सोमवार, २२ जून, २०२०

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी महाबीज अधिकाऱ्यांना व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ निलंबित करण्या यावे - प्रकाश सोळंके


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची महाबीज कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महाबीज कंपनीचे अधिकारी श्री देशमुख, व श्री सावंत, जिल्हा कृषी अधिकारी जालना यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, कारण सध्या खरिपाची पेरणी चालू असतांनी या महाबीज अधिकाऱ्यांनी व संबंधित कृषी विभागाच्या अधिकार्याने संगणमत करून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, महाबीज कंपनीचे बि बियाणे विक्री होऊ नये म्हणून कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यानेच कंपनीसोबत गद्दारी केली आहे, कारण खाजगी कंपनीचे बी बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्याचा विक्रीचा खप वाढवा म्हणून महाबीज कंपनीच्या  अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५०% शेतकऱ्यांचे महाबीज कंपनीचे बियाणी सोयाबीन पेरणी केल्यानंतर उगवलेच नाही, कारण महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने संगणमत करून महाबीज कंपनीची कशी बदनामी करता येईल याचे नियोजन करून कंपनीला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र नियोजित नियोजन केल्यानंतर या महाबीज कंपनीचे बी बियाणे शेतकरी खरेदी करणार नाही, याचा फायदा खाजगी बी बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्याला झाला पाहिजे, हा आर्थिक गैरव्यवहार आहे, तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने उगवणशक्ती परीक्षण न करताच सोयाबीन बी बियाणे महाबीज कंपनीला विक्रीसाठी का परवानगी दिली, २०२० च्या खरीप पेरणी मध्ये महाबीज कंपनीने खराब सोयाबीन बी बियाणे शेतकऱ्यांना पुरवठा केल्यामुळे या वर्षी सोयाबीनची उत्पन्ना मध्ये फार मोठे घट होणार आहे, या महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसी शेतकऱ्यांनी फोनवर संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तर देऊन आपले फोन बंद करून करून ठेवले आहेत. बी बियाणे निर्माण करणाऱ्या खाजगी कंपन्या सोबत हात मिळवणी करून महाबीज कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना बोगस बियाणे उपलब्ध करून देतात, शेतकऱ्यांच्या कष्टाशी मस्करी करणार्‍या कृषी अधिकारी व महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, करण प्रत्येक वर्षी काही ना काही तरी भेसळयुक्त करून बी बियाणे हे लोक शेतकऱ्यांची पुरवठा करून फसवणूक करीत असतात म्हणून यांना कठोर शिक्षा करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन मार्फत केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...