रविवार, १९ एप्रिल, २०२०


*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी*
*कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता**-- गृहमंत्री अनिल देशमुख*
*जालना, ब्युरो चीफ*  –  जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये.
यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना गृहमंत्री श्री देशमुख बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.गृहमंत्री श्री देशमुख म्हणाले,  देशासह राज्यावर कोरोना विषाणुची आपत्ती कोसळली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुमुळे केवळ एक महिला बाधित आहे.  परंतू जिल्ह्यात या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासनाने योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.गरजूंना स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातुन वेळेत पुरेसे धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबरोबरच ज्यांच्या रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींनासुद्धा धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या पराज्यातील मजुर तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगली व्यवस्था केल्याने गृहमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी मंत्री महोदयांना दिली.


औरंगाबादचे डीएचओ डॉ. गीते यांच्या कारमध्ये विदेशी दारूसह                           06 लाख रुपये सापडले !
जिल्हा बंदीचे केले उल्लंघन ; बदनापूर जवळ चेक पोस्टवर पोलिसांनी पकडले
जालना,प्रतिनिधी :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेली जिल्हाबंदी मोडीत काढत चक्क कारमध्ये विदेशी दारू आणि सात लाख रुपयांची रोख  रक्कम घेऊन 
जालन्याकडे निघालेल्या औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना  बदनापूर तालुक्यातील वरुडी चेकपोस्टवर पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर l जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने तेथील कोणत्याही वाहनांना जालना जिल्ह्यात विनापरवानगी येता येत नाही. शनिवारी  ( दि.१८) औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे त्यांच्या ( एम.एच.२० सी. यू. ०३५३ )  महागड्या इर्टीका कारमध्ये विदेशी दारू आणि ६ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम सोबत घेऊन  जालन्याकडे त्यांच्या मूळगावी बुलढाणा जिल्ह्यात लोणारकडे निघाले होते. त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन लिहिलेले होते.जालना जिल्ह्याच्या सीमेवर बदनापूर तालुक्यातील वरुडीनाक्यावर त्यांची गाडी पोलिसांनी अडवून तिची तपासणी केली.यावेळी गाडीत रोख 6 लाख 70 हजार रुपये, 6 हजार रुपये किंमतीची दारू आढळून आली.रोख रक्कम, दारू व 6 लाख रुपये किंमतीची कार, असा एकूण 12 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी डॉ. अमोल गीते यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे 51 (ब), महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या 65 (अ) (ई) आणि भादंवि. 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र व शिवसेना-युवासेना पक्षाच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर अन्न धान्याचे २८०० किट व ९००० कुटुंबना कांदा व बटाटेचे किट वाटप करुण मानुसकीचे नाते जपले.
प्रतिनिधी |नाशिक आजचा चौदावा दिवस दि १८/४/२०२० प्रभाग क्र 9 शिवाजीनगर,जिजामाता कॉलनी, साई बाबा गार्डन,महाराणा प्रताप चौक,विठाई चौक,स्वामी समर्थ केंद्र परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर,जुने दत्त मंदिर परिसर, सप्तशृंगी नगर परिसर, शनि मंदिर परिसर,शिव शक्ति चौक,अभ्यासिका परिसर,धर्माजी कॉलनी, श्रमिकनगर भाग माळी कॉलनी, स्वामी समर्थ केंद्र परिसर, कालिका मंदिर, विट्ठल रुक्मिणी मंदिर, छत्रपति संभाजी नगर कॉलनी, अभ्यासिका
 परिसर, गणेश मंदिर, शनि चौक, तुळजा भवानी मंदिर परिसर, आय टी आय कॉलनी तसेच इतर परिसरात देखील आता पर्यंत २८०० किट गरीब व गरजू कुटुंबांना

दैनंदिन जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ,गव्हाचे पीठ,तेल,मीठ,साखर,हळद,मिरची,अंगाची साबण,मसूर दाळ,मसाला,बिस्कीट इ.चे वाटप करण्यात आले. तसेच २० टन कांदे आणी 10 टन बटाटे यांचेही वाटप करण्यात आले.हे सर्व किट घरोघरी जाऊन देण्यात आले व शाषणाने दिलेल्या सर्व नियम पाळून ही मदत करण्यात आली.
        यावेळी करण गायकर यांनी मानवता हाच सर्वात मोठा धर्मं आहे त्यापेक्षा कोणती जात धर्मं व्यक्ति मोठी नाही त्यामुळे समाजातील दानशुर व्यक्तिनी  सरळ हाताने पुढे येऊन गरजूवंतांना मदत करावी तसेच
      आपण घरात थांबुन आपले कुटुंब आपला परिसर,जिल्हा,राष्ट्र  कोरोनापासून सुरक्षित ठेवु शकतो . आपण सुरक्षित तर आपला परिवार व देश सुरक्षित राहील ही लढाई आपण घराच्या बाहेर नाही तर घरात थांबुनच जिंकू शकतो पोलिस व शासकीय यंत्रणेला आपण सहकार्य करावे असे आवाहन देखील करण गायकर यांनी केले आहे.

            यावेळी  छावा क्रांतिवीर सेनचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर,शिवसेनेचे प्रमोद जाधव, कैलास आण्णा गायकर, समाधान गायकर, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदें,गिरीश आहेर,अविनाश गायकर,युवासेना उप महानगर प्रमुख सचिन निकम,प्रितेश पाटील,किरण बोरसे,वैभव दळवी, अनिल वाघचौरे, रवी भांबिरंगे ,रोहित कांडेकर, रोहन सपकाळ, भाऊ कदम, छगन भले, यांनी अथक परिश्रम घेतले.



===========================°°°°=°°°°°========================================

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

💥प्रशासनाच्या ‘पॉझीटीव्हीटी’ पुढे.. कोरोना झाला ‘निगेटीव्ह’..!
💠जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेस यांनी                            टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद💠

    🔹रूग्णवाहिकेतून प्रशासनाने तीन रूग्णांना सोडले घरी🔹 

बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या कोरोनाबाधीत रूग्णाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. 
त्यानंतर प्रशासनाने पॉझीटीव्ह रूग्णाच्या हायरीस्क व लो रिस्क संपर्कातील सर्वांना ताब्यात घेत त्यांचे विलगीकरण केले. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. सदर मृत रूग्णाच्या निकट संपर्कातील आणखी चार रूग्ण पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हाभर सुन्न वातावरण निर्माण झाले. त्यानंतर प्रशासनाने क्लस्टर कन्टेन्टमेंट प्लॅन लागू करीत कडक उपाययोजना केल्या. प्रशासनाने केलेल्या सर्व ‘पॉझीटीव्ह’ प्रयत्नांमुळे अखेर कोरोनाला ‘निगेटीव्ह’ करीत पहिल्या तीन रूग्णांना रूग्णालयातून आज 17 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजेदरम्यान डिस्चार्ज देण्यात आला.
 प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीनही रूग्णांचे दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने 19 दिवसानंतर या रुग्णांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारात बरे झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरुनही आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे या सर्वानी टाळ्या वाजवून संबंधित कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाल्याचा आनंद व्यक्त केला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी डिस्चार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना घरी सोडण्यात आले.
बुलडाणा येथे 28 मार्च रोजी  एका संशयीत व्यक्तीचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोनाबाधीत आला होता. त्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये चार संशयीतांचे रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आले. तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा, तर दुसरा तपासणी रिपोर्टही निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. घरी जातांना या रूग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यांनी मनोमन वॉर्डातील नर्सेस, ब्रदर, आरोग्य कर्मचारी यांचे मनोमन धन्यवाद मानले.                                               

           गुंडेवाडी येथील महिलेचा पती व निकटसहवासित 
                       विलगीकरण कक्षात दाखल.
      संबंधितांच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी
जालना, प्रतिनिधी :- जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील भुमी कॉटेक्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांपैकी एक 30 वर्षीय  महिला ही गुजरात राज्यात गेली व सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जालना येथील दु:खीनगर भागाती कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर आहे.  तसेच एक ५५ वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह तर 62 वर्षीय महिला गंभीर फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असुन दोघींचीही प्रकृती गंभीर आहे.  या दोनही महिलांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 698 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 122 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 405 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 32 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 486 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 438, रिजेक्टेड नमुने-03, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 78, एकुण प्रलंबित नमुने-42 तर एकुण 283 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 27, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 142 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 31, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-98, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 03, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 122, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यादृष्टीकोनातुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 251 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 15 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.दि 17 एप्रिल, 2020 रोजी 30 वर्षीय तरुणास खासगी रुग्णालयातुन जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. खबरदारी म्हणून तरुणाच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.तपासणीअंती कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती गुजरात पोलीसांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानुसार महसुल, आरोग्य, पोलीस व पंचायत विभागाच्या पथकाने गुंडेवाडी येथील भुमी कॉटेक्स येथे जाऊन महिलेच्या 37 वर्षीय पती व त्यांच्या 15 निकट सहवासितांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तालुका आरोग्य अधिकारी, जालना व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव यांना कन्टेटमेंट प्लॅनच्या अनुषंगाने सुचना केल्या. तसेच महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, दोन पर्यवेक्षक व 12 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले सहा पथके तयार करण्यात येऊन तेथे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.मुंबई येथुन आलेल्या राज्य राखीव दलाच्या 97 जवानांची वैद्यकीय तपासणी करुन 87 जवानांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे अलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले असुन उर्वरित 10 जवानांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेच्या वतीने दहा हजार घरापर्यंत भाजीपाला देण्याच्या                                       मोहिमेचा शुभारंभ.
कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधित जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केलेले सर्व कार्य लोकोपयोगी : माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
जालना,प्रतिनिधी:- शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दहा हजार घरापर्यंत मोफत भाजीपाला वितरित करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाचा
शुभारंभ आज (दि.18) शनिवार रोजी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले,  युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, शहर संघटक दीपक रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वरील उद्गार काढले.पुढे बोलतांना ते म्हणाले की, सध्या लॉक डाऊन असल्यामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आहेत.यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कारोना संसर्गाच्या राज्यातील गंभीर स्थितीमुळे वाढलेलं गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सुरुवातीपासूनच मुकाबला कोरोनाचा ही मोहीम हाती घेऊन त्या अंतर्गत हॅण्डबील वाटप करणे,शहरातील प्रमुख चौकात होर्डीग लावणे, ऑटो रिक्षामधून आवाहन करून जनजागृती करणे व नंतर प्रत्यक्ष मदतकार्य करण्यास सुरुवात केली असून मास्क वाटप, अन्नदान वाटप, अन्नधान्य वाटप व आता घरपोच भाजीपाला वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि हे सर्व कार्य अखंडपणे सुरू आहेत.  एवढे सगळे उपक्रम राबविणारा जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासारखा कार्यकर्ता अभावानेच असेल असे गौरवोद्गार यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जनतेने आम्हाला खूप दिले त्याची परतफेड करण्याची ही वेळ असून अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. अशा या लॉक डाऊन कालावधीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी घरात बसण्यापेक्षा लोकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक हेही आपल्या भागांमध्ये मदत करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांनी सेवाभावी संस्था त्याचप्रमाणे पदाधिकारी यांना कळकळीचे आवाहन करून अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेने हे कार्य अखंडपणे सुरू ठेवलेले आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सांगितले. यावेळी उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, युवासेनेचे शहरप्रमुख दुर्गेश काठोटीवाले, उपशहरप्रमुख किशोर नरवडे, संतोष जमदडे,  गणेश लाहोटी, गणेश तरासे, मदन खरात, राजू इंगळे, सुभाष पितांबरे, रामेश्वर कुरील, यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

*💥व्यापारी प्रतिष्ठाने बंद तर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सुविधा असणार सुरू - मुख्याधिकारी वायकोस💥*

चिखली,प्रतिनिधी:- संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.त्या पार्श्वभूमीवर चिखली नगरपालिकाद्वारा दिनांक १४ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन चा कालावधी वाढवल्याने व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुमन चंद्रा यांच्या आदेशांव्यये शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पुढील आदेशापावतो बंद राहतील असे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी कळविले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आले असून त्यानुसार शहरातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे व्यापारी यांनी आपल्या ग्राहकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांना घरपोच सेवा देण्याचे सांगितलेले आहे.म्हणजे किराणा दुकान,भुसार माल ,दूध,भाजीपाला विक्री सुरू राहणार असून या दुकानदारांनी घरपोच सेवा देणे अनिवार्य करण्यात आले. त्यासाठी ग्राहकांनी आपल्या नेहमीच्या व्यावसायिकाकडे फोन अथवा व्हाट्सएपच्या माध्यमातून आपल्या मालाची नोंदणी करावी, संबधित दुकानदार यांनी तो माल ग्राहकांना घरपोच द्यावा मात्र त्यासाठी दुकानदाराने आपली प्रतिष्ठाने उघडी ठेऊन माल विक्री करू नये अथवा दुकानात गर्दी जमवू नये. तसेच नेमून दिलेल्या भाजी विक्रेत्यांनी सुद्धा आपल्या ग्राहकांना घरपोच सुविधा देने अनिवार्य आहे. कोणत्याही ही परिस्थितीत दुकान उघडून भाजी विक्री करू नये. शासनाने लावून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले असून नियमांचे उल्लंनघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही स्पष्ट केले. तसेच लवकरच न.प. प्रशासन द्वारे प्रत्येक प्रभागासाठी समनव्यक म्हणून न.प. कर्मचाऱ्याची नेमणूक सुद्धा करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी न.प. च्या मदत केंद्राशी संपर्क साधण्याचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी सांगितले आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...