मंगळवार, २४ मार्च, २०२०

        कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी उपलब्ध                    मनुष्यबळाची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत
                     जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचे आदेश
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना अधिकार
बुलडाणा, प्रतिनिधी: कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळाची सेवा अधिग्रहीत करता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील डॉक्टर्स, व्यक्ती/ समुह, संस्था / प्राधिकरणे आदीमधील उपलब्ध असलेली सेवा, साधनसामुग्री, अधिकारी / कर्मचारी, उपलब्ध मनुष्यबळ यांची सेवा कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. उपरोक्त नमूद सेवा अधिग्रहीत केलेल्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशीत केल्यास तातडीने उपस्थित व्हावे व अनुपालन करण्यात यावे. तसा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील विविध कलमान्वये शिक्षा प्रस्तावित करण्यात येवून भारतीय दंडसंहीता 1860 मधील कलम 188 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशान्वये कळविले आहे.      
उमरीकरांना दिलासा; हैदराबाद येथून परतलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला
नांदेड (भगवान कांबळे ) : हैदराबाद येथून आलेल्या वीस वर्षीय  तरूणाचा कोरोनाविषयीचा रिपोर्ट निगेटिव्ह
आलेला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. एन. आय. भोसीकर यांनी उमरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.  शंकर चव्हाण यांच्याशी फोनवरून ही माहिती दिली. पुणे येथून  या संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी  सांगितले . असे असले तरीही या तरुणास आणखी काही दिवस उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन  वॉर्डांमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे . त्यानंतर दोन आठवडे त्याला होम कोरोन्टाईल केले जाईल .  कारण सात ते पंधरा दिवसानंतर या साथीच्या रुग्णाचा आजार जाणवू  शकतो . त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  कोरोना  सारख्या महाभयंकर साथीने तब्बल दोन आठवड्यानंतर   अनेक देशांमध्ये थैमान घातल्याचे दिसून आले.  त्यामुळे आपल्याला पुढील काही दिवस  त्याबाबत अत्यंत सतर्क राहून काम  करावे लागेल.  त्यामुळे नागरिकांनी आरोग्य खात्याला सहकार्य करावे.  बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहू नये,त्यांच्यासाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करावी.  कुणीही घराच्या बाहेर पडू नये .  नेहमी हात स्वच्छ धुवावेत. बाहेरच्या लोकांशी संपर्कात येऊ नये. पुढचे दोन आठवडे सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यासाठी सर्वांनी गांभीर्याने घ्यावे.   असे आवाहन डॉक्टरांनी केले.
सिरसमार्ग तरटेवाडी व काळेवाडी वतीने गावातील सर्व सुजाण ग्रामस्थ यांना जाहीर आवाहन
शिरसमार्ग प्रतिनिधी :- कोरोना या महाभयावह
रोगाने जगाला विळखा घातला आहे तरी या संकटाच्या विरोधातील सर्व ग्रामस्थांनी मी स्वतःचा रक्षक स्वतःच या भावनेने  आपली व आपल्या आप्तस्वकीय व परिसरातील लोकांची काळजी घेऊ या.. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनौपचारिक सल्ले, संदेश देण्यापेक्षा प्रत्येकाने आपण या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका व कर्तव्य पार पाडूया...तसेच गावातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या  किराना दुकानदार, भाजीपाला विक्रेते, दूध संकलन व दुध पुरवठा करणारे दूध व्यावसायिक या सर्वांनी आपली एक जबाबदारी व सामाजिक जाणिव म्हणून कोणत्याही प्रकारचे नित्कृष्ठ दर्जाचे पदार्थ विक्री करू नयेत व कोणत्याही प्रकारची दरवाढ करू नये आणि विशेष करून तंबाखू व तत्सम पदार्थ विक्री करू नये कोणीही खाऊन कुठे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पचकण थुंकून घान करू नये  कोणतेही गैरकृत्या  करणार नाही संचार बंदी चे काटेकठोरपणे पालन होईल  याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. मागिल पंधरा दिवसांत गावात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती यांनी स्वतः घरात इतरांच्या पासून वेगळे राहावे सर्दी खोकला ताप घशात खवखवणे स्वसनास  त्रास  इ.लक्षणे आढळल्यास सिरसमार्ग येथील शासकिय दवाखान्यात डॉक्टरांना दाखवून घ्या. विनाकारण घाबरू नका.अफवा पसरवू नका.
 आपण सर्वांनी प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांना सहकार्यकरा आणि आपण आपल्या  गावात एकही कोरोनाचा रुग्ण होणार नाही अशी शपथ घेऊया.  ग्रामपंचायतीसह प्रशासनाला   सहकार्य करावे..
एक लढा मानव जातीच्या अस्तित्वासाठी ...एक लढा कोरोना नावाच महासंकट गाडण्यासाठी...
     असे आव्हान बाबासाहेब कुडके ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत कार्यालय शिरसमार्ग अशोक डरफे तलाठी सजा सिरसमार्ग यांनी केले आहे.


कोरोनोचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमु नये परदेश अथवा ईतर जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती द्यावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना, प्रतिनिधी :- कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासन सर्वतोपरी
जालना जिल्‍यामध्‍ये एकूण ५० रुग्‍ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्‍यापैकी ४७ रुग्‍णांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २६ रुग्‍णांचे अहवाल प्राप्‍त झाले असून ते निगेटिव्‍ह आले आहेत. त्‍या २६ रुग्‍णांना डिर्स्‍चार्ज देण्‍यात आला आहे. आजरोजी २४ रुग्‍ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्‍यांची प्रकृती स्थिर आहे. दिनांक २४ मार्च, २०२० रोजी ३ रुग्‍ण नव्‍याने दाखल झाले आहेत.
 प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असुन या विषाणुचे संक्रमण होऊ नये यासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमु नये. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा आपल्या घरीच रहावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.जिल्‍हयातील किराणा मालाच्‍या दुकाना पुर्णवेळ सुरु राहणार असुन त्‍यासाठी नागरीकांनी गर्दी करण्‍याची काहीही आवश्‍यकता नाही.  जिल्‍हयामध्‍ये दिनांक 23 मार्च, 2020 पासुन फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आलेले असुन कोणत्‍याही परिस्थितीत पाचपेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमु नये, अथवा कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्ली थांबु नये. नागरिकांनी  शक्‍यतो आपल्या घरीच थांबावे. अत्‍यंत आवश्‍यक असेल त्यावेळीच घराबाहेर पडावे व प्रशासनाच्‍या आदेशाची अंमलबजावणी करावी. प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.   कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी  जिल्‍हा प्रशासनाने एकूण १२ कोटी ६० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे.  नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्‍य विभाग आपल्‍या सोबत आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्‍या शंका अथवा काही विचारणा करावयाची असल्‍यास त्यांनी जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय, जालना येथे ०२४८२-२२३१३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.   जालना जिल्‍हयातील नगर परिषदेच्‍या वतीने करोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर टॅक्‍टरद्वारे फवारणी करण्यात येत असुन शहरामध्‍ये स्‍वच्‍छता व धुरीकरणसुध्‍दा करण्‍यात येत आहे.  मागील एक महिन्यात  आपण जर कोरोनाग्रस्त देशातून आलेले असाल अथवा इतर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आला असला तर http://ezee.app/covid19jalna या लिंकवरु जाऊन संपूर्णपणे खरी माहिती फॉर्ममध्ये भरावी. जेणेकरून प्रशासनामार्फत जनतेला योग्य ती मदत करता येईल.
विभागीय आयुक्तांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा
आज दिनांक २४ मार्च, २०२० रोजी दुपारी २ वाजता विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य  कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधुन करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजनाच्‍या अनुषंगाने करण्‍यात येणा-या कार्यवाही बाबत आढावा घेतला यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्‍हयात कलम १४४ व संचारबंदीच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शक सुचना केल्या

सोमवार, २३ मार्च, २०२०

राज्यात १५ नवीन कोरोणा बाधित रुग्ण, राज्यातील एकूण संख्या ८९ - आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात नवीन १५ करोना
 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ११ जण मुंबईतील तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत.  त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८९ झाली आहे. मुंबई आणि परिसरात आढळलेल्या १४ नवीन रुग्णांपैकी ९ जण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित रुग्णांचे निकटसहवासित आहेत. इतर ५ जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दिनांक १३ मार्च २०२० रोजी कस्तुरबा रुग्णालयात भरती झालेल्या ५९ वर्षीय फिलीपाइन नागरिकाचा काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णाचे नंतरचे दोन नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले होते म्हणजे त्याचा कोरोनो हा आजार बरा झाला होता तथापि त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा  या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झालेला  नाही.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:
पिंपरी चिंचवड मनपा १२     
 पुणे मनपा १६     
  मुंबई  ३५   
 नवी मुंबई   ५     
नागपूर, यवतमाळ,
कल्याण प्रत्येकी  ४   
अहमदनगर, ठाणे               
 प्रत्येकी २   
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार     प्रत्येकी  १    एकूण रुग्ण  ८९        मृत्यू २
राज्यात आज परदेशातून आलेले २५५ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत.    ज्यांना दि. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली अशा २१४४ जणांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १८८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आरोग्य खात्यामार्फत आवाहनकाल राज्यभर पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्युनंतर पुणे - मुंबई मधील बरेच लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे, या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी, किंवा त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का मारण्यात यावा, अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसते आहे. पुणे आणि मुंबईमध्ये काही करोना बाधित रुग्ण आढळलेले असले तरी या भागातून येणा-या लोकांबद्दल विनाकारण भिती बाळगण्याचे कारण नाही.अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.नुकतेच परदेशाहून आलेले काही नागरिक होम क्वारंटाईन न पाळता घराबाहेर पडताना दिसत असल्याबाबतच्या तक्रारी राज्य हेल्पलाईनला प्राप्त होत आहेत. स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्राचे विभागवार वाटप करुन प्रत्येक क्षेत्रासाठी जबाबदार अधिका-याला होम क्वारंटाईन व्यक्तींची यादी देऊन प्रत्येकजण नियमाप्रमाणे विलगीकरण सूचनांचे पालन करत आहे,याची खातरजमा करावी. यासाठी निवासी सोसायटीच्या समित्यांचीही मदत घेण्यात यावी.
राज्य नियंत्रण कक्ष  ०२०/२६१२७३९४  टोल फ्री  क्रमांक १०४
             जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली
हिवरा कबली येथे भरतो दारूचा बाजर गावातील नागरिकाकडुन होत आहे कारवाई ची मागणी.
जाफराबाद / प्रतिनिधी (दिनेश जाधव) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी आणि विदेशी  मद्य विक्री
दिनांक 20 मार्च 2020 रोजी रात्री 10.00 वाजेपासुन ते दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना यांनी आदेश दिले असताना देखील जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे सर्रास पणे दारु विक्री चालु आहे .तरी याकडे तरी याकडे कोणत्याही पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नाही.तर दुसरीकडे कोरोना विषयी माहीती दिली जात आहे.घराबाहेर कोणी कामा कामी निघावे अन्यथा कारवाई करण्यात येईल.अशी माहीती दिली जात आहे.
     पण मात्र दुसरीकडे लक्ष दिले तर हिवरा काबली येथे नळविहीरा
सावरगाव  खामखेडा आळंद  बोरखेडी या गावामधून दारु पिण्यासाठी लोक गर्दी करत आहे. यावरुन सिद्ध होते कि कोरोना यावरुन जास्त प्रमाणात पसरु शकतो. याकडे पोलीस प्रशासनाने तात्काळ स्वरुपात लक्ष दिले पाहीजे. व कारवाई केली पाहीजे अशी आसपास च्या महिलांचे म्हणणे आहे. या गावामध्ये देशी विदेशी गावरान सर्व प्रकारच्या दारु मिळतात.तर लायसन्स धारकांचे  शासनाने बंद केले आहे आणि या गावामध्ये सगळ्या प्रकारचे दारु मिळतात .
   याकडे तात्काळ स्वरुपात पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी गावातील समान्य नागरिक व महिलांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नका - जनकल्याण रक्तपेढी
जालना : सध्या कोरोना विषाणूची साथ सुरु आहे .दरवर्षी एप्रिल व मे मध्ये शाळा य महाविद्यालयात सुट्या 
असल्यामुळे तसेच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत असतो . जालना शहरामध्ये साधारणपणे 40 ते 50 रक्तपिशव्या जनकल्याण रक्तपेढीमधून रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो . रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी , अपघातग्रस्तांसाठी व थैलेसिमीया , हिमोफिलीया या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते . सदर बाब लक्षात घेता . रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतचे लक्षणे व प्रवासाचा पूर्व इतिहास तपासून व सुरक्षा स्वच्छतेचे पालन करुन रक्तदान शिबीराची व्यवस्था जनकल्याण रक्तपेढीने केली आहे . रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भिती अथवा संभ्रम निर्माण झालेला असून प्रतिबंधक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये व गर्दी करु नये हे जरी खरे असले तरी रक्तदान हे गरजु रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे . कारण सध्या स्थितीत रक्तास कुठलाही पर्याय नाही , रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संकमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही जालना शहरातील सर्व सामाजिक संघटना , संस्था , रक्तदाते यांनी रक्तपेढीच्या गरजेनुसार रक्तदान शिबीर आयोजित कराये व गरजु रुग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास सहकार्य करावे . तसेच इच्छुक रक्तदाते यांनी सकाळी 10 ते 5 या वेळेत 2 किंवा 3 या संख्येने रक्तदात्यांनी जनकल्याण रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे , तसेच शिविर संदर्भात रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव - 8380049340 , 9421322252 या नंबरवर संपर्क करावा . तसेच 31 मार्चपर्यंत रक्तपेढीच्या वतीने शहरातील सर्व हॉस्पिटलांमध्ये कुरीयर सेयेच्या माध्यमातुन रक्तपिशवी पोहोच करणार असून यासाठी रक्तपेढीमध्ये या नंबरवर 02482 - 238397 , 243085 , 7722027470 संपर्क करावा , असे आवाहन रक्तपेढीचे अध्यक्ष रमेशभाई पटेल यानी केले .

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...