रविवार, ३ मे, २०२०

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी व येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची माहिती ऑनलाईन भरा. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

जालना,प्रतिनिधी:- लॉकाडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकलेल्या मजुर, परप्रांतीय, विद्यार्थी, नागरिकांना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी तसेच जालना जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्यांना व्यक्तींना परत आपल्या मुळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची
 आवश्यक ती माहिती भरण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना जालना जिल्ह्याच्या बाहेर आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-3O7dG3TauMolwo6Xen0lDt97Bk1fnVS1D9pWCPQvUEK-lw/viewform  या लिंकवर आवश्यक ती माहिती भरावी.  प्रशासनाला आपली माहिती प्राप्त होताच ती संबंधित राज्याच्या, जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येऊन त्यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच आपण https://covid19.mhpolice.in/ या लिंकवरुन आपली माहिती भरुन आपला प्रवासाचा पास डाऊनलोड करुन घेऊ शकता. 
  तसेच भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना जालना जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd0ooOZDnCbHnm-wxms3WXP1S50Ht6k909j40TnTXxbfeFRkw/viewform या लिंकवर आवश्यक ती माहिती भरावी. प्रशासनाला आपली माहिती प्राप्त होताच संबंधित राज्याच्या, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनामार्फत नाहरकत प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रवासासाठी आवश्यक असलेल्या पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर माहिती भरावी प्रशासनामार्फत आपल्या पासला मंजुरी देण्यात येईल त्यानंतर आपण आपला पास डाऊनलोड करु शकता. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून  जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02482-223132 येथे संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.



                  मालेगाव येथुन आलेल्या चार जवानांच्या 
                         स्वॅबचे अहवाल पाझिटीव्ह.



मुंबई येथुन परतुर येथे आलेल्या तरुणाचा अहवालही पॉझिटीव्ह

जालना,प्रतिनिधी:- मालेगाव जिल्हा नासिक येथे जालना येथील राज्य राखीव बलगट क्र. 3 चे जवान बंदोबस्तासाठी गेले होते.  यापैकी जालना येथे परत आलेल्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल दि. 1 मे, 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह आला आहे. तसेच परतुर येथील २४ वर्षीय तरुण मुंबई येथुन आला असुन या युवकाच्या स्वॅबचा अहवालही पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.कोरोनाचा पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या चार जवानांपैकी एक जवान जालना शहरातील चौधरीनगर परिसरातील रहिवाशी असल्यामुळे उप विभागीय अधिकारी, जालना यांनी चौधरीनगर, सनसिटी, पोद्दार शाळेच्या मागील व खरपुडी शिवारातील चौधरीनगरलगत असणारी घरे हा संपुर्ण भाग एक किलोमीटर परिसराती क्षत्र प्रतिबंधित म्हणुन घोषित केले असुन या क्षेत्राच्या सीमा व त्यामधील क्षेत्र तसेच चौधरीनगरमध्ये जाणाऱ्या सर्व बाजुच्या रस्त्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकुण 1035  व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 60 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 712 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 23 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 907 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -05 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 871, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 120, एकुण प्रलंबित नमुने-24 तर एकुण 652 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 31, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 405 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 18, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -278, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 60, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 37, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 190 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 278 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-28, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-19, पोलीस प्रशिक्षण केंद्र-112, मंठा येथे 13, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 1 मे, 2020 पर्यंत जालना तालुक्यामध्ये सांगली येथुन 15 व सातारा येथुन 04 असे एकुण 19 कामगार, बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-66,पुणे-36, कोल्हापुर-50 व सातारा-150 असे एकुण 302 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-28, पुणे-45,सांगली 176,कोल्हापुर-119, सातारा-354, सोलापुर-73,  लातुर-2 व अहमदनगर येथुन 07 असे एकुण 804 कामगार दाखल झाले आहेत.  जालना जिल्ह्यात परजिल्ह्यातुन आतापर्यंत 1 हजार 349 कामगार दाखल झाले आहेत.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 458 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 79 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 539 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण          2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत https://jalna.gov.in/tofromjalna/  लिंक तर पोलीस विभागाचा प्रवासासाठी परवाना मिळण्यासाठी http://covid19.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असुन या मध्ये माहिती भरावी. परराज्यात व परजिल्ह्यात जाण्यासाठी दोन्ही प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवाग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणार असल्याने कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करुन नयेत.  तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन नये. नोंदणी केल्याचे आढळल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

शनिवार, २ मे, २०२०

         मुस्तकीम हमदुले फाऊंडेशनतर्फे 500 गरजूवंतांना
                             रेशनचे किट वाटप.


  
जालना/प्रतिनिधी:-लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर  जालना शहरात आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या सुचनेनुसार मुस्तकीन हमदुले फाऊंडेशन च्या वतीने 500 गोरगरीब नागरिकांना रेशनची किट देण्यात आली. यामध्ये गहू, तांदुळ, तेल, साखर, मिरची पावडर, मसाल्याच्या पुड्या, साबन, मीठ यांचा समावेश होता.मुस्तकीन हमदुले फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेख शकील यांच्यातर्फे चाली ग्रुप व मुस्तकीन हमदुले  फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी ही मदत वाटप केली. यावेळी नगरसेवक शेख शकील यांच्यासह सदस्य शेख वसीम, नजीर अंन्सारी, शोएब खान, शैबाज खान, अमजद खान, फहाद काझी, अजमल अंन्सारी, मुबारक बेग, शाहरूख खान, आबदे, नेहाल, अरबाज सऊद, झुलफेखार बेग, सोहल आदिंसह अनेकांची उपस्थिती होती. जूना जालना, संजयनगर, मिल्लतनगर, बाजार गल्ली यासह शहरातील विविध भागात हातावर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, परप्रांतिय कामगार  व सर्व धर्मीयांना सदरच्या किट वाटप करण्यात आल्याची माहिती संयोजक नगरेसवक  शेख शकील यांनी सांगितले.
--


दिलासादायक ! कोरोनामुळे मृत महिलेच्या जवळच्या संपर्कातील दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह

नांदेड( भगवान कांबळे):- राज मोहल्ला परिसरातील एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा नांदेडात गुरूवारी रात्री मुत्यू झाला.मात्र या महिलेच्या सोबत नांदेड येथे असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे  वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी दिली आहे .त्यामुळे  सेलूकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील राज मोहल्ला परिसरातील एक महिला दुर्धर आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन लाॅकडाऊन मुळे औरंगाबाद येथील एका भागात राहत होती. २७ एप्रिल रोजी एका खाजगी वाहनाने ही महिला  घरी परतली होती. प्रकृती अतिशय नाजूक असल्याने सदरील महिलेला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या महिलेला नांदेडात हलविण्यात आले होते. तेथे त्या महिलेचा स्वॅब घेऊन चाचणी केली असता कोरोना पाॅझेटीव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर सेलू शहरात दोन दिवसाची संचारबंदी लागू केली आहे.
दरम्यान, या महिलेच्या  सोबत नांदेडात असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरूवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला असला तरी शुक्रवारी सकाळी या दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.  या महिलेच्या सेलू येथील कुटूंबातील १९ आणि सहवासात आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. नांदेडात महिला कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने प्रशासनाने बुधवारी रात्रीच राज मोहल्ला परिसर सील केला आहे. या परिसरातील एक हजार घरे कंनटमेंट झोन मध्ये घेतली आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या २० पथकाकडून सर्व्हेक्षण सुरू केली आहे. सदरील महिलेच्या कुटूंबात १९ आणि सहवास आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणी साठी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत. तसेच या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. आता या ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेऊन शनिवारी रात्री पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे.४ हजार नागरिकांचे सर्व्हक्षण
राज मोहल्ला आणि परिसरातील ६६८ घराचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून शुक्रवारी दुपारी पर्यंत ४ हजार ४९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक या भागातील घरोघरी जाऊन लक्षणा बाबत विचारणा करत आहे.


               लाँकडाऊन मुळे चहाविक्रेत्यांना फटका

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :-कोरोना संसर्गजन्य विषानुमुळे संचारबंदी तसेच लाँकडाऊन असल्याने तालुक्यातील चहाच्या टपर्या बंद आहेत त्यांच्यासमोर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट आहे एक चहा विक्रेता 1 ते 2 हजार रुपयांचा चहा विक्री करून त्याचा उदरनिर्वाह करतो. आता चहाची दुकान बंद असल्याने चहा विक्रेत्याला चांगलाच फटका बसला आहे.शहरासह तालुक्यात चहा पिणार्यांची  मोठी संख्या माञ 22मार्च रोजी जनता कफ्रर्यु आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे चहाच्या टपर्या बंद आहेत परिणामी चहा विक्री करून कुटूंब चालविणार्या या चहा विक्रेत्यासमोर कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्याची मोठी जबाबदरी पेलण्याचे संकट उभे टाकले आहेत.दरम्यान कोरोनाचे संकट टाळण्यासाठी लाँकडाऊन महत्वाचे आहे. चहाची दुकाने बंद असली तरी त्याचा फटका आमच्यासारख्या काही चहा विक्रेत्यांना बसला आहे. माञ ही वेळ निघुन जाईल आणि पुर्वी सारखे व्यवसाय आणि उद्योग सुरु होतील. माञ त्यासाठी आपन प्रत्येकाने घरात राहुन प्रशासनास सहकार्य करावे. असे चहा विक्रेते शाम गिराम यांनी सांगितले.

पासोडी येथे जिवन आवश्यक वस्तु व सनिटाझर वाटप
जाफ्राबाद/प्रतिनिधि : पासोडी,ता:जाफ्राबाद कोरोना संकट दिवसोदिवस वाढत चालले आहे त्यामुऴे निराधार ,अपंग,विधवा व गरजु लोकांना आपले कुंटुब चालवणे अवघड झाले आहे.

यांच पार्शभुमीवर वाॅटर कप विजेता गांव पासोडी मध्ये राजपुत भामटा सामाजिक प्रतीष्टान व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातुन गावातील गरजु लोकांना जिवन आवश्यक वस्तुची कीट उपलब्ध करुन देण्यात आली तसेच संपुर्ण गावातील नागरीकांना सनीटायझरच्या बाटल्या देण्यात आल्या .या कीटमध्ये १० कीलों गहु,२कीलो तादुळ,१कीलो गोडतेल,१००ग्रॅम मसाला,१०ग्रॅम हळद, १कीलो मीठ,१ माचीस बाॅक्स या प्रमाणात वस्तु उपलब्ध करुन दील्या यावेळी सुरेश दिवटे (भाजपा तालुका अध्यक्ष) चंदनसिंग ताटु (सरपंच),प्रेमसिंग धनावत ( तंठामुक्ती समिति, अध्यक्ष) पंडित सर, देवसिंग रेकनोत, तेजनकर साहेब, विजय ताटु,कीरण व्यास,बादल बारवाल, उपस्थित होते.व हे सर्व।  किराणा वस्तू देत असतांना  योग्य अंतर ठेवून  किट  देण्यात आले व कोरोना विषयी माहिती दिली. योग्य  नविन अनोळखी व्यक्ती किंवा बाहेर गावातुन  कोणीही येऊ नाही अशी माहिती या वेळी देण्यात आली.

वाढदिवस साजरा न करता गोरगरीबांना गहू, तांदुळ, तुरताळ वाटप
जालना/प्रतिनिधी:- लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जालना नगर पालिकेचे मा. बांधकाम सभापती श्रावण भुरेवाल यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता त्यावर होणार्‍या खर्चातून गोरगरीबांना 20 क्किंटल गहू, 
तांदुळ व तुरदाळ वाटप केली.जालना शहरातील मंठा चौफुली परिसर,अमरछाया टॉकीज परिसरात हातावर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, परप्रांतिय कामगारांना  गहू, तांदुळ व तुुरदाळ वाटप केली.अत्यंत शिस्तबध्द, पध्दतीने श्रावण भुरेवाल यांच्याकडून खिचडीचेही वाटप करीत असून, कार्यकर्त्यांनी जनतेसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. शासनाने घेतलेल्या वेळोवेळीच्या निर्णयाचे जनतेने पालन केले आहे. प्रशासनाला मदत केली आहे. घरात बसून राहिल्यामुळे अनेक कुटुंबांना मदतीची गरज होती. ही बाब लक्षात घेवून श्रावण भुरेवाल यांनी ही मदत केली आहे. यावेळी कपील भुरेवाल व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...