अधिकारी सुभाष धनवे हे या केंद्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार असून तालुका आरोग्य अधिकारी, मेडिकल नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डॉक्टर व ईतर कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. या केंद्रात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेली व्यक्ती किंवा परदेशातून तथा रेड झोन असलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस कोणतीही कोरोनासदृश्य लक्षणे नसतील तरीही त्यांना या केंद्रात भरती करण्यात येणार आहे. चौदा दिवस ते येथेच कोरोंटाईन असतील. या कालावधीत दैनंदिन तपासणीअंती काही लक्षणे आढळल्यास त्यांना डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर (डीसीएचसी) मध्ये भरती करण्यात येईल. तेंव्हा नागरिकांनी सतर्क राहून अशा व्यक्तिंना घरातच दडून न राहता सदरील केंद्रांत भरती करण्यास प्रवृत्त करावे. आपण जरी ग्रीन झोनमध्ये असलो तरी 'लॉकडाऊन' च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटप
धर्माबाद (भगवान कांबळे ):- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळा (ता. १५) मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. 
मागील पंचवीस  दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी सुरक्षितपणे आपापल्या घरी वावरत आहेत.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करून गुजराण करतात. मागील पंचवीस दिवसांपासून सर्व व्यवसायिक शेतीची कामे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून मध्यान्ह भोजन दिल्या जात असे. त्यामुळे मुलांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था शाळेमध्येच होत असल्याने पालकांनाही आधार मिळत असतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 23 मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहारात खंड पडला आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ वितरित करण्याचे शिक्षण संचालक यांनी 15 एप्रिल रोजी एक पत्र काढून आदेशीत केले होते. त्यानुसार धर्माबादच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वितरित करण्यात आले. सर्व विद्यार्थी व पालकांना सुरुवातीस सामाजिक योग्य अंतर ठेवण्याचे व तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधूनच उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, पत्रकार तथा समितीचे शिक्षणतज्ञ भगवान कांबळे, नगर सेवक शाळेचे स्वीकृत सदस्य रमेश पाटील बाळापूरकर, सदस्य गंगाप्रसाद रापतवार, सय्यद अहमद अब्दुल, महेंद्र तामटे, सौ. लक्ष्मीबाई आंबेवार, सौ. अजमेर सय्यद कलीम, निर्वाण वाघमारे यांच्यासह मुख्याध्यापक एम. एन. कागेरू, नासा येवतीकर, माधव हिमगिरे, ए. एस. सय्यद या शिक्षकांची उपस्थिती होती.

सोमवार, २० एप्रिल, २०२०


राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वाघरुळ येथील चेक पोस्ट येथे भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी बुलढाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नलावडे व जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

रविवार, १९ एप्रिल, २०२०


*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी*
*कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता**-- गृहमंत्री अनिल देशमुख*
*जालना, ब्युरो चीफ*  –  जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये.
यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना गृहमंत्री श्री देशमुख बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.गृहमंत्री श्री देशमुख म्हणाले,  देशासह राज्यावर कोरोना विषाणुची आपत्ती कोसळली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुमुळे केवळ एक महिला बाधित आहे.  परंतू जिल्ह्यात या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासनाने योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.गरजूंना स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातुन वेळेत पुरेसे धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबरोबरच ज्यांच्या रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींनासुद्धा धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या पराज्यातील मजुर तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगली व्यवस्था केल्याने गृहमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी मंत्री महोदयांना दिली.


औरंगाबादचे डीएचओ डॉ. गीते यांच्या कारमध्ये विदेशी दारूसह                           06 लाख रुपये सापडले !
जिल्हा बंदीचे केले उल्लंघन ; बदनापूर जवळ चेक पोस्टवर पोलिसांनी पकडले
जालना,प्रतिनिधी :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेली जिल्हाबंदी मोडीत काढत चक्क कारमध्ये विदेशी दारू आणि सात लाख रुपयांची रोख  रक्कम घेऊन 
जालन्याकडे निघालेल्या औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना  बदनापूर तालुक्यातील वरुडी चेकपोस्टवर पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर l जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने तेथील कोणत्याही वाहनांना जालना जिल्ह्यात विनापरवानगी येता येत नाही. शनिवारी  ( दि.१८) औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे त्यांच्या ( एम.एच.२० सी. यू. ०३५३ )  महागड्या इर्टीका कारमध्ये विदेशी दारू आणि ६ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम सोबत घेऊन  जालन्याकडे त्यांच्या मूळगावी बुलढाणा जिल्ह्यात लोणारकडे निघाले होते. त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन लिहिलेले होते.जालना जिल्ह्याच्या सीमेवर बदनापूर तालुक्यातील वरुडीनाक्यावर त्यांची गाडी पोलिसांनी अडवून तिची तपासणी केली.यावेळी गाडीत रोख 6 लाख 70 हजार रुपये, 6 हजार रुपये किंमतीची दारू आढळून आली.रोख रक्कम, दारू व 6 लाख रुपये किंमतीची कार, असा एकूण 12 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी डॉ. अमोल गीते यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे 51 (ब), महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या 65 (अ) (ई) आणि भादंवि. 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र व शिवसेना-युवासेना पक्षाच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर अन्न धान्याचे २८०० किट व ९००० कुटुंबना कांदा व बटाटेचे किट वाटप करुण मानुसकीचे नाते जपले.
प्रतिनिधी |नाशिक आजचा चौदावा दिवस दि १८/४/२०२० प्रभाग क्र 9 शिवाजीनगर,जिजामाता कॉलनी, साई बाबा गार्डन,महाराणा प्रताप चौक,विठाई चौक,स्वामी समर्थ केंद्र परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर,जुने दत्त मंदिर परिसर, सप्तशृंगी नगर परिसर, शनि मंदिर परिसर,शिव शक्ति चौक,अभ्यासिका परिसर,धर्माजी कॉलनी, श्रमिकनगर भाग माळी कॉलनी, स्वामी समर्थ केंद्र परिसर, कालिका मंदिर, विट्ठल रुक्मिणी मंदिर, छत्रपति संभाजी नगर कॉलनी, अभ्यासिका
 परिसर, गणेश मंदिर, शनि चौक, तुळजा भवानी मंदिर परिसर, आय टी आय कॉलनी तसेच इतर परिसरात देखील आता पर्यंत २८०० किट गरीब व गरजू कुटुंबांना

दैनंदिन जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ,गव्हाचे पीठ,तेल,मीठ,साखर,हळद,मिरची,अंगाची साबण,मसूर दाळ,मसाला,बिस्कीट इ.चे वाटप करण्यात आले. तसेच २० टन कांदे आणी 10 टन बटाटे यांचेही वाटप करण्यात आले.हे सर्व किट घरोघरी जाऊन देण्यात आले व शाषणाने दिलेल्या सर्व नियम पाळून ही मदत करण्यात आली.
        यावेळी करण गायकर यांनी मानवता हाच सर्वात मोठा धर्मं आहे त्यापेक्षा कोणती जात धर्मं व्यक्ति मोठी नाही त्यामुळे समाजातील दानशुर व्यक्तिनी  सरळ हाताने पुढे येऊन गरजूवंतांना मदत करावी तसेच
      आपण घरात थांबुन आपले कुटुंब आपला परिसर,जिल्हा,राष्ट्र  कोरोनापासून सुरक्षित ठेवु शकतो . आपण सुरक्षित तर आपला परिवार व देश सुरक्षित राहील ही लढाई आपण घराच्या बाहेर नाही तर घरात थांबुनच जिंकू शकतो पोलिस व शासकीय यंत्रणेला आपण सहकार्य करावे असे आवाहन देखील करण गायकर यांनी केले आहे.

            यावेळी  छावा क्रांतिवीर सेनचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर,शिवसेनेचे प्रमोद जाधव, कैलास आण्णा गायकर, समाधान गायकर, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदें,गिरीश आहेर,अविनाश गायकर,युवासेना उप महानगर प्रमुख सचिन निकम,प्रितेश पाटील,किरण बोरसे,वैभव दळवी, अनिल वाघचौरे, रवी भांबिरंगे ,रोहित कांडेकर, रोहन सपकाळ, भाऊ कदम, छगन भले, यांनी अथक परिश्रम घेतले.



===========================°°°°=°°°°°========================================

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...