शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

    प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनीने केलेली भरमसाठ दरवाढ                संदर्भात ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्राच्या वतीने
                   जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन
नाशिक (प्रतिनिधी) :- प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनी केलेली 25 ते 30% भरमसाठ दरवाढ म्हणजे ग्राहकाचे खूप मोठे नुस्कान होत आहे.मोबाईल कंपनी जिओ आयडिया एअरटेल कंपनी वाढलेल्या रिचार्ज जवळपास 30 टक्के वाढ केली आहे या सर्व वाढीचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. 
 या दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक सुरुवात मोठी मोबाईल कंपनीकडून लूटमार होत आहेत,तरी ग्राहकांची होणारी लूटमार थांबण्यासाठी प्रयत्न करावे.मल्टिप्लेक्स थिएटर याठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असते या थेटरमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू पिण्याची मिनरल वॉटर मनमानी दार लावून ग्राहकांची फसवणूक करत आहे थेटरच्या बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी मिळणेबाबत व तिथे मिळणारे खाद्यपदार्थ दर कमी करण्याबाबत. या मागण्यासंदर्भात श्री दादाभाऊ केदारे राज्य उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर नाशिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर श्री. दादाभाऊ केदारे (वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य),मा.सौ.स्मिता मुठे(अध्यक्ष विभागीय), मा.प्रसादभाऊ बोडके (अध्यक्ष नाशिक शहर),मा.मोहिनी भगरे (अध्यक्षा नाशिक शहर),मा.कुंदनभाऊ खरे (जिल्हा उपाध्यक्ष) ,मा.श्रीकांत कार्ले(धुळे जिल्हा),मा.मंगला खोटरे (उपाध्यक्ष नाशिक शहर ) मा.वैशाली दराडे (महासचिव)नाशिक शहर आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...