गरजूंना फळ फ्रूट आणि भाजीपाला वाटप
जालना (प्रतिनिधी):-जालना येथे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करत आहे . परंतु
यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने त्यांचा माल विकत घेऊन तो गरीब लोकांना वाटप करण्यात येत आहे. भोकरदन नाका येथील दगडी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना मराठवाडा पाणी परिषद आणि जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, क्रांतिसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे फळ फ्रूट आणि भाजीपाला वाटण्यात आले असून हा उपक्रम मराठवाडा पाणी परिषदे तर्फे संपूर्ण मराठवाड्यात हा उपक्रम घेण्यात आला असूनयावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष एम. डी. सरोदे,संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ संस्थेचे अध्यक्ष गणेश गव्हाणे,सचिव ज्योती आडेकर मॅडम व सहसचिव विद्या जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा