गुरुवार, २१ मे, २०२०

छगन चौगुलेंच्या निधनाने, लोककलेची मोठी हानी-वंचित



मुंबई/ब्युरोचीफ,दि.२१ :- अत्यंत दुःखद बातमी महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत लोक कलावंत, सर्व लोककला संस्कृतीची जाण असलेले उमदे व्यक्तिमत्व छगन चौगुले यांच्या निधनाने आपण एका मोठ्या कलावंताला मुकलो आहोत. अश्या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 

         विद्यापीठात असताना त्यांनी त्यांच्या विभागात अविस्वरणीय योगदान दिले व विभागाला एक उंची देण्यास मोलाचे योगदान दिले. प्रशिक्षक म्हणून ते खूप विद्यार्थीप्रिय होते.अत्यंत प्रांजळ व सुस्वभावी छगन चौगुले यांच्या जाण्याने विद्यापीठाची व महाराष्ट्राच्या लोककलेची खूप मोठी हानी झाल्याचे सावंत यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. मात्र त्यांना 'नवरी नटली' या गाण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले होते. आज सकाळी सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे सावंत यांनी सांगितले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 

डॉ अरुण सावंत, माजी प्र कुलगुरू,मुंबई विद्यापीठ


पोलिसांकडून मजुरांची फसवणूक, अन्न पाण्याविना मजूर पोलीस ठाण्याबाहेर


मुंबई/ब्युरोचीफ,दि.२१ :- गेल्या २ महिन्यापासून गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी रेल्वेने पाठविण्यात येईल असे सांगून सकाळ पासून विक्रोळी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कामगार भाड्याची घरे खाली करून लेकराबाळांसह सकाळपासून विक्रोळी पोलीस ठाण्याबाहेर येऊन बसले होते. मात्र दुपारी त्यांना सांगण्यात आले की "गाडी नाहीये घरी जा, गाडी असेल तेव्हा फोन करून कळवण्यात येईल". भाड्याची खोली कायमची सोडून आलेल्या सकाळपासून उपाशी तापाशी बसलेल्या कामगारांना पोलिसांनी हाकलून दिले. आता गाडीची व्यवस्था होईपर्यंत राहायचे कुठे आणि खायचे काय असा प्रश्न या कामगारांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रमेश मोहिते यांनी रस्त्यावर बसलेल्या कामगारांची विचारपूस करून पोलीस ठाण्यात जाऊन माहिती विचारली असता पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन बाहेर काढून दिले. अनेक कामगार संतापून आता पायी चालत गावी जाणार असे म्हणून निघून गेले. सरकारला स्थलांतरित मजुरांची मदत करायची आहे की त्यांच्या आणि त्यांच्या लेकराबाळांच्या जीवाशी खेळायचं आहे? मजुरांची हेळसांड तातडीने थांबवली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने मजुरांची काळजी घेणे अपेक्षित असताना इथे समन्वय आणि नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब दिसत आहे. सगळाच भोंगळ कारभार. जर गाडीची व्यवस्था झालेली नव्हती तर पोलिसांना कोणी आदेश दिला कामगारांना बोलावण्याचा याची चौकशी झाली पाहिजे. आणि कामगारांचा छळ थांबला पाहिजे. ज्या मजुरांनी भाड्याचे घर सोडले आहे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय तातडीने सरकारने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.



डॉ.सत्यानंद कराड यांच्या पुढाकाराने शहरात मोफत मास्क वाटप.    

         

परतूर/प्रतिनिधी:-प्रशांत वाकळे               
परतुर येथील प्रसिद्ध अस्तिरोग तज्ञ डॉ सत्यानंद कराड यांच्या पुढाकाराने शहरात मोफत मास्क वाटप अभियान आज दिनांक 21मे 2020 रोजी वाटप करण्यात आले, सध्या लॉक डाऊन मध्ये थोडी शिथिलता मिळताच बाजारात नागरिकांनी गर्दी केली असून अनेक ठिकाणी शोषल डीसन्स नागरिक पाळताना दिसत नाही, अनेक जण मास्क न वापरता रुमाल गळ्यात लटकावून फिरताना दिसत आहे, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल असा सवाल उपस्तीत करत, निदान मास्क वाटप करून यात जंजागृकता करता येइल या भावनेने सदरील अभियान आपण राबवत असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, मोफत मास्क वाटप करताना याचे गामभिर्य ही सर्वांना समजून सांगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, कोरणांच्या प्रभाव अत्यंत तीव्र असून नागरिक बेफिकरपणे सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत , असा वेळी सर्वांनी प्रशासहनाचया सूचनांचे पालन करणे आवशक असल्याचे सांगत, जर अशीच विनाकारची गर्दी वाढत गेली तर कोरणांच्या विळखा आणखीनच घट्ट होईल व येणारी परस्तीती प्रशाषणाला व नागरिकांनाही आवरणे मुस्किल होईल असा इशारा त्यांनी दिला, नागरिकांनी सतर्क राहावे, मास्क वापरावे व नियमांचं तंतोतंत पालन करावे असे आहवन त्यांनी यावेळी केले।                  दरम्यान बालाजी नगर परिसर, रेल्वे स्टेशन परिसर व इतरत्र अनेकांना त्यांच्या वतीने मोफत मास्क वाटप करण्यात आले.


जिल्ह्यातील किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल करा - मनसेची मागणी.




परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
जालना जिल्ह्यातील सर्वच किराणा दुकानदाराने विनाकारण भाव वाढून दिले आहेत त्यांची चौकशी करून परवाने रद्द करून किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल करण्या बाबतचे निवेदन महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्याकडे ई -मेल द्वारे तक्रार केली आहे. तक्रारीत पुढे म्हटले आहे की,
जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यातील किराणा दुकानदाराने विनाकारण भाव वाढून दिले आहेत. जीवनावश्यक व इतर प्रत्येक वस्तू महागे २० ते ३०% भावा वाढ करून दिली आहे. भाव का वाढवले याचे उत्तर दुकानदार स्पष्टपणे देतात की सध्या स्टॉक नाही सगळे काही बंद आहे त्यामुळे आम्हाला मिळणारा माल वाढीव भावाने मिळत आहे. खरे तर असे काही नाही जीवनावश्यक वस्तूंचा भरपूर साठा आहे परंतु कमी कशी करावी कसं लुटता येईल लोकांना याचं प्रफॅक्ट ज्ञान या लोकांना अवगत आहे. खरंच किराणा दुकानदार नशीबवान आहेत लॉकडॉउन काळात किराणा दुकान चालू ठेवण्याची परवानगी सरकारने किराणा दुकानदाराला दिली आहे इतर सगळे दुकाने काही दिवसा पर्यंत बंद होते यांना योगायोगाने व्यापार करण्याची संधी मिळाली परंतु त्या संधित सुद्धा हात धुऊन घेण्याचे काम किराणा दुकानदारांनी चालू ठेवल्याले आहे जनता बिचारी फार प्रमाणिक असते एखाद्या दुकानदाराकडे एखादी व्यक्ती गेली किराणा वस्तूंची यादी दुकानदाराकडे देते आणि सर्व वस्तू घेतल्यानंतर किती बिल झाले असे विचारून बिल देऊन टाकतात दुकानदाराने वस्तू काय भावने लावल्यात हेसुद्धा लोक बघत नाहीत. किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी शासकीय यंत्रणा काम करते अगदी कुचकामी आहे या यंत्रणेच्या काय हेतु आहे हेच लक्षात येत नाही कारण ह्या सगळ्या सर्व गोष्टी सर्रास चालू असताना जालना जिल्ह्यातील तालुक्यात तुरळक २% किराणा दुकानदार कारवाई झालेली दिसून आलेली आहे.परंतु ९८% किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या यंत्रणेने कारवाई का केली नाही. याची सुद्धा चौकशी करून या यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी. कारण “जड हि खराब है पेड नही” या म्हणी प्रमाणे किराणा व्यापाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे दुकानदार सर्रास गैरव्यवहार करीत आहेत.असेही दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढे असे आहे की, साखर ३७ ते ३८ किलो.गोड तेल १२० लिटर. शेंगदाणे १३० किलो. तुरदाळ, चनादाळ, मुगदाळ या दाळीमध्ये चक्क २० ते ३० टक्के वाढ.काही वस्तू मध्ये तर ५० ते ६० टक्के वाढ केली आहे त्या मध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि तंबाखू. सिगारेट तंबाखूची पुडी किंमत दहा रुपये की सध्या ३० रुपयाला मिळते. सिगारेटचे खादे पाकिट ९५ रुपये किंमत असेल ते सध्या १८० रुपयाला मिळते. अशाप्रकारे जालना जिल्ह्यात किराणा दुकानदार लुटालूट करीत आहेत. जालना जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरल्यामुळे किराणा दुकानदारांवर कारवाई करावी. व या की किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणेवर निष्काळजीपणा केल्या बद्दल निलंबनाची कारवाई करावी. जेणेकरून जनतेचे पिळवणूक थांबेन या पूर्वी ही जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे किराणा दुकानदार बाबत निवेदन देऊ तक्रार करण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील किराणा दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असेही शेवटी दिलेल्या महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपास करणाऱ्यावर कारवाई

अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.




अंबड़/प्रतिनिधि : अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले,  पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, यांनी गोदावरी पात्रातून अवैध उपास करणाऱ्या विरुद्ध कारवाई करत वाळूचे दोन  ट्रॅक्टरासह साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी गुप्त सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, गोदावरी नदीपात्रातून ऐवजी वाळू उपासा होत आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री पाऊस फाट्या गोदावरी नदीपात्रातून अवैध रित्या वाळू उपसा  करणाऱ्यांनविरुद्ध रात्रभर मोहीम राबविण्यात आली होती यावेळी मंगरूळ येथील नदीपात्रातून दोन ट्रॉली असलेले वाळू भरलेला एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला यानंतर पाथरवाला येथील नदीपात्रात पोलिसांना पाहून वाळू भरत असलेले ट्रॅक्टर सोडून चालत आणि इतर काही जण पळून गेले पोलिसांनी दोन ट्रॉली असलेले वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक रिकामा ट्रॅक्टर असे दोन ट्रॅक्टर व वाळू असा 9 लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून प्रकाश सुभाष परासे व किशोर प्रभू खरात दोघेही राहणार गोंदी यांना मुद्देमालासह अटक करून त्यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*अंबड़ तालुक्यातील जामखेड येथील कानिफनाथ आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन अवैध धंदा करणाऱ्यानी गुप्त  गुटख्याची साठवणूक करुण केला गोडाऊन*



अंबड तालुक्यातील  जामखेड येथून 12 लाखाचा 46 पोते गुटख्याचा साठा जप्त, आरोपी मात्र फरार

*अंबड/अरविंद शिरगोळे* : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर डाऊनच्या काळात चोरीछुपे अवैध धंदे पावले असून या अवैध धंदा करणाऱ्या विरुद्ध पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकरांनी दंड थोपवीत धाडसत्र सुरू आहे यात दिनांक 20 मे रोजी भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना अंबड तालुक्यातील  जामखेड येथून 12 लाखाचा 46 पोते गुटख्याचा साठा असे जप्त केला असून आरोपी मात्र फरार झाला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील जंगलात अडगळीत असलेल्या कानिफनाथ आश्रमा चे साधक व पुजारी असलेल्या पती-पत्नीने दोन वर्षापूर्वी निधन झाल्याने सदरील आश्रम ते बंद होते मात्र गुटका माफिया अनिल भोजने याचे मयत पुजारी दाम्पत्य हे नात्याने मावशी व मावसा होते त्यामुळे त्यांनी या कानिफनाथ आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन त्याचा गोडाउन प्रमाणे प्रयोग करून तिथे गुटख्याची साठवणूक करून युद्ध गोरख धंदा करीत असल्याची माहिती अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना एका गुप्त सूत्राकडून मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर व त्यांच्या पथकातील पो.हे.का विष्णू चव्हाण पाटील, पोलीस कर्मचारी संदीप कुटे, संतोष वनवे, महेंद्र गायके, शमीम बर्डे, वंदन पवार स्वप्नील भिसे, विषाल लोखंडे तसेच महिला पोलीस कर्मचारी परवीन शेख यांनी मोठ्या शतफिने सापळा रचला जिल्हा पोलिस अधिकाक्ष एस.चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार पोलीस अधीक्षक सि.डी.सेवन यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे 2 वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना रोहिलागड येथील कानिफनाथ आश्रमात तसेच जामखेड येथील गुटखा माफियांच्या  घरी छापा मारून तब्बल 12 लाखांचा रुपयांचा 46 जप्त करू दंड थोपवीत धाडसत्र सुरू आहे यात दिनांक 20 मे रोजी भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना अंबड तालुक्यातील  जामखेड येथून 12 लाखाचा 46 पोते गुटख्याचा साठा असे जप्त केला असून आरोपी मात्र फरार झाला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील जंगलात अडगळीत असलेल्या कानिफनाथ आश्रमा चे साधक व पुजारी असलेल्या पती-पत्नीने दोन वर्षापूर्वी निधन झाल्याने सदरील आश्रम ते बंद होते मात्र गुटका माफिया अनिल भोजने याचे मयत पुजारी दाम्पत्य हे नात्याने मावशी व मावसा होते त्यामुळे त्यांनी या कानिफनाथ आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन त्याचा गोडावन प्रमाणे प्रयोग करून तिथे गुटख्याची साठवणूक करून युद्ध गोरख धंदा करीत असल्याची माहिती अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना एका गुप्त सूत्राकडून मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर व त्यांच्या पथकातील पो.हे.का विष्णू चव्हाण पाटील, पोलीस कर्मचारी संदीप कुठे संतोष वनवे, महेंद्र गायके, शमीम बर्डे, वंदन पवार स्वप्नील भिसे, विषाल लोखंडे तसेच महिला पोलीस कर्मचारी परवीन शेख यांनी मोठ्या शतफिने सापळा रचला जिल्हा पोलिस अधिकाक्ष एस.चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार पोलीस अधीक्षक सि.डी.सेवन यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे 2 वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना रोहिलागड येथील कानिफनाथ आश्रमात तसेच जामखेड येथील गुटखा माफियांच्या  घरी छापा मारून तब्बल 12 लाखांचा रुपयांचा 46 जप्त करून. अंबड पोलीस ठाण्यात जमा केला येथील अन्न व औषधी प्रशासनाला पुढील गुन्हा दाखल करण्यासाठी कळविण्यात आले असून गुटका माफिया मात्र फरार झाला. असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गुटखा माफिया  तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणून एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फरारी गुटखा माफिया अनिल भोजने चा अंबड पोलिसांकडून शोध सुरू असून लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल तसेच यामागे आणखी काही जणांचा हात असण्याची शक्यता पोलिस वर्तवली असून त्या दिशेने जोमाने तपास सुरु आहे.

बीड जिल्ह्यात उद्यापासून लालपरी जिल्हांतर्गत धावणार




बीड,प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यामध्ये उद्या दि.22 मे पासून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा 50 टक्के आसन क्षमतेनुसार म्हणजेच 22 प्रवाशी याप्रमाणे जिल्हांतर्गत सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक बीड कालिदास लांडगे यांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांनाही अधिकृत पत्र देण्यात आले आहे.**
बीड जिल्ह्यामध्ये गेला सात दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची चाके थांबली आहेत.मात्र उद्या दिनांक 22 मे पासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन अधिसूचना मधील मुद्दा क्र.14 ( ड) नुसार नॉन रेड झोन मध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक जिल्हाअंतर्गत बसच्या प्रवासी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने बीड विभागांमध्ये उद्यापासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येत आहे.
             याप्रमाणे सुरू होईल बसेवा
बीड ते परळी,  बीड ते अंबाजोगाई , बीड ते माजलगाव, बीड ते धारूर, बीड ते गेवराई, बीड ते पाटोदा, बीड ते आष्टी ,परळी ते अंबाजोगाई ,धारूर ते अंबाजोगाई,  केज ते माजलगाव, माजलगाव ते गेवराई गढी याप्रमाणे या बसच्या 12 फेऱ्या होणार आहेत.सदरील बसेस सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रति 1 तासाने सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी  प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...