बुधवार, १८ मार्च, २०२०

मा.महेंद्र भाऊ बनकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध संघटनेकडून त्यांचे स्वागत.

सिंधीकाळेगाव( प्रतिनिधी ) :-आज दि.18/03/2020
रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  व्याख्यानमाला 2020 च्या अध्यक्ष पदी बहुजन चळवळीचे समाजसेवक महेंद्रभाऊ बनकर यांची निवड झाल्या बद्दल शुभेच्छा देतांना पांडुरंग हिवाळे,नारायण माहोरे बिरसा क्रांतीदल महासचिव जालना,मिलिंदराजे मघाडे,आनंद हिवाळे,तेजस हिवाळे,करण रत्नपारखे,संघदिप कुलतर्के,कैलास बनसोडे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
वाटूर येथून कापूस परतूर कडे घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी*
जालना प्रतिनिधी :-  वाटूर येथून कापुस परतूर कडे 
कापूस घेऊन जाणारा आयशर टेम्पो रस्त्याच्या बाजुला पलटी झाला अधिक माहिती अशी की वाटुर येथून कापूस भरून परतुर जाणारा आयशर टेम्पो क्रमांक MH:13.G.6471 हा आयशर टेम्पो भरधाव वेगात परतूर च्या दिशेने जात असताना रोहणा गावाजवळ ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. व तसेच सदररील गाडी चालक गंभीर जखमी
झाला आहे व गाडीचे नुसकान मोठ्या प्रमाणात झाले आहे.हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांनी चालकाला उपचारासाठी जालना रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. हा अपघात झाल्यामुळे गावातील अपघात स्थळे लोकांची मोठी गर्दी झाली होती.

गाडीवर दगडफेक व मारहाण करून आयशर चालकास लुटले
        अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना
अंबड ता.प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील शहापूर गावजवळ आयशर चालकाला आडून चालकास लुटून गाडिवर दगफेक
 करुन चलकास मारहाण करण्याची घटना रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. अधिक माहिती अशी,येरमाळा वरून जालना कडे जाणाऱ्या अइशरवर क्रमांक MH:28.BB0327 हा माल घेऊन जात असताना रात्री 2 पहाटे वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच जणांनी मिळुन दगड व विटा फेकून मारल्या यात गाडीतील ड्रायव्हर अख्तर शेख हे गंभीर जखमी झाले. गाडीच्या काचा फोडल्या ड्रायव्हर अख्तर शेख यांना मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन घेऊन चोरटे फरार झाले.ड्रायव्हर ला डोक्यात व दंडावर गंभीर इजा झाली असून त्यांना ड्रायव्हर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार व मंडळअधिकारी यांच्या पथकावर केली वाळू माफियांनी दगडफेक
जालना प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यामध्ये महसूल पथकांवर हल्ल्याच्या घटानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.साष्ट पिंपळगाव व आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रातील वाळू माफियांची गुंडगीरी दिवसेंदिवस वाढतच असून आज दि.17 मार्च रोजी दुपारी तहसीलदार राजिव शिंदे यांच्या पथकावर गेवराई तालुक्यातील वाळू माफियांनी तुफान दगडफेक केली. पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टरही या माफियांनी पसार केले असून याप्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तहसीलदार राजिव शिंदे, मंडळ अधिकारी दिवाकर, जोगलादेवीकर, मंडळ अधिकारी प्रवीण रुईकर, तलाठी अभिजित देशमुख, संतोष जयस्वाल, रमेश कोनळवार, किरण जाधव, रामकिसन महाले यांच्या पथकाने आज दुपारी एक वाजता साष्ट पिंपळगाव, आपेगाव येथील गोदावरी नदी पात्रातील वाळू पट्ट्याची पाहणी केली. दरम्यान हे पथक दुपारी साडेतीन वाजता गोंदी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहोचले. त्या ठिकाणी वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वाळू भरत असलेले तीन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई केली. पकडलेले ट्रॅक्टर सोडून द्या असे सांगत जीवे मारण्याची धमकी व अर्वाच्च भाषेत संबंधित वाळू माफियांनी शिवीगाळ केली. यावेळी जमलेल्या 15  ते 20 जणांच्या टोळक्याने पथकावर जोरदार दगडफेक केली. यात पथकाच्या चालकाला मार लागला. दगडफेकीचा फायदा घेत माफियांनी  वाळूने भरलेले तिने ट्रॅक्टर पसार केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्यातील पोलिस तात्काळ दाखल झाले. या प्रकरणी तलाठी अभिजीत देशमुख यांच्या तक्रारीवरून कृष्णा बेदरे रा. गेवराई, बाळू यादव व संतोष गवळी दोघे रा. बेलगाव ता. गेवराई, नारायण भुसारे व भैय्या जराड दोघे रा. खामगाव ता. गेवराई यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गोंदी पोलिसात शासकीय कामत अडथळा व गौण खनिज कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. *ह्या घटने मुळे महसूल पथकातील अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आसून,वाळू माफीयांना कायद्याचा धाक राहीलेला नाही हेच सिध्द होते.सदरील घटनेचा आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे हे करीत आहे.

मंगळवार, १७ मार्च, २०२०

जनतेच्या हितासाठी आ पवारानी कोरानोवर उपाययोजनासाठी घेतली तातडीची बैठक.

इम्रान सौदागर | गेवराई कोरोनापासून रूग्ण आणी नागरीकाचा बचाव करण्यासाठी आज उपजिल्हा रुगनाल्य गेवराई येथे आमदार श्री लक्ष्मण आण्णा पवार याच्यां उपस्थितीत बैठक सपंन्न झाली .

यावेळी या रोगाचा प्रसार कशापद्धतीने होत आहे ,.आणी त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करता येतील .तसेच मोठया संख्येने एकत्र येत असलेली नागरीकाना एकत्र येऊ नये तसेच ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते .सिनेमा हाँल ,बाजार ,असे सर्व उदयापासून बंद रहाणार आहे .तसेच सार्वजनिक ठिकाणी जास्त लोकानी एकत्रित येऊ नये यासाठीही आपल्याला कशी उपाय योजना करता येतील यावर सर्व  डाँक्टराशी चर्चा करण्यात आली .यावेळी डाँ शिन्दे साहेब. डाँ माने. डाँ सराफ. नगर अध्यक्ष सुशिलभाऊ जवंजाळ. लक्ष्मण सेना प्रमूख याहीया खान. पोलीस उपनिरीक्षक जोगदंड मँडम. पोलीस उपनिरीक्षक झिजुंर्डे साहेब. सरवर खान.ईम्रान सौदागर. पत्रकार अध्यक्ष मधुकर तौर मा सुभाष सुतार.  भागवत जाधव .  आणी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते .
येणारे 15 दिवस अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर निघा
परदेशातुन आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनाला द्या
कोरोनाचा जिल्हयात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही
                                   जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

            जालना,प्रतिनिधी:-  कोरोना विषाणू प्रसार 
रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन नागरिकांनीही या विषाणुचा प्रसार होऊ नये यादृष्टीने येणाऱ्या पंधरा दिवसात अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडापरदेशातुन आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकरनिवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाडउपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळीजिल्हा शल्य चिकित्सक डॉएम.केराठोडजिल्हा आरोग्य अधिकारी   डॉखतगावकरतहसिलदार श्री पडघनसंतोष बनकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणालेकोरोनाचे गांर्भीय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असुन गर्दी जमणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आलेली आहेजिल्ह्यातील सर्व शाळामहाविद्यालयेही बंद ठेवण्याच्या सुचना देण्याबरोबरच आठवडी बाजारधार्मिक स्थळेपर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.  बाजारामधील जीवनाश्यक वस्तु किराणा दुकानदुधऔषध विक्रेताभाजीपाला आदी दुकानांना परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात क्वारंटाईनचे तीन ठिकाण निश्चित करण्यात आले असुन सर्व उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांना तालुकास्तरावर शोध घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 217 उपकेंद्रावर डॉक्टर्स.एन.एमआशाअंगणवाडी सेविकातलाठी व ग्रामसेवक यांचा आराखडा तयार करण्यात येत असुन जनतेचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्याबाबतच्या माहितीचे मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन एस.टीमहामंडळातील बसेस व खासगी बसेसना स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच प्रवासामध्ये आजारी असलेल्या प्रवाशांची यादी तयार करुन ती प्रशासनाला सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  अन्न व औषधी विभागामार्फत दुकानांची तपासणी करुन औषधी उपलब्ध असल्याची खात्री करण्यात येत असुन जनतेला सॅनीटायजर व मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेतजिल्ह्यात दूरध्वनी,  इंटरनेट व विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
विविध कामांसाठी नागरिकांची शासकीय कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांची शासन दरबारी असलेली कामे करण्यासाठी कार्यालयात ड्रॉपबॉक्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तसेच ई-मेल अथवा व्हॉटसअपद्वारे नागरिकांनी त्यांच्या कामासंदर्भात संदर्भात संपर्क साधावासात दिवसांमध्ये त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनापासुन बचावासाठी प्रत्येकाने आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावेवैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.  सातत्याने गरम पाणी पिणेस्वच्छताजे व पौष्टिक अन्न खावेसातत्याने साबानाने हात धुवावेतसर्दी खोकलाताप असल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी.  तसेच जनतेने जागरुक रहावेकुठलीही माहिती लपवु नये व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले.
 जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दि. 12 मार्च रोजी एक रुग्ण दाखल झाला होता.  त्या रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने रुग्णाला साधारण कक्षामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहेदि. 16 मार्च रोजी एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेततसेच या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 34 जणांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्याची कार्यवाही सुरु आहे.  तसेच  दि. 17 मार्च रोजी प्रत्येकी एक रुग्ण दाखल असुन त्याचेही नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 4 जणांची तपासणी करुन अलगीकरण करण्यात येत आहेतसेच जालना शहरातील सात व्यक्ती थायलंड येथे 5 मार्च रोजी गेल्या होत्या.  त्या व्यक्ती दि. 11 मार्च, 2020 रोजी जालना शहरात परतल्या असुन त्यापैकी पाच व्यक्तींची तपासणी करुन त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असुन इतर दोन व्यक्ती इतर शहरात गेल्या असुन त्यांनाही सुचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
जालना शहरातील मदरसा अरबियाफैजुलउलुम,चंदनझिरा येथे "मदरसा परिचय"कार्यक्रम संपन्न.
जालना प्रतिनिधी :-या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.अब्दुल मजिद,प्रमुख पाहुणे जेआयएचचे सय्यद शाकेर, मा.नगरसेवक
सतीष दादा जाधव, ओम क्लिनिक हॉस्पीटचे डॉ.वसंत टकले, डॉ.भागवत काळे, डॉ.गजेंद्र मगर, शांतीलाल राऊत, जीवनराव केंढे,संपतराज जांगीड,राहुल मुंढे, सुभाष पारे, बाबुलाल मोरवाल, रमेश कवडे ई. मान्यवर उपस्थिती होते.सर्वप्रथम मदरशाचा परिचय देतांना मौलाना अब्दुल रऊफ म्हणाले, सर्वांसोबत न्याय करणे व अन्यायाविरूद्ध उभे राहणे ही शिकवण विद्यार्थ्यांस दिली जाते. देशाच्या रक्षणासाठी न्याय,सुरळीत अर्थव्यवस्था, शांती यांची आवश्यकता असते. समाज सुधारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचेसुधारणे आवश्यक असते. देशाच्या विकासासाठी देशातील काही भ्रष्टाचार लोकांनी भारत देशाला चुना लावून विदेशात पळून गेलेत. यामुळे भ्रष्टाचार थांबविण्याची गरज आहे. मदरश्यातील विद्यार्थी हे वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण मिळते. देश बांधवांना मदत करणे व इतरांशी चांगले वागणे, कोणावरही अत्याचार न करणे व कोणाला अत्याचार करू न देणे, जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांचे भाऊ आहेत. कारण जगातील पहिल्या जोडप्यापासूनच (आदम आणि हव्वा)सर्व मानव जातीची वेल वाढत आली आहे अशी महिती मौलाना अब्दुल रऊफ यांनी दिली.यापुढे चंदनझि-याचे मा. नगरसेवक सतिष जाधव (दादा) यांनी आपले मत मांडतांना सांगितले की, प्रत्येक धर्म ही शांततेची शिकवण देते. आपआपसातील संवादाच्या कमतरतेमुळे जो दुरावा निर्माण झाला आहे तो कमी करण्याची गरज आहे. संघटीत होऊन भारताच्या विकासासाठी हातभार लावण्याची गरज आहे.यावेळी डाॕ. भागवत काळे सर,राहूल मुंढे सर, शांतीलालजी राऊत ई. मान्यवराःनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नौशाद उस्मान साहेब यांनी समाजामध्ये सद्भावना जोपासणे हा फार मोठा उद्देश मदरश्याचा आहे. तसेच शांतता समितीत सहभाग घेणे हे इमामचे कार्य असते. खरा अध्यात्मिक मनुष्य हा धर्मसहिष्णु असतो.धर्म प्रचारक व्यक्ती धर्म सहिष्णु असतो. तो दंगली करू शकत नाही. मग तो कोणत्याही धर्माचा प्रचारक असो. पुढे ते म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी उलमा व्यक्तीनी कठोर परिश्रम घेतले व इंग्रजांकडून त्यांचे मृतदेह झाडांवर लटकविण्यात आले हे मदरश्यातील लोक होते.धर्माला दहशतवादाशी जोडणे अत्यंत चुकीचे आहे. पुढे भाषण करतांना नौशाद साहेब म्हणाले की, मदरशाला दहशतवाद व आंतकवादाशी जोडणे फार चुकीचे आहे.कार्यक्रमासाठी लोकहीत संघटनेचे सय्यद नासेर, बशीर खान,ई.पदाधिका-यांची ऊपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुफ्ती एहसान साहेब, मौलाना अब्दुल रऊफ साहेब, मौलानाअब्दुल अजीम (इत्तेहाद फांऊडेशन), सलीमभाई, शब्बीर पठाण, हाफीज आमेर, सुफियान खानआदींनी परिश्रम घेतले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...