रविवार, २६ एप्रिल, २०२०


जालना जिल्ह्यातील सर्व धंदे टप्प्याटप्प्याने सुरू करावे - प्रकाश सोळंके

प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदना मार्फत मागणी.

जालना,प्रतिनिधी :- महाराष्ट्रात येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन महाराष्ट्रातील ग्रीन झोन,ऑरेंज झोन,मध्यद्योगधंदे टप्प्याटप्प्यानं चालू करा अशी मुख्यमंत्री कार्यालयास सूचना, मनसे अध्यक्ष मा श्री राज साहेब ठाकरे यांनी 
केलेली आहे.व तसेच जालना जिल्ह्यात जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मध्ये मोठ्या प्रमाणात, स्टील उद्योग कारखाने आहेत, तसेच जालना जिल्ह्यातील,वाईन शॉप बिर शॉप, खानावळ व सर्वच धंदे टप्प्याटप्प्याने चालू करा अशी मागणी मनसे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके माननीय मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जालना जिल्ह्यातील जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मध्ये स्टील उद्योग मोठ्याप्रमाणात कारखाने आहेत,व जालना जिल्ह्यातील वाईन शॉप बिर शॉप व इतर सर्वच धंदे टप्प्याटप्प्याने चालवण्यासाठी परवानगी द्यावी, कारण जालना जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे जिल्ह्यात,दोन कोरोना बाधित पेशंट आहेत, एक महिला पेशंट दुखी नगर जालना,तर दुसरा महिला पेशंट शिरोडा ता, परतुर येथील आहे, थोडे चिंतेची गोष्ट आहे शिरोडा ता परतुर येथील महिला पेशंटची प्रवास पार्श्वभूमी ( हिस्ट्री ) लोकांना स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे थोडी चिंता आहे, कारण शिरोडा ता परतुर येथील या महिला पेशंटला कोरोना लागन कशी झाली, कोठे झाले, हि अध्याप अधिकृत माहिती जाहीर न झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता आहे, शिरोडा ता परतुर येथील या महिला पेशंट सोबत संपर्कात आलेल्या बऱ्याच लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे काळजी करण्याची गरज वाटत नाही, परंतु ट्रॅव्हल हिस्ट्री नाही मग लागन कशी झाली हे समोर आल्यास जनता चिंतामुक्त होईल, हिच गोष्टी सोडली तर जालना जिल्ह्यात आठ हि  तालुक्यात अनेक उद्योगधंदे, वाईन शॉप,बिर शॉप, खानावळ हळू हळू टप्प्याटप्प्याने सगळेच छोटे मोठे धंदे चालू करण्यास हरकत नाही, कारण येणारे आर्थिक संकट बघता काही गोष्टी कोरणा सारख्या साथीच्या रोगाचे नियम बंधन सोशल डिस्टन्स पाळून व्यवहार चालू करण्यास हरकत नाहीत, तसेच येणारे आर्थिक संकट कोणालाही परवडणार नाही, म्हणून सर्वच उद्योगधंदे हळू हळू टप्प्याटप्प्याने जालना जिल्ह्यात चालू केल्यास आर्थिक संकटाला तोंड देण्याचे संकट निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन पुढील व्यवहार चालू करावे जालना शहरात स्टील उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याठिकाणी सर्व नियमाचे पालन करेल सोशल डिस्टन्स या कारखाने चालू करण्यास हरकत नाही याठिकाणी स्टील उद्योगातील स्टील असोशियन यांच्यासोबत चर्चा करून हा उद्योग चालू करण्यास हरकत नाही कारण या उद्योग चालू करण्यासाठी कामगार सुद्धा जालना शहरात थांबून आहेत.मनसे अध्यक्ष मा श्री राज साहेब ठाकरे यांनी येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन सर्वच उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने,वाईन शॉप,बियर शॉप, खानावळ चालू करण्यास आपणास मुख्यमंत्री कार्यालयास पत्र देऊन सूचना केलेली आहे, आपण लवकरात लवकर हे सर्व उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने चालू करण्यासाठी परवानगी द्यावी हीच जनतेची अपेक्षा आहे.तरी- मुख्यमंत्री साहेबांनी येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन, जालना जिल्ह्या ऑरेंज झोन मध्ये, असल्यामुळे, जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) स्टील उद्योग, मोठ्याप्रमाणात कारखाने आहेत, व वाईन शॉप,बिअर शॉप,खानावळ, सोशल डिस्टन ठेवून व नेमाचे पालन, करून हे सर्व उद्योग चालू केल्यास मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला महसूल उपलब्ध होईल, येणारे आर्थिक संकट टळले,म्हणून उद्योगधंदे करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी प्रकाश
सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी निवेदनात केेली आहे.
                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...